शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

हक्काच्या पाण्यासाठी भिवंडी पंचायत समितीवर आदिवासी महिलांचा हंडा मोर्चा

By नितीन पंडित | Updated: February 23, 2024 17:23 IST

तालुक्यातील पुंडास या ग्रामपंचायत हद्दीत मोहाचा पाडा असून त्याठिकाणी ३५ आदिवासी कुटुंबीय वास्तव्यास आहेत.

भिवंडी: ग्रामपंचायत हद्दीतील पाणीपट्टी वसुली करणाऱ्या ग्राम पाणीपुरवठा समितीने आदिवासी वस्ती असलेल्य कुटुंबियांचे पाणी तब्बल तीन महिन्यांपासून बंद केल्याचा संतापजनक प्रकार तालुक्यातील पुंडास येथील मोहाचा पाडा येथे समोर आला असून हक्काच्या पाण्यासाठी आदिवासी महिलांनी श्रमजीवी कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी भिवंडी पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढला होता.यावेळी आदिवासी महिलांनी थेट गट विकास अधिकारी डॉ.प्रदीप घोरपडे यांच्या टेबलावरच हंडे ठेऊन आपली कैफियत गट विकास अधिकाऱ्यांसमोर मांडली.

तालुक्यातील पुंडास या ग्रामपंचायत हद्दीत मोहाचा पाडा असून त्याठिकाणी ३५ आदिवासी कुटुंबीय वास्तव्यास आहेत. या गावत मुंबई महानगरपालिकेच्या पाईप लाईन वरील नळ जोडणीतून पाणीपुरवठा केला जातो.पाणीपट्टीचे बिल ग्रामपंचायतीच्या नावाने दिले जाते, परंतु गावातील पाणीपट्टी वसुली गावातील ग्राम पाणीपुरवठा समिती करीत असून दरमहा १०० रुपये पाणीपट्टी गावकऱ्यांकडून घेते.मात्र येथील आदिवासी पाड्यातील नागरिकांनी पाणीपट्टी भरली नसल्याचा आरोप करीत थेट या वस्तीतील पाणीपुरवठा खंडित केला आहे.या घटनेची माहिती स्थानिक महिलांनी श्रमजीवी संघटनेचे प्रवक्ता प्रमोद पवार व तालुकाध्यक्ष सुनील लोणे यांना दिल्या नंतर त्यांनी या महिलांना घेऊन थेट पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी डॉ प्रदीप घोरपडे यांच्या दालनात हंडा कळशी घेऊन दाखल होत आंदोलन केले.

मुंबई महानगर पालिका पाणीपुरवठा संबंधित ग्रामपंचायतीस केल्या नंतर पाणीपट्टी त्यांच्या कडून वसूल केली जाते पण तालुक्यातील तब्बल ६८ ग्रामपंचायत हद्दीत अनधिकृत पणे ग्राम विकास समिती पाणीपट्टी वसूल करते असा खळबळजनक आरोप प्रमोद पवार यांनी केला आहे.आदिवासी कुटुंबीयांना पिण्याच्या पाण्याची पासून वंचित ठेवणाऱ्या संबंधित ग्रामपंचायत सरपंच, ग्राम विकास अधिकारी व अनधिकृत पाणीपट्टी वसुली करणाऱ्या विरोधात अट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करावेत अशी मागणी तालुकाध्यक्ष सुनील लोणे यांनी केली आहे.

तालुक्यातील ६८ गावांमध्ये पाणीपट्टी वसुली करण्याचे काम स्थानिक ग्राम पाणी पुरवठा समिती करीत असतात.परंतु त्याची पावती कोणत्याही कुटुंबीयांना दिली जात नाही.या बाबत २०२१ मध्ये मोठा वाद उत्पन्न झाला असता १५ फेब्रुवारी २०२१ रोजी भिवंडी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे झालेल्या बैठकीत ग्रामपंचायत हद्दीतील अनधिकृत पाणी पट्टी वसुली स्थानिक गाव पातळीवरील समिती कडून तत्काळ काढून घेण्याचा निर्णय झाला पण आज पर्यंत त्याची अंमलबजावणी करण्याचा विसर प्रशासनाला पडला आहे अशी प्रतिक्रिया श्रमजीवी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील लोणे यांनी दिली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी