शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
2
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
3
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
4
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
5
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
6
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
7
"आता काँग्रेस पूर्वीपेक्षा अधिक…"; आपल्याच पक्षासंदर्भात काय बोलले शशी थरूर? भाजपच्या धोरणांकडे 'इशारा'!
8
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
9
Maithili Thakur : "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया
10
नेटबँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! SBI, HDFC सह सर्व बँकांच्या वेबसाइटचे डोमेन बदलले; काय आहे कारण?
11
बिहार निवडणुकीत बाहुबलींचा दबदबा कायम; 'या' 12 जागांनी वाढवली उत्सुकता, कोण पुढे? पाहा...
12
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारमध्ये भाजपा-जेडीयू युतीला ऐतिहासिक आघाडी; 'राजद'ला मोठा दणका
13
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
14
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
15
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
16
भारीच! हातात हात, तयारीत भक्कम साथ; बॉयफ्रेंडच्या मदतीने 'ती' झाली DSP, 'तो' ही आहे अधिकारी
17
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
18
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
19
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
20
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
Daily Top 2Weekly Top 5

नांदिवलीत इमारतीवर हातोडा, केडीएमसीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 00:38 IST

केडीएमसीच्या ‘ई’ प्रभागक्षेत्रातील नांदिवली येथील स्वामी समर्थ मठानजीकची बालाजी कॉम्प्लेक्स या सात मजली बेकायदा इमारतीवर बुधवारी कारवाईचा हातोडा चालवण्यात आला.

डोंबिवली: केडीएमसीच्या ‘ई’ प्रभागक्षेत्रातील नांदिवली येथील स्वामी समर्थ मठानजीकची बालाजी कॉम्प्लेक्स या सात मजली बेकायदा इमारतीवर बुधवारी कारवाईचा हातोडा चालवण्यात आला. विकास आराखड्यातील नियोजित रस्त्याच्या जागेवरच ही इमारत बांधण्यात आली होती. प्रभागक्षेत्र अधिकारी रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विकास आराखड्यातील (डीपी) नियोजित रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या या इमारतीवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, इमारतीतील रहिवासी एकत्र येऊ न त्यांनी कारवाई रोखण्याचा प्रयत्न केल्याने काहीवेळ तणावाचे वातावरण होते.विकासक आणि जमीनमालक बंटी बाळाराम म्हात्रे यांनी या इमारत बांधली होती. ही इमारत बेकायदा असल्यामुळे आयुक्त गोविंद बोडके यांनी प्रभागक्षेत्र अधिकारी आणि उपायुक्त सुनील जोशी यांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसारच ही कारवाई करण्यात आली. गायकवाड यांनी इमारतमालकाला महाराष्ट्र महापालिका अधिनियमांनुसार नोटीस बजावून ही इमारत रिकामी करण्याचे पत्र रहिवाशांना दिले होते, असे महापालिकेने म्हटले आहे. बोडके, उपायुक्त, सुनील जोशी, सहायक संचालक नगररचनाकार मारुती राठोड हे उपस्थित होते.कारवाईत ‘आय’ प्रभाग क्षेत्र अधिकारी संदीप रोकडे, ‘ह’ प्रभाग क्षेत्र अधिकारी अरुण वानखेडे, ‘फ’ प्रभाग अधिकारी अरुण भालेराव सहभागी झाले होते. पोलिसांच्या बंदोबस्तासह तीन जेसीबी, दोन पोकलेनद्वारे ही कारवाई झाली.जेसीबी, पोकलेन रोखण्याचा प्रयत्नरहिवासी राहत असलेल्या विंगवर कारवाई होताच रहिवाशांनी एकत्र येऊ न पोकलेन आणि जेसीबी रोखून तीव्र विरोध केला. त्यामुळे काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते; तोपर्यंत पथकाने डीपी रस्त्याच्या आड येणारे बांधकाम व इमारतीच्या एका विंगचे बांधकाम तोडले होते. या इमारतीत दोन विंग मिळून ५० हून अधिक नागरिक राहत असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली. कारवाईसाठी मानपाडा पोलिसांचा बंदोबस्त न मिळाल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले.सोशल मीडियावरून टीका : बेकायदा इमारतीवर झालेल्या कारवाईनंतर सोशल मीडियावरून जोरदार टीका करण्यात आली. बेकायदा इमारती उभ्या राहतात, तेव्हाच कारवाई का होत नाही? रहिवासी राहायला येईपर्यंत महापालिका प्रशासन झोपले होते का? असा सवाल करण्यात आला आहे. तसेच ही इमारत ज्या प्रभागक्षेत्र अधिकाºयांच्या काळात बांधण्यात आली, ते अधिकारी, अतिक्रमण हटाव पथकातील संबंधित कर्मचाºयांवर काय कारवाई होणार, हे प्रशासनाने स्पष्ट करावे. पारदर्शी कारभाराचे गुण गाणारे डोंबिवलीकर त्याचीही वाट बघतील, अशी टीकाही करण्यात आली.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाdombivaliडोंबिवली