शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

कल्याण तालुक्यातील दोन हजार हेक्टर भात शेतीचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2019 09:25 IST

अवकाळी पावसाने ठाणे जिल्ह्यातील ३१ हजार हेक्टर भात शेतीचे नुकसान केले आहे.

उमेश जाधव

टिटवाळा - अवकाळी पावसाने ठाणे जिल्ह्यातील ३१ हजार हेक्टर भात शेतीचे नुकसान केले आहे. यात कल्याण तालुक्यातील अंदाजे ३५७८ इतक्या भातशेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील या नुकसान ग्रस्त भातशेती पैकी १७ हजार हेकटर भात शेतीचे पंचनामे आद्यप पर्यंत झाले आहेत. यात कल्याण तालुक्यातील अंदाजे १०९४.६४ हेक्टर पंचनामे झाले असून, उर्वरीत शेतीचे पंचनामे लवकर पूर्ण केले जातील अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी अंकुश माने यांनी दिली.

ठाणे जिल्ह्यातील ५६ हजार हेकटर जमिनीत पावसाळ्यात खरीप हंगामात भाताचे पीक घेतले जाते. यात यंदा कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागातील  ६८ गाव पाड्यातील ५२९० हेक्टर क्षेत्रावर भातच पिक घेतले आहे. परंतू यावर्षी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने हळवी, निम गरवी व गरवी भात पिके घेतली गेली आहेत. यंदा भात शेतीला योग्य असा पाऊस पडल्याने भाताचे पीक उत्तम दर्जाचे आले होते. मात्र हे पीक शेतातून शेतकऱ्यांच्या घरात येईपर्यंत परतीच्या पावसाने या भात पिकांची पुरती नासाडी केली आहे.

यंदा ना भात पिक, ना तांदूळ, ना तनस

ठाणे जिल्हा भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. यावर्षी मात्र याच कोठाराला परतीच्या पावसाची दृष्ट लागली आहे. या कल्याण तालुक्यातील शेकडो हेक्टर भाताची कापणी केलेली पिके भिजल्याने शेतकऱ्यांना ना तांदूळ, ना तनस हाती लागणार आहे. यावर्षी भात पिकाच्या नासाडीचा फटका जनावरांच्या चाऱ्याला देखील बसणार आहे. तसेच भिजलेली भात पिकातील तांदूळ पूर्ण पणे न निघता त्याचे तुकडे पडणार आहेत. त्यामुळे असे पीक ना खावटीस ना बाजारात विक्रीसाठी उपयोगी पडणार आहे. यामुळे खर्च झालेली मजुरी, वर्ष भराची मेहनत ही परतीच्या पावसाने अक्षरशः शेतकरी राजाकडून ओरबाडून नेली आहे. पुढे वर्षभर खायच काय हा प्रश्न शेतकरी बांधवांना पडला आहे. भात पिकाशी संबंधित तूस, पेंढा, यांच्या टंचाईमुळे महागाई वाढेल अशी भीती शेतकरी वर्ग व्यक्त करत आहे. यामुळे कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागातील बळीराजा कमालीचा हवालदिल झाला आहे. प्रशासनाने योग्य पंचनामे करून एक ही बाधीत शेतकरी सुटू नये अशी मागणी तालुक्यातील शेतकरी वर्गातून केली जात आहे. 

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ६ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील पाच तालुक्यातील भात शेतीच्या नुकसानाची पाहणी केली. एक ही शेतकरी नुकसान भरपाई  विना सुटणार नाही. सर्व बाधीत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाईल असे शिंदे यांनी सांगितले. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे. 

राजेंद्र बांगर, शेतकरी, फळेगाव

अवकाळी पावसामुळे कल्याण तालुक्यातील हजारो हेक्टर भात शेतीचे नुकसान झाले आहे. शेतीचे योग्य प्रकारे पंचनामे करावेत. यात राजकारण आणू नये. शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याला लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी.

अशोक भोईर, आधार शेतकरी संघटना, अध्यक्ष

सध्या तालुक्यातील बहुतांश बाधित भात शेतीचे पंचनामे महसूल विभागाकडून झाले आहेत. लवकरच उर्वरित शेतीचे पंचनामे होतील. तसेच विमा कंपन्या देखील पंचनामे करत आहेत. 

दीपक आकडे, तहसीलदार

 

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणेagricultureशेतीRainपाऊसEknath Shindeएकनाथ शिंदे