शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यात अतिक्रमणांवर पडणार हातोडा; उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 23:55 IST

५00 पेक्षा जास्त संसार येणार रस्त्यावर

- सुरेश लोखंडे ठाणे : अतिवृष्टीमुळे अलिकडेच हाहाकार उडालेल्या दिव्यातील अतिक्रमणांवर सोमवारी कारवाईची कुºहाड कोसळणार आहे. सरकारी जागेवरील तब्बल १९ चाळी तोडण्याच्या धडक कारवाईचे नियोजन न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने केले आहे. या कारवाईमुळे ५०० हून अधिक घरांमधील हजारो रहिवाशांचा संसार रस्त्यावर येणार आहे. यादरम्यान, कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी या चाळींमधील हालचालींवर आधीपासूनच लक्ष केंद्रित केले आहे.दिवा डम्पिंग ग्राउंडच्या उजव्या बाजूकडील दिवा खाडीकिनाऱ्याची खारफुटी नष्ट करून या अनधिकृत, बेकायदेशीर चाळी सरकारी जागेवर भूमाफियांनी बांधल्या आहेत. त्यामधील घरे अत्यल्प किमतीत मिळत असल्यामुळे बहुतांश गरजू रहिवाशांनी ती खरेदी केली आहेत. मात्र, यातील १९ ते २० चाळी सरकारी भूखंडांवर उभ्या असल्याचे निदर्शनास आले आहे.अनेक घरांत परकीय घुसखोर असण्याची शक्यतारेल्वेच्या बोगीप्रमाणे या चाळींमधील घरे बांधण्यात आली आहेत. त्यातील रहिवाशांपैकी १० ते २० टक्के रहिवासी भारतीय नसल्याची शक्यताही वर्तविली जात आहे. दाटीवाटीने असलेल्या या चाळींतील घरांमध्ये काय चालते, याची कल्पनाही करवत नसल्याची शंका प्रशासनाकडून व्यक्त होत आहे. या चाळींमधून राष्ट्रविघातक कारवाया होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. यास वेळीच पायबंद घालण्याच्या दृष्टीने या चाळींचे अतिक्रमण नष्ट करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे.भूमाफिया महिलांना पुढे करण्याची भीतीअतिक्रमणे तोडण्याची नव्या वर्षातील पहिलीच, तर गेल्या काही वर्षांमधील कदाचित ही सर्वात मोठी धडक कारवाई जिल्हा प्रशासनाकडून केली जाणार आहे. एका चाळीत ३० ते ३५ घरे दाटीवाटीने बांधण्यात आली आहेत.या घरांच्या १९ चाळींची नोंद घेऊन त्या तोडण्याची धडक कारवाई सोमवारी केली जाणार आहे. यासाठी ठाणे महापालिकेकडून चार जेसीबी व कर्मचारी, मनुष्यबळ उपलब्ध झाले आहे. शंभरपेक्षा अधिक पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मनुष्यबळाचे नियोजन केले आहे.50% महिला पोलिसांचादेखील या कारवाईत समावेश केलेला आहे. कारण, या कारवाईवेळी भूमाफिया महिलांना पुढे करून विरोध करण्याची शक्यता आहे. यावेळी होणारा कडवा विरोध हाणून पाडण्यासाठी जिल्हापातळीवर बैठका घेऊन चोख बंदोबस्तात या चाळींचे अतिक्रमण जमीनदोस्त केले जाणार आहे.तोडण्यात येणाºया या चाळी 2010 नंतरच्या असल्यामुळे त्या कायदेशीररीत्या तोडल्या जात आहेत. त्या सरकारी भूखंडावर भूमाफियांनी बांधल्या आहेत. धडक कारवाई करून तोडण्यात येणाºया या चाळींखालील दीड ते दोन एकरचा भूखंड मोकळा केला जाणार आहे.दिवा खाडीतील खारफुटी व कांदळवन नष्ट करून या चाळींचे अतिक्रमण भूमाफियांनी केल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगितले जात आहे.यंदाच्या पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे या चाळी पाण्याखाली गेल्या होत्या. त्यातील रहिवाशांना वाचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागली होती.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टEnchroachmentअतिक्रमण