शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

जोरदार पाऊसधारांचा जिल्ह्यात दिवसभर धिंगाणा

By admin | Updated: June 26, 2016 01:31 IST

ठिकठिकाणच्या बातमीदारांकडून ठाणे जिल्ह्यात शुक्र वारी दुपारपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने दमदार हजेरी लावत वाहतुकीसह सरकारी यंत्रणांची दाणादाण उडवली. नालेसफाईचे दावे तर

ठाणे : ठिकठिकाणच्या बातमीदारांकडून ठाणे जिल्ह्यात शुक्र वारी दुपारपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने दमदार हजेरी लावत वाहतुकीसह सरकारी यंत्रणांची दाणादाण उडवली. नालेसफाईचे दावे तर फोल ठरलेच, पण पावसाचे पाणी वाहून जाणारी गटारे साफ न केल्याने ठिकठिकाणी पाणी तुंबले. जोरदार वाऱ्यासह पावसाच्या धिंगाण्याचा पहिला फटका नेहमीप्रमाणे रेल्वे वाहतुकीला बसला. रस्ते वाहतूकही मंद गतीने सुरू होती. डोंबिवली पश्चिमेत १६ तास वीजपुरवठा बंद असल्याने नागरिकांचे हाल झाले. ठाण्यात हायलॅण्डनजीक महालक्ष्मीनगरात भूस्खलन झाल्याने ६० ते ७० घरांना धोका निर्माण झाला आहे. ठाणे शहरासह कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर आणि मुरबाड, शहापूर आदी तालुक्यांमध्ये झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात सरासरी ४६ मिमी पावसाची नोंद झाली. पावसाला सोमवारी खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असली, तरी त्याने जोर पकडला नव्हता. शुक्रवारपासून मात्र पावसाची संततधार कायम होती आणि नंतर त्याने जोर पकडला. पहाटेपासूनच जोरदार वृष्टी सुरू असली, तरी सकाळी काही काळ त्याने विश्रांती घेतली. नंतर, मात्र पुन्हा जोरदार सरी कोसळण्यास सुरुवात झाली आणि दिवसभर तो बरसत राहिला.ठाण्यात बाळकुमच्या महालक्ष्मीनगरमध्ये जमीन खचल्यामुळे सुमारे ७० घरांना धोका निर्माण झाला आहे. तर, यशस्वीनगरात नाल्याची भिंत कोसळल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात पाणी शिरले. पावसामुळे तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा विस्कळीत झाली. मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गांवरील लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतही पावसाने जोरदार हजेरी लावली. मुरबाड, शहापूर, भिवंडी, कल्याण तालुक्यांमध्येही पावसाने चांगलीच हजेरी लावली. पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या पेरणीच्या कामाला जोर चढला आहे. दिवसभरात ५१ तक्रारी या पावसामुळे ठाणे शहरात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. शनिवारी दिवसभरात ठाणे महापालिका आपत्कालीन कक्षाकडे सुमारे ५२ तक्र ारींची नोंद झाली. त्यात आग लागण्याच्या चार, शॉर्टसर्किटची एक, झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या २१, पाणी तुंबण्याच्या ९, भिंत कोसळण्याच्या २, गॅसगळतीची एक तक्रार, तसेच एक बोगस कॉलही आला. टिटवाळ्यात रस्ते जलमयटिटवाळा : पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. पहिल्याच पावसाने गटारे तुंबल्याने ठिकठिकाणी रस्त्यांवरून पाणी वाहत होते. दळवीवाडा, निमकरनाका, देशपांडेवाडा, आनंद दिघे मार्ग आणि इतर ठिकाणी गटारे तुंबून पाणी रस्त्यावरून वाहू लागले. अंबरनाथमध्ये जनजीवन विस्कळीत : मुसळधार पावसामुळे अंबरनाथचे जनजीवन विस्कळीत झाले. कल्याण-बदलापूर महामार्ग पहिल्याच पावसात पाण्याखाली गेला. रस्त्याच्या शेजारी असलेल्या नाल्यांची सफाई न केल्याने ते कचऱ्याने तुंबले होते. त्यामुळे नाल्यातील पाणी महामार्गावर आले. अशीच परिस्थिती शहरात अनेक ठिकाणी होती. नाल्याचे पाणी वस्तीत आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. जोरदार पावसामुळे नाल्याशेजारी काढून ठेवलेला गाळ पुन्हा नाल्यातच वाहून गेला. त्यामुळे पाणी तुंबण्याचे प्रकार जास्त घडले. बिग सिनेमासमोर आणि गावदेवी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील दोन्ही नाले तुंबले.उल्हासनगरात साचले पाणीउल्हासनगर : संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना घडल्या. कॅम्प नं-४ येथील साईनाथ कॉलनी, नागराणी मंदिर, राधास्वामी सत्संग मुख्य रस्ता, गुलशननगर, कल्याण-अंबरनाथ रस्त्यावर पाणी साचले. नाल्याचे अर्धवट काम व पडलेल्या मातीमुळे पाणी तुंबल्याचा अंदाज आहे.