शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

‘तो’ दीड तास जिवावर बेतला!

By admin | Updated: December 26, 2015 01:06 IST

रमेश गुंजाळ यांच्यावर हल्ला झाला, त्या वेळेस मोरिवली उद्यानात बसलेल्या नागरिकांची आणि मोरिवलीच्या नाक्यावर नाका कामगारांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती. पण, हल्ला

अंबरनाथ : रमेश गुंजाळ यांच्यावर हल्ला झाला, त्या वेळेस मोरिवली उद्यानात बसलेल्या नागरिकांची आणि मोरिवलीच्या नाक्यावर नाका कामगारांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती. पण, हल्ला झाल्यावर त्यांना लागलीच उपचारासाठी नेण्यात आले नाही. जेथे हलविण्यात आले, त्या रुग्णालयात उपचाराची पुरेशी सोय नव्हती. तब्बल दीड तासानंतर त्यांना कल्याणच्या रुग्णालयात हलविण्यात आले. हा दीड तासच गुंजाळ यांच्या जिवावर बेतला. सकाळी ९.३० वाजता हल्ला झाल्यावर साधारण १० ते १५ मिनिटे गुंजाळ तेथेच पडून होते. त्यानंतर, त्यांना रुग्णालयात हलविण्यासाठी गाडीच मिळाली नाही. अखेर, तेथे असलेल्या टेम्पोतून त्यांना जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचाराची पुरेशी सुविधा नसल्याने पुन्हा त्यांना ९.५५ वाजता उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलविण्यास सांगण्यात आले. तेव्हाही त्यांना लागलीच नेण्यासाठी कोणतीच गाडी उपलब्ध नव्हती की, रुग्णवाहिका नव्हती. त्यामुळे त्यांना एका रिक्षातूनच उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करण्यात आले. रक्तस्राव सुरूच राहिल्याने आणि हृदयाचे ठोके कमी होत गेल्याने पुन्हा त्यांना कल्याणच्या खाजगी रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. तोवर, सकाळचे ११ वाजले. हल्ला झाल्यापासून खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होईपर्यंत तब्बल दीड तास गेला. याच काळात योग्य उपचार न मिळाल्याने गुंजाळ यांची प्रकृती ढासळली आणि जेव्हा खऱ्या अर्थाने उपचार सुरू करण्यात आले, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. ना शॉकचा उपयोग, ना इंजेक्शनचा कल्याणच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा गुंजाळ यांची प्रकृती पूर्ण ढासळलेली होती. शरीरात रक्तपुरवठा करणेही अवघड जात होते. उपचाराला कोणताच प्रतिसाद मिळत नव्हता. हृदयाचे ठोकेदेखील मिळत नसल्याने त्यांना पन्नासपेक्षा अधिक इलेक्ट्रीकचे झटके देऊन हृदयक्रिया सुरू करण्याचा प्रयत्न झाला.एवढ्यावरच न थांबता मृत्यूच्या दारात असलेल्या व्यक्तीला वाचविण्यासाठी जी इंजेक्शन दिली जातात, ती चार इंजेक्शनही त्यांना देण्यात आली. मात्र, त्याचाही उपयोग झाला नाही. अखेर, डॉक्टरांचे अडीच तासांचे प्रयत्न अपयशी ठरले आणि गुंजाळ यांना मृत घोषित करण्यात आले.