शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
5
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
6
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
7
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली
8
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
9
बुडणार नाही तास, शाळेतच मिळणार पास; ‘एसटी’चे एक पाऊल पुढे
10
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
11
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
12
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
13
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
14
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
15
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
16
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
17
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
18
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
19
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
20
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन

मुसळधार पावसाचा केडीएमटीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 4:36 AM

कल्याण: मुसळधार पावसाचा केडीएमटी उपक्रमाला चांगलाच फटका बसला आहे. ठिकठिकाणी निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीत प्रवासी संख्या घटल्याने त्याचा ...

कल्याण: मुसळधार पावसाचा केडीएमटी उपक्रमाला चांगलाच फटका बसला आहे. ठिकठिकाणी निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीत प्रवासी संख्या घटल्याने त्याचा परिणाम दैनंदिन उत्पन्नावर झाला आहे. त्याचबरोबर संरक्षक भिंतीअभावी वालधुनी नदीचे पाणी गणेशघाट आगारात घुसल्याने तीन बसचे नुकसान झाले आहे. दरवर्षी अतिवृष्टीमुळे आगारात पाणी घुसून बसगाड्यांचे नुकसान होते. यावेळी तीच परिस्थिती झाली.

उत्पन्न आणि खर्चातील वाढत्या तफावतीमुळे तोट्यात चाललेल्या केडीएमटी उपक्रमाला या ना त्या कारणांमुळे सातत्याने फटका बसत आहे. भंगार बसचा खितपत पडलेला मुद्दा असो अथवा वारंवार बस नादुरुस्त होऊन त्या रस्त्यातच बंद पडण्याची परंपरा, यात प्रमुख आगार असलेल्या गणेशघाट आगाराची दुरवस्था पाहता उपक्रमाला घरघर लागल्याचे स्पष्ट होत आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या निर्बंधांमध्ये उपक्रमाच्या ५० बस रस्त्यावर धावत आहेत. साडेचार लाखांपर्यंत मिळणारे दैनंदिन उत्पन्न कोरोनाच्या प्रादुर्भावात सध्या दोन लाखांपर्यंत मिळत आहे. रिक्षांची वाढती संख्या याला कारणीभूत ठरत असली तरी मुसळधार पावसाचाही उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. यात दैनंदिन उत्पन्नात आणखी जवळपास एक लाखाची घट झाली आहे.

-----------------------------------------------

बसचे नुकसान

आगाराच्या पाठीमागील बाजूकडील वालधुनी नदीला लागून असलेली संरक्षक भिंत कोसळली आहे. अन्य ठिकाणीही तीच अवस्था आहे. आगारातील संरक्षक भिंती कोसळल्याने तेथील बसगाड्या आणि अन्य साहित्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात दोघा चोरट्यांकडून गिअर बॉक्स चोरण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु सुरक्षारक्षकांनी तो हाणून पाडला. दरम्यान, कोसळलेल्या संरक्षक भिंतींकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा एकदा पावसाचे पाणी आगारात घुसल्याचे गुरुवारी पाहायला मिळाले. आगाराला लागून असलेल्या वालधुनी नदीच्या पातळीत वाढ झाल्याने आणि भिंत पडल्याने पाणी आगारात घुसले होते. यात तीन बसचे मोठे नुकसान झाले आहे.

----------------------------------------------