शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

हक्काच्या पाण्यासाठी भिवंडी पंचायत समितीवर आदिवासी महिलांचा हंडा मोर्चा

By नितीन पंडित | Updated: February 23, 2024 17:23 IST

तालुक्यातील पुंडास या ग्रामपंचायत हद्दीत मोहाचा पाडा असून त्याठिकाणी ३५ आदिवासी कुटुंबीय वास्तव्यास आहेत.

भिवंडी: ग्रामपंचायत हद्दीतील पाणीपट्टी वसुली करणाऱ्या ग्राम पाणीपुरवठा समितीने आदिवासी वस्ती असलेल्य कुटुंबियांचे पाणी तब्बल तीन महिन्यांपासून बंद केल्याचा संतापजनक प्रकार तालुक्यातील पुंडास येथील मोहाचा पाडा येथे समोर आला असून हक्काच्या पाण्यासाठी आदिवासी महिलांनी श्रमजीवी कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी भिवंडी पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढला होता.यावेळी आदिवासी महिलांनी थेट गट विकास अधिकारी डॉ.प्रदीप घोरपडे यांच्या टेबलावरच हंडे ठेऊन आपली कैफियत गट विकास अधिकाऱ्यांसमोर मांडली.

तालुक्यातील पुंडास या ग्रामपंचायत हद्दीत मोहाचा पाडा असून त्याठिकाणी ३५ आदिवासी कुटुंबीय वास्तव्यास आहेत. या गावत मुंबई महानगरपालिकेच्या पाईप लाईन वरील नळ जोडणीतून पाणीपुरवठा केला जातो.पाणीपट्टीचे बिल ग्रामपंचायतीच्या नावाने दिले जाते, परंतु गावातील पाणीपट्टी वसुली गावातील ग्राम पाणीपुरवठा समिती करीत असून दरमहा १०० रुपये पाणीपट्टी गावकऱ्यांकडून घेते.मात्र येथील आदिवासी पाड्यातील नागरिकांनी पाणीपट्टी भरली नसल्याचा आरोप करीत थेट या वस्तीतील पाणीपुरवठा खंडित केला आहे.या घटनेची माहिती स्थानिक महिलांनी श्रमजीवी संघटनेचे प्रवक्ता प्रमोद पवार व तालुकाध्यक्ष सुनील लोणे यांना दिल्या नंतर त्यांनी या महिलांना घेऊन थेट पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी डॉ प्रदीप घोरपडे यांच्या दालनात हंडा कळशी घेऊन दाखल होत आंदोलन केले.

मुंबई महानगर पालिका पाणीपुरवठा संबंधित ग्रामपंचायतीस केल्या नंतर पाणीपट्टी त्यांच्या कडून वसूल केली जाते पण तालुक्यातील तब्बल ६८ ग्रामपंचायत हद्दीत अनधिकृत पणे ग्राम विकास समिती पाणीपट्टी वसूल करते असा खळबळजनक आरोप प्रमोद पवार यांनी केला आहे.आदिवासी कुटुंबीयांना पिण्याच्या पाण्याची पासून वंचित ठेवणाऱ्या संबंधित ग्रामपंचायत सरपंच, ग्राम विकास अधिकारी व अनधिकृत पाणीपट्टी वसुली करणाऱ्या विरोधात अट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करावेत अशी मागणी तालुकाध्यक्ष सुनील लोणे यांनी केली आहे.

तालुक्यातील ६८ गावांमध्ये पाणीपट्टी वसुली करण्याचे काम स्थानिक ग्राम पाणी पुरवठा समिती करीत असतात.परंतु त्याची पावती कोणत्याही कुटुंबीयांना दिली जात नाही.या बाबत २०२१ मध्ये मोठा वाद उत्पन्न झाला असता १५ फेब्रुवारी २०२१ रोजी भिवंडी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे झालेल्या बैठकीत ग्रामपंचायत हद्दीतील अनधिकृत पाणी पट्टी वसुली स्थानिक गाव पातळीवरील समिती कडून तत्काळ काढून घेण्याचा निर्णय झाला पण आज पर्यंत त्याची अंमलबजावणी करण्याचा विसर प्रशासनाला पडला आहे अशी प्रतिक्रिया श्रमजीवी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील लोणे यांनी दिली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी