शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

हक्काच्या पाण्यासाठी भिवंडी पंचायत समितीवर आदिवासी महिलांचा हंडा मोर्चा

By नितीन पंडित | Updated: February 23, 2024 17:23 IST

तालुक्यातील पुंडास या ग्रामपंचायत हद्दीत मोहाचा पाडा असून त्याठिकाणी ३५ आदिवासी कुटुंबीय वास्तव्यास आहेत.

भिवंडी: ग्रामपंचायत हद्दीतील पाणीपट्टी वसुली करणाऱ्या ग्राम पाणीपुरवठा समितीने आदिवासी वस्ती असलेल्य कुटुंबियांचे पाणी तब्बल तीन महिन्यांपासून बंद केल्याचा संतापजनक प्रकार तालुक्यातील पुंडास येथील मोहाचा पाडा येथे समोर आला असून हक्काच्या पाण्यासाठी आदिवासी महिलांनी श्रमजीवी कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी भिवंडी पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढला होता.यावेळी आदिवासी महिलांनी थेट गट विकास अधिकारी डॉ.प्रदीप घोरपडे यांच्या टेबलावरच हंडे ठेऊन आपली कैफियत गट विकास अधिकाऱ्यांसमोर मांडली.

तालुक्यातील पुंडास या ग्रामपंचायत हद्दीत मोहाचा पाडा असून त्याठिकाणी ३५ आदिवासी कुटुंबीय वास्तव्यास आहेत. या गावत मुंबई महानगरपालिकेच्या पाईप लाईन वरील नळ जोडणीतून पाणीपुरवठा केला जातो.पाणीपट्टीचे बिल ग्रामपंचायतीच्या नावाने दिले जाते, परंतु गावातील पाणीपट्टी वसुली गावातील ग्राम पाणीपुरवठा समिती करीत असून दरमहा १०० रुपये पाणीपट्टी गावकऱ्यांकडून घेते.मात्र येथील आदिवासी पाड्यातील नागरिकांनी पाणीपट्टी भरली नसल्याचा आरोप करीत थेट या वस्तीतील पाणीपुरवठा खंडित केला आहे.या घटनेची माहिती स्थानिक महिलांनी श्रमजीवी संघटनेचे प्रवक्ता प्रमोद पवार व तालुकाध्यक्ष सुनील लोणे यांना दिल्या नंतर त्यांनी या महिलांना घेऊन थेट पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी डॉ प्रदीप घोरपडे यांच्या दालनात हंडा कळशी घेऊन दाखल होत आंदोलन केले.

मुंबई महानगर पालिका पाणीपुरवठा संबंधित ग्रामपंचायतीस केल्या नंतर पाणीपट्टी त्यांच्या कडून वसूल केली जाते पण तालुक्यातील तब्बल ६८ ग्रामपंचायत हद्दीत अनधिकृत पणे ग्राम विकास समिती पाणीपट्टी वसूल करते असा खळबळजनक आरोप प्रमोद पवार यांनी केला आहे.आदिवासी कुटुंबीयांना पिण्याच्या पाण्याची पासून वंचित ठेवणाऱ्या संबंधित ग्रामपंचायत सरपंच, ग्राम विकास अधिकारी व अनधिकृत पाणीपट्टी वसुली करणाऱ्या विरोधात अट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करावेत अशी मागणी तालुकाध्यक्ष सुनील लोणे यांनी केली आहे.

तालुक्यातील ६८ गावांमध्ये पाणीपट्टी वसुली करण्याचे काम स्थानिक ग्राम पाणी पुरवठा समिती करीत असतात.परंतु त्याची पावती कोणत्याही कुटुंबीयांना दिली जात नाही.या बाबत २०२१ मध्ये मोठा वाद उत्पन्न झाला असता १५ फेब्रुवारी २०२१ रोजी भिवंडी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे झालेल्या बैठकीत ग्रामपंचायत हद्दीतील अनधिकृत पाणी पट्टी वसुली स्थानिक गाव पातळीवरील समिती कडून तत्काळ काढून घेण्याचा निर्णय झाला पण आज पर्यंत त्याची अंमलबजावणी करण्याचा विसर प्रशासनाला पडला आहे अशी प्रतिक्रिया श्रमजीवी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील लोणे यांनी दिली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी