शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

सोशल मीडियामुळे आजीबाई स्वगृही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 02:22 IST

मायलेकांची घडली भेट; ठाणे जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू

ठाणे : मध्य प्रदेशमधून हरवलेल्या ६५ वर्षीय सुमित्रा देवांगन या तब्बल सहा महिन्यांनी स्वगृही परतल्या आहेत. यात सोशल मीडियाची महत्त्वाची भूमिका ठरली आहे. चिडचिड, कधीकधी असंबद्ध बोलणे, परिपूर्ण माहिती न देणे अशा सगळ्या अडचणींतून ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाने त्यांची माहिती कशीबशी गोळा केली आणि त्यातून मायलेकांची भेट घडून आली.सुमित्रा देवांगन यांचे हाड मोडल्याने १७ एप्रिल २०१९ रोजी तुळिंज पोलिसांनी ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी त्यांची बेवारस म्हणून नोंद केली होती. दरम्यान, ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तेथील डॉक्टरांनी उपचार सुरू केले. त्यातून त्यांचा चिडचिडा स्वभाव, कधीकधी वेगळेच बोलणे, परिपूर्ण माहिती न देणे असे प्रकार सुरू असताना रुग्णालय प्रशासनाने त्यांच्यावर योग्य उपचार तर केलेच, त्याचबरोबर रुग्णालयातील समाजसेवा अधीक्षक श्रीरंग सिद यांनी त्यांना बोलतेही केले. त्यावेळी त्यांनी चापा, जांजगीर, जिल्हा बिलासपूर अशी मोडकीतोडकी माहिती दिली. ती माहिती तुळिंज पोलिसांना दिल्यावर त्यांनी बिलासपूर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर बिलासपूर पोलिसांनी महिलेच्या देवांगन आडनावावरून ती माहिती तेथील देवांगन समाजाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकली. त्यानुसार, आजीबाई अनुपपूर येथील असल्याचे समोर आले. त्यानंतर, त्यांचा मुलगा श्यामलाल आणि नातेवाइकांनी बुधवारी ठाणे गाठून त्यांना स्वगृही नेले. दरम्यान, ती सहा महिन्यांपूर्वी हरवल्याची तक्रार अनुपपूर येथील कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल आहे. सुमित्रा यांना मानसिक विकार असल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया