शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

नांदिवलीत इमारतीवर हातोडा, केडीएमसीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 00:38 IST

केडीएमसीच्या ‘ई’ प्रभागक्षेत्रातील नांदिवली येथील स्वामी समर्थ मठानजीकची बालाजी कॉम्प्लेक्स या सात मजली बेकायदा इमारतीवर बुधवारी कारवाईचा हातोडा चालवण्यात आला.

डोंबिवली: केडीएमसीच्या ‘ई’ प्रभागक्षेत्रातील नांदिवली येथील स्वामी समर्थ मठानजीकची बालाजी कॉम्प्लेक्स या सात मजली बेकायदा इमारतीवर बुधवारी कारवाईचा हातोडा चालवण्यात आला. विकास आराखड्यातील नियोजित रस्त्याच्या जागेवरच ही इमारत बांधण्यात आली होती. प्रभागक्षेत्र अधिकारी रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विकास आराखड्यातील (डीपी) नियोजित रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या या इमारतीवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, इमारतीतील रहिवासी एकत्र येऊ न त्यांनी कारवाई रोखण्याचा प्रयत्न केल्याने काहीवेळ तणावाचे वातावरण होते.विकासक आणि जमीनमालक बंटी बाळाराम म्हात्रे यांनी या इमारत बांधली होती. ही इमारत बेकायदा असल्यामुळे आयुक्त गोविंद बोडके यांनी प्रभागक्षेत्र अधिकारी आणि उपायुक्त सुनील जोशी यांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसारच ही कारवाई करण्यात आली. गायकवाड यांनी इमारतमालकाला महाराष्ट्र महापालिका अधिनियमांनुसार नोटीस बजावून ही इमारत रिकामी करण्याचे पत्र रहिवाशांना दिले होते, असे महापालिकेने म्हटले आहे. बोडके, उपायुक्त, सुनील जोशी, सहायक संचालक नगररचनाकार मारुती राठोड हे उपस्थित होते.कारवाईत ‘आय’ प्रभाग क्षेत्र अधिकारी संदीप रोकडे, ‘ह’ प्रभाग क्षेत्र अधिकारी अरुण वानखेडे, ‘फ’ प्रभाग अधिकारी अरुण भालेराव सहभागी झाले होते. पोलिसांच्या बंदोबस्तासह तीन जेसीबी, दोन पोकलेनद्वारे ही कारवाई झाली.जेसीबी, पोकलेन रोखण्याचा प्रयत्नरहिवासी राहत असलेल्या विंगवर कारवाई होताच रहिवाशांनी एकत्र येऊ न पोकलेन आणि जेसीबी रोखून तीव्र विरोध केला. त्यामुळे काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते; तोपर्यंत पथकाने डीपी रस्त्याच्या आड येणारे बांधकाम व इमारतीच्या एका विंगचे बांधकाम तोडले होते. या इमारतीत दोन विंग मिळून ५० हून अधिक नागरिक राहत असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली. कारवाईसाठी मानपाडा पोलिसांचा बंदोबस्त न मिळाल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले.सोशल मीडियावरून टीका : बेकायदा इमारतीवर झालेल्या कारवाईनंतर सोशल मीडियावरून जोरदार टीका करण्यात आली. बेकायदा इमारती उभ्या राहतात, तेव्हाच कारवाई का होत नाही? रहिवासी राहायला येईपर्यंत महापालिका प्रशासन झोपले होते का? असा सवाल करण्यात आला आहे. तसेच ही इमारत ज्या प्रभागक्षेत्र अधिकाºयांच्या काळात बांधण्यात आली, ते अधिकारी, अतिक्रमण हटाव पथकातील संबंधित कर्मचाºयांवर काय कारवाई होणार, हे प्रशासनाने स्पष्ट करावे. पारदर्शी कारभाराचे गुण गाणारे डोंबिवलीकर त्याचीही वाट बघतील, अशी टीकाही करण्यात आली.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाdombivaliडोंबिवली