शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

नांदिवलीत इमारतीवर हातोडा, केडीएमसीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 00:38 IST

केडीएमसीच्या ‘ई’ प्रभागक्षेत्रातील नांदिवली येथील स्वामी समर्थ मठानजीकची बालाजी कॉम्प्लेक्स या सात मजली बेकायदा इमारतीवर बुधवारी कारवाईचा हातोडा चालवण्यात आला.

डोंबिवली: केडीएमसीच्या ‘ई’ प्रभागक्षेत्रातील नांदिवली येथील स्वामी समर्थ मठानजीकची बालाजी कॉम्प्लेक्स या सात मजली बेकायदा इमारतीवर बुधवारी कारवाईचा हातोडा चालवण्यात आला. विकास आराखड्यातील नियोजित रस्त्याच्या जागेवरच ही इमारत बांधण्यात आली होती. प्रभागक्षेत्र अधिकारी रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विकास आराखड्यातील (डीपी) नियोजित रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या या इमारतीवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, इमारतीतील रहिवासी एकत्र येऊ न त्यांनी कारवाई रोखण्याचा प्रयत्न केल्याने काहीवेळ तणावाचे वातावरण होते.विकासक आणि जमीनमालक बंटी बाळाराम म्हात्रे यांनी या इमारत बांधली होती. ही इमारत बेकायदा असल्यामुळे आयुक्त गोविंद बोडके यांनी प्रभागक्षेत्र अधिकारी आणि उपायुक्त सुनील जोशी यांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसारच ही कारवाई करण्यात आली. गायकवाड यांनी इमारतमालकाला महाराष्ट्र महापालिका अधिनियमांनुसार नोटीस बजावून ही इमारत रिकामी करण्याचे पत्र रहिवाशांना दिले होते, असे महापालिकेने म्हटले आहे. बोडके, उपायुक्त, सुनील जोशी, सहायक संचालक नगररचनाकार मारुती राठोड हे उपस्थित होते.कारवाईत ‘आय’ प्रभाग क्षेत्र अधिकारी संदीप रोकडे, ‘ह’ प्रभाग क्षेत्र अधिकारी अरुण वानखेडे, ‘फ’ प्रभाग अधिकारी अरुण भालेराव सहभागी झाले होते. पोलिसांच्या बंदोबस्तासह तीन जेसीबी, दोन पोकलेनद्वारे ही कारवाई झाली.जेसीबी, पोकलेन रोखण्याचा प्रयत्नरहिवासी राहत असलेल्या विंगवर कारवाई होताच रहिवाशांनी एकत्र येऊ न पोकलेन आणि जेसीबी रोखून तीव्र विरोध केला. त्यामुळे काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते; तोपर्यंत पथकाने डीपी रस्त्याच्या आड येणारे बांधकाम व इमारतीच्या एका विंगचे बांधकाम तोडले होते. या इमारतीत दोन विंग मिळून ५० हून अधिक नागरिक राहत असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली. कारवाईसाठी मानपाडा पोलिसांचा बंदोबस्त न मिळाल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले.सोशल मीडियावरून टीका : बेकायदा इमारतीवर झालेल्या कारवाईनंतर सोशल मीडियावरून जोरदार टीका करण्यात आली. बेकायदा इमारती उभ्या राहतात, तेव्हाच कारवाई का होत नाही? रहिवासी राहायला येईपर्यंत महापालिका प्रशासन झोपले होते का? असा सवाल करण्यात आला आहे. तसेच ही इमारत ज्या प्रभागक्षेत्र अधिकाºयांच्या काळात बांधण्यात आली, ते अधिकारी, अतिक्रमण हटाव पथकातील संबंधित कर्मचाºयांवर काय कारवाई होणार, हे प्रशासनाने स्पष्ट करावे. पारदर्शी कारभाराचे गुण गाणारे डोंबिवलीकर त्याचीही वाट बघतील, अशी टीकाही करण्यात आली.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाdombivaliडोंबिवली