शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

खर्च निम्म्यावर, उपस्थितांची जागा घटवली

By admin | Updated: January 24, 2017 05:50 IST

पाच कोटींचा निधी गोळा करण्यासाठी धडपडणाऱ्या आयोजकांना आतापर्यंत अवघा दोन कोटींचा निधी गोळा करण्यात यश आल्याने

डोंबिवली : पाच कोटींचा निधी गोळा करण्यासाठी धडपडणाऱ्या आयोजकांना आतापर्यंत अवघा दोन कोटींचा निधी गोळा करण्यात यश आल्याने यंदाच्या साहित्य संमेलनावर काटकसरीचे मोठे सावट असेल, अशी कबुली सोमवारी आयोजकांनी दिली. त्यामुळे आमदार निधी आणि नगरसेवक निधीवरच तूर्त आयोजकांची भिस्त आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाला साकडे घालण्यात आले आहे. त्याचबरोबर मुख्य मंडपाचा आकार कमी करून उपस्थितांची जागा तीन हजारांनी घटविण्यात येणार आहे.संमेलनाचे आयोजन आगरी समाजाकडे असल्याने यंदा भोजनात सामिष पदार्थांचा समावेश असेल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र भोजन शाकाहारी असेल, असे सांगत त्यासाठी डोंबिवली-कल्याणमधील व्यापारी धान्य, तेल, मसाले पुरविणार आहेत आणि त्यामुळे भोजनावळीवरील ३० लाखांचा खर्च वाचेल, असा तपशील आयोजकांनी पुरविला.स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. डोंबिवलीच्या साहित्य संमेलनाला ठाणे, मीरा-भाईंदर आणि अंबरनाथ पालिकेने निधी देण्याचे कबूल केले होेते. त्यांच्या निधी वितरणात आचारसंहितेचा अडसर आल्याने त्यांच्याकडून मिळणारा निधी अडकून पडला. नगरसेवकांकडूनही प्रत्येकी एक लाख रुपयांचा निधी मिळणे अपेक्षित होते. तो मिळावा म्हणून निवडणूक आयोगाकडे विनंती पत्र पाठविले जाणार आहे. संमेलनासाठी एक कोटी ५८ लाखांचा निधी जमा झाला आहे. अजून ६० लाखांचा निधी मिळवून देण्याचे आश्वासन राज्यमंत्री चव्हाण यांनी दिले आहे. संमेलनासाठी विद्यार्थ्यांकडून दहा रुपये व शिक्षकांकडून स्वागत शुल्क घेण्याचा प्रस्ताव महामंडळाकडून मांडण्यात आला होता. त्यावर अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही, असे ते म्हणाले.भोजनासाठी कल्याण व डोंबिवलीतील काही किराणा व भाजीपाला व्यापाऱ्यांनी अन्नधान्य, तेल, मसाला देण्यास तयारी दर्शविली आहे. त्यामुळे संमेलनाच्या भोजनावळीवरील जवळपास २५ ते ३० लाखांचा खर्च वाचणार आहे. भोजनाचा बेत साधा आणि शाकाहारी असेल. त्याचा मेन्यू अद्याप ठरलेला नाही, असे वझे म्हणाले. (प्रतिनिधी)