शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं.कडे अग्निशमन यंत्रणाच नाही

By admin | Updated: May 7, 2015 00:10 IST

औद्योगिकदृष्ट्या वेगाने विकसित होणाऱ्या भिवंडी तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींना आपत्तीकाळात नजीकच्या महानगरपालिकेच्या अग्निशमन यंत्रणेवर अवलंबून राहावे लागते.

रोहिदास पाटील, अनगाव औद्योगिकदृष्ट्या वेगाने विकसित होणाऱ्या भिवंडी तालुक्यातील लोकसंख्या आणि आर्थिक दृष्टीने सक्षम असलेल्या मोठ्या ग्रामपंचायतींना आपत्तीकाळात नजीकच्या महानगरपालिकेच्या अग्निशमन यंत्रणेवर अवलंबून राहावे लागते.तालुक्यात ११८ ग्रामपंचायती, २३९ महसूली गावे व १०० पाडे व आदिवासी वाड्या आहेत. त्यापैकी पूर्णा कोपर-कशेळी, काल्हेर मानकोळी, दापोडे, सोनाळे, अंजूर-दिवे, पिंपळास आदी ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात गोदामे आहेत. परिसरात ज्वलनशील रासायनिक कंपन्या असल्यामुळे आग लागण्याचे प्रमाणही जास्त आहे. या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी महानगरपालिकांच्या अग्निशमन यंत्रणेची मदत घ्यावी लागते. मदतीसाठी येणारे हे अग्निशमन बंब वाहतूककोंडीत अडकल्यास त्यांना घटनास्थळी पोहोचण्यास उशीर होतो. तेव्हा मोठी जीवित व वित्तहानी होते. तालुक्यातील कुठल्याच ग्रामपंचायतीकडे अग्निशमन बंब नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, ज्या पंचायतीच्या कार्यक्षेत्रात गोदामे व कंपन्या आहेत, त्या पंचायतीला याविषयी माहिती देऊन यासंबंधी ही यंत्रणा बसविण्यासाठी प्रयत्न कडून याबाबत शासनाचे मार्गदर्शन घेण्यात येईल.- डॉ. करुणा जुईकर, गटविकास अधिकारी, पंचायत समिती भिवंडीमंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीनंतर कारखाने, गोदामे येथे अग्निशमन यंत्रणा ठेवण्यात यावी, असे आदेश राज्य सरकारने काढले होते. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. ती होण्याकरिता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून माहिती घेण्यात येईल.’’- प्रकाश पाटील, गटनेते जि.प. ठाणे, शिवसेना जिल्हाप्रमुख ठाणे ग्रामीण