शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

निम्मी रक्कम शासन भरणार

By admin | Updated: March 17, 2015 01:15 IST

राज्यात वीज बिल थकबाकीमुळे बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या बिलांची जवळपास अर्धी रक्कम शासन देईल आणि या योजना लवकरात लवकर सुरू करण्यात येतील,

मुंबई : राज्यात वीज बिल थकबाकीमुळे बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या बिलांची जवळपास अर्धी रक्कम शासन देईल आणि या योजना लवकरात लवकर सुरू करण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत दिले. या योजनांचा आढावा घेण्यास ऊर्जामंत्र्यांना सांगण्यात आले आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. अनेक पाणी योजना बंद असल्याबद्दल दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी व्यक्त केलेल्या नाराजीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी वरील आश्वासन दिले. याबाबतचा मूळ प्रश्न भाजपाचे प्रकाश भारसाकळे यांनी विचारला होता. अकोला जिल्ह्यातील अकोट शहर व तेल्हारा तालुक्याच्या पाणीपुरवठा योजनेच्या समस्यांकडे त्यांनी लक्ष वेधले. या योजनेची दुरुस्ती लवकरच केली जाईल, असे आश्वासन पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले. पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल व दुरुस्तीचे काम जिल्हा परिषदांऐवजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडेच ठेवण्याची मागणी दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी केली. राज्यातील अन्य ठिकाणी ज्या पाणीपुरवठा योजना बंद आहेत, त्या लवकरात लवकर दुरु स्त करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे लोणीकर यांनी सांगितले. पाणी नसलेल्या ठिकाणी टँकर पुरवण्याचे अधिकार तहसीलदारांना आम्ही दिले होते; परंतु या सरकारने हे अधिकार काढून टाकले असून, ते अधिकार पुन्हा प्रदान करावेत, अशी मागणी अजित पवार यांनी केली. तहसीलदारांना हे अधिकार आधीच देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)