शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
2
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
3
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
4
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
5
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
6
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
7
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
8
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
9
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
11
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
12
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
13
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
14
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
15
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
16
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
17
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
18
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
19
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
20
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!

आपल्याच उमेदावाराला म्हणाले 'चारित्र्यहीन'; शरद पवार गटाचे शहराध्यक्ष काय बोलून गेले (Video)

By अजित मांडके | Updated: April 4, 2024 16:41 IST

महाविकास आघाडीचा मंगळवारी बाळकुम येथे विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला होता

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाणे लोकसभा मतदार संघात सध्या महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला आहे. दोनही गटाकडून सध्या मेळाव्यांचा धडाडा सुरु झाला आहे. त्यात आरोप प्रत्यारोप, कोपरखळ्या सुरु असतांनाच महाविकास आघाडीच्या ठाण्यातील मेळाव्यात उध्दव सेनेचे उमेदवार राजन विचारे हे निष्ठावंत आणि चारीत्रवान म्हणण्याऐवजी चारीत्रहीन उमेदवार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष सुहास देसाई यांच्या तोडून निघाल्याने आता त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. विरोधकांनी देखील त्यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला असून सध्या हे वक्तव्य वाऱ्यासारखे सोशल मिडियावर वायरल झाले आहे. राजकीय नेत्यांकडून भाषण करतांना अनेकदा बोलण्याच्या नादात वादग्रस्त विधाने कळत नकळत निघत असतात, त्या वक्तव्यावर नंतर सारवासारव केली जाते.

येत्या 20 मे रोजी लोकसभेसाठी मतदान होणार आहे. महाविकास आघाडीने ठाणे लोकसभेसाठी उमेदवार जाहीर केला. मात्र महायुतीकडून अद्यापही उमेदवाराची चाचपणी सुरू असल्याने उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यास विलंब होताना दिसत आहे. महाविकास आघाडीने उमेदवाराचा प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. मात्र महायुतीने उमेदवारशिवाय मेळावे घेण्यास प्रारंभ केले आहे.

महाविकास आघाडीचा मंगळवारी बाळकुम येथे विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, काँग्रेस ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आदी उपस्थित होते. मात्र सुदैवाने यावेळी उमेदवार विचारे हे उपस्थित नव्हते. याप्रसंगी बोलताना, देसाई यांनी मी उमेदवार राजन विचारे आणि इंडिया आघाडीचा प्रचार करत आहे. शरद पवार यांनी माझ्या खांद्यावर जबाबदारी दिली. तसेच माझे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निष्ठेने मला ही जबाबदारी दिली आहे. तसेच इंडिया आघाडीने जो नेता उमेदवार म्हणून दिला आहे. तो निष्ठावान आणि चारित्र्यहीन असे वादग्रस्त विधान केले. त्यांच्या या वक्तव्यावरुन मेळाव्यात एकच हशा पिकल्याचे दिसून आले. त्यावर त्यांना उपस्थित नेत्यांनी चारित्र्यवान म्हणा असे सांगितले. त्यानंतरही तेच ते म्हणत पुन्हा भाषणाच्या ओघात त्यांच्या तोंडून चारित्र्यहीन असा शब्द प्रयोग झाल्याचे दिसून आले. परंतु त्यांचे हे वादग्रस्त विधान सध्या चांगलेच ट्रोल झाले.

सोशल मिडियावर तर त्यांच्या व्हिडीओने चांगलाच धुमाकुळ घातला आहे. प्रचार करणारे असे नेते असतील तर उमेदवार कसा निवडून येणार अशा शब्दात खडे बोल सोशल मिडियावर सुनावले जात आहेत. तिकडे महायुतीच्या मेळाव्यातही देसाई यांच्या या वादग्रस्त वक्तव्याची चांगलीच खिल्ली उडविण्यात आली आहे. ज्यांना बोलायला येत नाही, ते काय उमेदवार निवडून आणणार असा सवालही महायुतीच्या नेत्यांनी केला आहे.

टॅग्स :thaneठाणेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारShiv Senaशिवसेना