शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

ठाणे जिल्ह्यात पावसाचा धुडगूस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 03:59 IST

शुक्रवारच्या रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात गावोगावी धुडगूस घातला असून, नदीनाल्याकाठच्या गावांना पाण्याचा विळखा आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेकांच्या घरात पाणी गेल्याने संसार उद्ध्वस्त झाले.

 ठाणे-  शुक्रवारच्या रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात गावोगावी धुडगूस घातला असून, नदीनाल्याकाठच्या गावांना पाण्याचा विळखा आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेकांच्या घरात पाणी गेल्याने संसार उद्ध्वस्त झाले.भिवंडी तालुक्यातील वारणा व कामवारी नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील खाडीकिनारी असलेल्या म्हाडा कॉलनी, अजयनगर, अंबिकानगर, बंदर मोहल्ला भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिल्याची माहिती पालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी दिली.कल्याणनजीकच्या वालधुनी नदी परिसरातील शिवाजीनगरमधील अनेक घरांत पाणी शिरले. या पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीवरही मोठ्या प्रमाणात बसला असून, ठिकठिकाणी रेल्वेरुळ पाण्यात गेल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. कल्याण-मुरबाड रस्ता पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक दुपारपर्यंत ठप्प होती. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. वासिंद पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या रेल्वेपुलाखालील पाण्यामुळे शहापूर, कल्याण तालुक्यांतील ४२ गावांचा संपर्कतुटला. कल्याण-डोंबिवली परिसरात १५ ठिकाणी झाडे पडली. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.कल्याण-डोंबिवली शहराला झोडपलेकल्याण-डोंबिवली शहरांत शनिवारी पहाटेपासूनच कोसळणाºया धुवाधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शहरातील सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचले. त्यामुळे शहरे जलमय झाली होती. अनेकांच्या घरात पाणी शिरले, तर नाले तुडुंब भरून वाहू लागले. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूककोंडी झाली.भिवंडी शहरातील पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने अजयनगर, शिवाजी चौक, शिवाजीनगर मार्केट, नझराना कम्पाउंड, नवीचाळ, तानाजीनगर आदी भागात शिरले. अंबरनाथमधील प्राचीन शिव मंदिरालाही पावसाचा फटका बसला. मंदिराशेजारील वालधुनी नदी दुथडी भरून वाहत होती.ठाणे शहरात सखल भागात साचले पाणीठाणे शहरात शनिवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे वाहतुकीचा वेगही काहीसा मंदावला होता. सायंकाळपर्यंत १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस बरसला. शहरात अनेक ठिकाणी वृक्ष पडणे, मुंब्य्रात नाल्याची भिंत पडण्याची घटना घडली. यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

टॅग्स :Rainपाऊसthaneठाणे