शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
2
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
3
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
4
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
5
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
6
'नमस्कार फ्रॉम स्पेस; तुम्हीही या प्रवासाचा आनंद घ्या', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video
7
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
8
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
9
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
10
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
11
मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...
12
Video: धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
13
Viral Video: धापा टाकत रुग्णालयात पोहोचला, डॉक्टरांनी विचारताच उघडली बॅग, पाहून अनेकांची बोलती बंद!
14
"कॉम्प्रोमाइज कर तुला रोल देतो", टीव्ही अभिनेत्याला दिग्दर्शकाने दिलेली ऑफर, केला धक्कादायक खुलासा
15
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
16
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
17
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
18
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
19
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
20
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा

दिव्यात अतिक्रमणांवर पडणार हातोडा; उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 23:55 IST

५00 पेक्षा जास्त संसार येणार रस्त्यावर

- सुरेश लोखंडे ठाणे : अतिवृष्टीमुळे अलिकडेच हाहाकार उडालेल्या दिव्यातील अतिक्रमणांवर सोमवारी कारवाईची कुºहाड कोसळणार आहे. सरकारी जागेवरील तब्बल १९ चाळी तोडण्याच्या धडक कारवाईचे नियोजन न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने केले आहे. या कारवाईमुळे ५०० हून अधिक घरांमधील हजारो रहिवाशांचा संसार रस्त्यावर येणार आहे. यादरम्यान, कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी या चाळींमधील हालचालींवर आधीपासूनच लक्ष केंद्रित केले आहे.दिवा डम्पिंग ग्राउंडच्या उजव्या बाजूकडील दिवा खाडीकिनाऱ्याची खारफुटी नष्ट करून या अनधिकृत, बेकायदेशीर चाळी सरकारी जागेवर भूमाफियांनी बांधल्या आहेत. त्यामधील घरे अत्यल्प किमतीत मिळत असल्यामुळे बहुतांश गरजू रहिवाशांनी ती खरेदी केली आहेत. मात्र, यातील १९ ते २० चाळी सरकारी भूखंडांवर उभ्या असल्याचे निदर्शनास आले आहे.अनेक घरांत परकीय घुसखोर असण्याची शक्यतारेल्वेच्या बोगीप्रमाणे या चाळींमधील घरे बांधण्यात आली आहेत. त्यातील रहिवाशांपैकी १० ते २० टक्के रहिवासी भारतीय नसल्याची शक्यताही वर्तविली जात आहे. दाटीवाटीने असलेल्या या चाळींतील घरांमध्ये काय चालते, याची कल्पनाही करवत नसल्याची शंका प्रशासनाकडून व्यक्त होत आहे. या चाळींमधून राष्ट्रविघातक कारवाया होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. यास वेळीच पायबंद घालण्याच्या दृष्टीने या चाळींचे अतिक्रमण नष्ट करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे.भूमाफिया महिलांना पुढे करण्याची भीतीअतिक्रमणे तोडण्याची नव्या वर्षातील पहिलीच, तर गेल्या काही वर्षांमधील कदाचित ही सर्वात मोठी धडक कारवाई जिल्हा प्रशासनाकडून केली जाणार आहे. एका चाळीत ३० ते ३५ घरे दाटीवाटीने बांधण्यात आली आहेत.या घरांच्या १९ चाळींची नोंद घेऊन त्या तोडण्याची धडक कारवाई सोमवारी केली जाणार आहे. यासाठी ठाणे महापालिकेकडून चार जेसीबी व कर्मचारी, मनुष्यबळ उपलब्ध झाले आहे. शंभरपेक्षा अधिक पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मनुष्यबळाचे नियोजन केले आहे.50% महिला पोलिसांचादेखील या कारवाईत समावेश केलेला आहे. कारण, या कारवाईवेळी भूमाफिया महिलांना पुढे करून विरोध करण्याची शक्यता आहे. यावेळी होणारा कडवा विरोध हाणून पाडण्यासाठी जिल्हापातळीवर बैठका घेऊन चोख बंदोबस्तात या चाळींचे अतिक्रमण जमीनदोस्त केले जाणार आहे.तोडण्यात येणाºया या चाळी 2010 नंतरच्या असल्यामुळे त्या कायदेशीररीत्या तोडल्या जात आहेत. त्या सरकारी भूखंडावर भूमाफियांनी बांधल्या आहेत. धडक कारवाई करून तोडण्यात येणाºया या चाळींखालील दीड ते दोन एकरचा भूखंड मोकळा केला जाणार आहे.दिवा खाडीतील खारफुटी व कांदळवन नष्ट करून या चाळींचे अतिक्रमण भूमाफियांनी केल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगितले जात आहे.यंदाच्या पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे या चाळी पाण्याखाली गेल्या होत्या. त्यातील रहिवाशांना वाचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागली होती.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टEnchroachmentअतिक्रमण