शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...
3
टेस्लाचा मोठा निर्णय! भारतात 'स्वस्त' इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी; २ नवीन मॉडेल लाँच, काय आहे किंमत?
4
झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणी त्यांच्याच चुलत भावाला अटक; सिंगापूर यॉट पार्टीशी काय संबंध?
5
TATA च्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार उसळी; सोन्यातील तेजीदरम्यानही ब्रोकरेजचा विश्वास कायम, तुमच्याकडे आहे का?
6
सोनम वांगचूक यांना भेटायला तुरुंगात पोहोचल्या पत्नी गीतांजली! पुढे काय करणार? सांगितला प्लॅन
7
Priyanka Gandhi : Video - प्रियंका गांधींनी का मागितली अभिनेत्री आलिया भटची माफी?, टॅग करून म्हणाल्या...
8
"स्मिता पाटीलच्या मृतदेहावर मी मेकअप करत होतो आणि डोळ्यातून...", अभिनेत्रीच्या मेकअप आर्टिस्टचा खुलासा
9
Rohit Sharma Diet Plan : रोहित शर्माचा नवीन लूक, दहा किलो वजन घटवले; 'हिटमॅन'चा डाएट प्लान आला समोर
10
सोनं जोमात... ग्राहक कोमात...! एवढं सुसाट सुटलंय की थांबायचं नाव नाही; विक्रमी पातळीवर पोहोचलंय, जाणून घ्या आपल्या शहरातील लेटेस्ट रेट
11
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
12
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
13
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
14
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
15
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
16
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
17
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
18
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
19
तुमच्याकडे असलेलं १० रूपयांचं नाणं खरं की खोटं?; RBI नं सांगितलं सत्य, वाचा काय आहे प्रकार?
20
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा

ठाणे जिल्ह्यातील ३७६ ग्रामपंचायती कोरोनामुक्त, रुग्ण नसणाऱ्या गावांत हिरवा झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 00:50 IST

Coronavirus Thane News : ज्या ग्रामपंचायतींमध्ये २८ दिवसांत एकाही नवीन रुग्णाची नोंद नसणाऱ्या ग्रामपंचायत क्षेत्रात हिरवा झेंडा लावण्यात येत आहे. याची फलश्रुती म्हणून जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील ३७६ ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. 

ठाणे  - ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध स्तरांवर उपाययोजना करण्यात येत आहे. ठाणे जिल्हा परिषद प्रशासनासह आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्र घोषित करणे, त्या क्षेत्रातील घरांचे सर्वेक्षण करणे आदींसह ज्या ग्रामपंचायतींमध्ये २८ दिवसांत एकाही नवीन रुग्णाची नोंद नसणाऱ्या ग्रामपंचायत क्षेत्रात हिरवा झेंडा लावण्यात येत आहे. याची फलश्रुती म्हणून जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील ३७६ ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील शहरी भागात मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केला. त्या वेळी जिल्ह्यातील अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, शहापूर आणि मुरबाड या तालुक्यांमध्ये सुरुवातीच्या काळात दररोज कमी रुग्ण आढळून येत होते. कालांतराने या भागात दिवसाला शंभरहून अधिक रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली. यामुळे या भागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १८ हजार २७०, तर मृतांची संख्या ५६५ वर पोहोचली आहे. त्यामुळे रुग्णांची ही साखळी तोडण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने रुग्ण आढळून येणाऱ्या विभागात १४ दिवस प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करून सर्वेक्षण करण्यावर भर देत आहे. तसेच कोरोना प्रतिबंधित करण्याविषयी जनजागृती करणे, खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना क्वारंटाइन सेंटर, फिव्हर क्लिनिक, अँटिजन टेस्टिंग साइट या ठिकाणी सेवा देण्यासाठी प्रवृत्त करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांचा शोध घेणे सोपे झाले आहे.आता ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.) चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम पंचायतीच्या क्षेत्रात तसेच गावात हिरवा झेंडा लावण्याची नवी युक्ती लढवली. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ४३० ग्रामपंचायतींपैकी ३७६ ग्रामपंचायतींमध्ये २८ दिवसांपासून एकही रुग्ण आढळला नसल्याने त्या गावांमध्ये कोरोनामुक्तीचा झेंडा रोवला आहे. त्यात मुरबाड तालुक्यातील सर्वाधिक १२३ ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. ग्रामीण भागात जिल्हा परिषद प्रशासन, आरोग्य विभाग, आशा, अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून कोरोना आजाराचे गांभीर्य, त्यांचे परिणाम याबाबत जनजागृतीचा फायदा झाला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस