शहरं
Join us  
Trending Stories
1
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
2
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
3
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
4
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
5
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
6
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
7
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
8
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
9
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
10
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
11
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
12
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
13
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
14
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
15
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
16
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
17
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
18
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
19
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
20
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची

दिव्यात अतिक्रमणांवर पडणार हातोडा; उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 23:55 IST

५00 पेक्षा जास्त संसार येणार रस्त्यावर

- सुरेश लोखंडे ठाणे : अतिवृष्टीमुळे अलिकडेच हाहाकार उडालेल्या दिव्यातील अतिक्रमणांवर सोमवारी कारवाईची कुºहाड कोसळणार आहे. सरकारी जागेवरील तब्बल १९ चाळी तोडण्याच्या धडक कारवाईचे नियोजन न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने केले आहे. या कारवाईमुळे ५०० हून अधिक घरांमधील हजारो रहिवाशांचा संसार रस्त्यावर येणार आहे. यादरम्यान, कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी या चाळींमधील हालचालींवर आधीपासूनच लक्ष केंद्रित केले आहे.दिवा डम्पिंग ग्राउंडच्या उजव्या बाजूकडील दिवा खाडीकिनाऱ्याची खारफुटी नष्ट करून या अनधिकृत, बेकायदेशीर चाळी सरकारी जागेवर भूमाफियांनी बांधल्या आहेत. त्यामधील घरे अत्यल्प किमतीत मिळत असल्यामुळे बहुतांश गरजू रहिवाशांनी ती खरेदी केली आहेत. मात्र, यातील १९ ते २० चाळी सरकारी भूखंडांवर उभ्या असल्याचे निदर्शनास आले आहे.अनेक घरांत परकीय घुसखोर असण्याची शक्यतारेल्वेच्या बोगीप्रमाणे या चाळींमधील घरे बांधण्यात आली आहेत. त्यातील रहिवाशांपैकी १० ते २० टक्के रहिवासी भारतीय नसल्याची शक्यताही वर्तविली जात आहे. दाटीवाटीने असलेल्या या चाळींतील घरांमध्ये काय चालते, याची कल्पनाही करवत नसल्याची शंका प्रशासनाकडून व्यक्त होत आहे. या चाळींमधून राष्ट्रविघातक कारवाया होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. यास वेळीच पायबंद घालण्याच्या दृष्टीने या चाळींचे अतिक्रमण नष्ट करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे.भूमाफिया महिलांना पुढे करण्याची भीतीअतिक्रमणे तोडण्याची नव्या वर्षातील पहिलीच, तर गेल्या काही वर्षांमधील कदाचित ही सर्वात मोठी धडक कारवाई जिल्हा प्रशासनाकडून केली जाणार आहे. एका चाळीत ३० ते ३५ घरे दाटीवाटीने बांधण्यात आली आहेत.या घरांच्या १९ चाळींची नोंद घेऊन त्या तोडण्याची धडक कारवाई सोमवारी केली जाणार आहे. यासाठी ठाणे महापालिकेकडून चार जेसीबी व कर्मचारी, मनुष्यबळ उपलब्ध झाले आहे. शंभरपेक्षा अधिक पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मनुष्यबळाचे नियोजन केले आहे.50% महिला पोलिसांचादेखील या कारवाईत समावेश केलेला आहे. कारण, या कारवाईवेळी भूमाफिया महिलांना पुढे करून विरोध करण्याची शक्यता आहे. यावेळी होणारा कडवा विरोध हाणून पाडण्यासाठी जिल्हापातळीवर बैठका घेऊन चोख बंदोबस्तात या चाळींचे अतिक्रमण जमीनदोस्त केले जाणार आहे.तोडण्यात येणाºया या चाळी 2010 नंतरच्या असल्यामुळे त्या कायदेशीररीत्या तोडल्या जात आहेत. त्या सरकारी भूखंडावर भूमाफियांनी बांधल्या आहेत. धडक कारवाई करून तोडण्यात येणाºया या चाळींखालील दीड ते दोन एकरचा भूखंड मोकळा केला जाणार आहे.दिवा खाडीतील खारफुटी व कांदळवन नष्ट करून या चाळींचे अतिक्रमण भूमाफियांनी केल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगितले जात आहे.यंदाच्या पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे या चाळी पाण्याखाली गेल्या होत्या. त्यातील रहिवाशांना वाचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागली होती.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टEnchroachmentअतिक्रमण