शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण तालुक्यातील दोन हजार हेक्टर भात शेतीचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2019 09:25 IST

अवकाळी पावसाने ठाणे जिल्ह्यातील ३१ हजार हेक्टर भात शेतीचे नुकसान केले आहे.

उमेश जाधव

टिटवाळा - अवकाळी पावसाने ठाणे जिल्ह्यातील ३१ हजार हेक्टर भात शेतीचे नुकसान केले आहे. यात कल्याण तालुक्यातील अंदाजे ३५७८ इतक्या भातशेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील या नुकसान ग्रस्त भातशेती पैकी १७ हजार हेकटर भात शेतीचे पंचनामे आद्यप पर्यंत झाले आहेत. यात कल्याण तालुक्यातील अंदाजे १०९४.६४ हेक्टर पंचनामे झाले असून, उर्वरीत शेतीचे पंचनामे लवकर पूर्ण केले जातील अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी अंकुश माने यांनी दिली.

ठाणे जिल्ह्यातील ५६ हजार हेकटर जमिनीत पावसाळ्यात खरीप हंगामात भाताचे पीक घेतले जाते. यात यंदा कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागातील  ६८ गाव पाड्यातील ५२९० हेक्टर क्षेत्रावर भातच पिक घेतले आहे. परंतू यावर्षी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने हळवी, निम गरवी व गरवी भात पिके घेतली गेली आहेत. यंदा भात शेतीला योग्य असा पाऊस पडल्याने भाताचे पीक उत्तम दर्जाचे आले होते. मात्र हे पीक शेतातून शेतकऱ्यांच्या घरात येईपर्यंत परतीच्या पावसाने या भात पिकांची पुरती नासाडी केली आहे.

यंदा ना भात पिक, ना तांदूळ, ना तनस

ठाणे जिल्हा भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. यावर्षी मात्र याच कोठाराला परतीच्या पावसाची दृष्ट लागली आहे. या कल्याण तालुक्यातील शेकडो हेक्टर भाताची कापणी केलेली पिके भिजल्याने शेतकऱ्यांना ना तांदूळ, ना तनस हाती लागणार आहे. यावर्षी भात पिकाच्या नासाडीचा फटका जनावरांच्या चाऱ्याला देखील बसणार आहे. तसेच भिजलेली भात पिकातील तांदूळ पूर्ण पणे न निघता त्याचे तुकडे पडणार आहेत. त्यामुळे असे पीक ना खावटीस ना बाजारात विक्रीसाठी उपयोगी पडणार आहे. यामुळे खर्च झालेली मजुरी, वर्ष भराची मेहनत ही परतीच्या पावसाने अक्षरशः शेतकरी राजाकडून ओरबाडून नेली आहे. पुढे वर्षभर खायच काय हा प्रश्न शेतकरी बांधवांना पडला आहे. भात पिकाशी संबंधित तूस, पेंढा, यांच्या टंचाईमुळे महागाई वाढेल अशी भीती शेतकरी वर्ग व्यक्त करत आहे. यामुळे कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागातील बळीराजा कमालीचा हवालदिल झाला आहे. प्रशासनाने योग्य पंचनामे करून एक ही बाधीत शेतकरी सुटू नये अशी मागणी तालुक्यातील शेतकरी वर्गातून केली जात आहे. 

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ६ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील पाच तालुक्यातील भात शेतीच्या नुकसानाची पाहणी केली. एक ही शेतकरी नुकसान भरपाई  विना सुटणार नाही. सर्व बाधीत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाईल असे शिंदे यांनी सांगितले. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे. 

राजेंद्र बांगर, शेतकरी, फळेगाव

अवकाळी पावसामुळे कल्याण तालुक्यातील हजारो हेक्टर भात शेतीचे नुकसान झाले आहे. शेतीचे योग्य प्रकारे पंचनामे करावेत. यात राजकारण आणू नये. शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याला लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी.

अशोक भोईर, आधार शेतकरी संघटना, अध्यक्ष

सध्या तालुक्यातील बहुतांश बाधित भात शेतीचे पंचनामे महसूल विभागाकडून झाले आहेत. लवकरच उर्वरित शेतीचे पंचनामे होतील. तसेच विमा कंपन्या देखील पंचनामे करत आहेत. 

दीपक आकडे, तहसीलदार

 

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणेagricultureशेतीRainपाऊसEknath Shindeएकनाथ शिंदे