शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

कसारा घाटासह माळशेज घाटात बिबट्यांचा वाढता वावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 00:15 IST

शहापूरच्या कसारा घाटासह मुरबाडच्या माळशेज घाटात बिबट्यांचा वावर असल्याचे आढळून आले.

- सुरेश लोखंडेठाणे : शहापूरच्या कसारा घाटासह मुरबाडच्या माळशेज घाटात बिबट्यांचा वावर असल्याचे आढळून आले. पावसाळ्यातील दाट जंगलाऐवजी ते आता मोकळ्या माळरानावर दिसत आहेत. त्यांच्या नजरेत सध्या भीती नसली, तरी ते कोणत्याही क्षणी हल्ला करण्याची शक्यता आहे. यामुळे जंगलात जाताना सावधानता बाळगण्याची गरज व्यक्त करून वनविभागाद्वारे बचावात्मक जनजागृतीदेखील केली जात आहे.माळशेजसह कसारा घाटात दोन वर्षांपूर्वी २०१५ पर्यंत तरी बिबट्यांचा फारसा वावर नव्हता. मात्र, जुन्नरचे जंगल व पनवेलच्या अभयारण्यातील या बिबट्यांनी आता कसारा व माळशेज घाटांत वास्तव्य सुरू केले. माळशेज घाटाच्या या सह्याद्री पर्वताच्या रांगांच्या जंगलात सध्या सुमारे चार ते पाच बिबट्यांचे वास्तव्य आढळून आल्याचा दुजोरा वनअधिकारी (आरएफओ) तुकाराम हिरवे यांनी दिला. तुरळक घटनावगळता सध्या त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. दाट जंगलात गेलेल्या शेळ्या, मेंढ्यांसह जनावरांवर त्यांच्याकडून हल्ला होऊ शकता. यावर मात करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.बिबट्या जंगलात आढळल्याचे कळताच त्यात्या गावांमध्ये जाऊन वस्तुस्थिती समजून घेतली जात आहे. आतापर्यंत ज्याज्या गावांच्या जंगल परिसरात बिबट्या आढळल्याचे लक्षात येताच तेथील शासनाच्या कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेऊन जागृती सुरू आहे. यामध्ये ग्रामसेवक, शिक्षक, तलाठी, पोलीस पाटील आदी कर्मचाºयांच्या कार्यशाळा घेऊन बिबट्यापासून बचावात्मक उपाययोजना सांगितल्या आहेत. आताही ३० आॅक्टोबर रोजी टोकावडे पोलीस ठाणे परिसरातील पोलीस पाटील यांची कार्यशाळा आयोजित केली. सुमारे ७५ पोलीस पाटील या कार्यशाळेत उपस्थित राहणार असल्याचे हिरवे यांनी सांगितले. वस्तीमध्ये येऊन बिबट्याचा सद्य:स्थितीला हल्ला होणार नाही. पण, ते वावरत असलेल्या दाट जंगलात त्याच्याकडून हल्ला होण्याची शक्यता आहे. सद्य:स्थितीला त्यांचा प्रजननकाळ सुरू असल्यामुळे त्यांना भीती वाटत नाही. पण, त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी वावर दिसल्यास ते हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. याची जाणीव ठेवून माळशेज व कसारा घाटात निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी वीकेण्डला धावणाºया मुंबई, ठाणे परिसरातील पर्यटक तसेच शेतकरी, मेंढपाळ आणि गुराख्यांना या बिबट्यांपासून सावधान राहण्याचा इशारा वनखात्याने दिला.>शोधासाठी जंगल पिंजून काढले होते; आदिवासी गावपाड्यांच्या जंगलपट्ट्यांत बिबट्याचा हैदोसजुन्नर व पनवेल परिसरांतील अभयारण्यातून आलेल्या या बिबट्यांनी मागील दोन ते तीन वर्षांपासून या जंगल परिसरात हैदोस घातला आहे. सध्या त्यांच्याकडून नुकसान झाले नाही. मात्र, २०१६ मध्ये कल्याण-नगर या राष्टÑीय महामार्गावरील टोकावडे गावापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील साखरवाडी, मोरोशी, सोनावळे, सिंगापूर, शिरोशी, माळ, सावरणे, हेदवली, खापरी, फांगणे, फांगूळ, गव्हाण, मानिवली, पळू या आदिवासी गावपाड्यांच्या जंगलपट्ट्यात बिबट्याने हैदोस घातला होता. त्यास पकडण्यासाठी सुमारे २६ दिवस वनविभागाने सुमारे ७० जवानांच्या सशस्त्र दलाच्या पथकास तैनात करून जंगल पिंजून काढले होते. यावेळी त्याने सोनावळे येथील शेतकरी बारकू भोईर यांच्या पाठीमागून हल्ला करून मानेला पकडल होते. तर, सिंगापूरजवळील वाघेवाडीतील मीराबाई वारे यांच्यावर पहाटेच्या वेळी हल्ला करून ठार केले होते.या दोन जणांसह २३ गायी, शेळ्या, मेंढ्या फस्त केल्या होत्या. यावेळी साखरवाडी, पांगूळगव्हाण, मोरोशी या गावांच्या जंगलात दोन पिंजरे व ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले. त्यानंतर, सशस्त्र दलासह स्थानिक पोलीस, सशस्त्र पोलीस, राज्य राखीव दल, दंगल नियंत्रण आणि खाजगी वन्यप्राणिमित्र आदींच्या सुमारे १०० ते १५० जणांच्या पथकाने मोरोशी, सिंगापूर, सोनावळे, पळू या गावांचे जंगल याआधी पिंजून काढलेले आहे.साखरेधार गावातील शेतकरी मधुकर पवार यांच्या चार बकºया आॅगस्ट २०१५ मध्ये बिबट्याने खाल्ल्या होत्या. तो बिबट्या या साखरेधार गावाजवळील फार्महाउसच्या खोल्यांमधील अडगळीच्या सामानाचा सहारा घेऊन अंधाºया खोलीत बसलेला असताना त्यास गुंगीच्या औषधाचे इंजेक्शन ब्लोपाइपमधून सोडून त्याला मारले होते.