शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

ग्रा.पं.कडे अग्निशमन यंत्रणाच नाही

By admin | Updated: May 7, 2015 00:10 IST

औद्योगिकदृष्ट्या वेगाने विकसित होणाऱ्या भिवंडी तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींना आपत्तीकाळात नजीकच्या महानगरपालिकेच्या अग्निशमन यंत्रणेवर अवलंबून राहावे लागते.

रोहिदास पाटील, अनगाव औद्योगिकदृष्ट्या वेगाने विकसित होणाऱ्या भिवंडी तालुक्यातील लोकसंख्या आणि आर्थिक दृष्टीने सक्षम असलेल्या मोठ्या ग्रामपंचायतींना आपत्तीकाळात नजीकच्या महानगरपालिकेच्या अग्निशमन यंत्रणेवर अवलंबून राहावे लागते.तालुक्यात ११८ ग्रामपंचायती, २३९ महसूली गावे व १०० पाडे व आदिवासी वाड्या आहेत. त्यापैकी पूर्णा कोपर-कशेळी, काल्हेर मानकोळी, दापोडे, सोनाळे, अंजूर-दिवे, पिंपळास आदी ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात गोदामे आहेत. परिसरात ज्वलनशील रासायनिक कंपन्या असल्यामुळे आग लागण्याचे प्रमाणही जास्त आहे. या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी महानगरपालिकांच्या अग्निशमन यंत्रणेची मदत घ्यावी लागते. मदतीसाठी येणारे हे अग्निशमन बंब वाहतूककोंडीत अडकल्यास त्यांना घटनास्थळी पोहोचण्यास उशीर होतो. तेव्हा मोठी जीवित व वित्तहानी होते. तालुक्यातील कुठल्याच ग्रामपंचायतीकडे अग्निशमन बंब नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, ज्या पंचायतीच्या कार्यक्षेत्रात गोदामे व कंपन्या आहेत, त्या पंचायतीला याविषयी माहिती देऊन यासंबंधी ही यंत्रणा बसविण्यासाठी प्रयत्न कडून याबाबत शासनाचे मार्गदर्शन घेण्यात येईल.- डॉ. करुणा जुईकर, गटविकास अधिकारी, पंचायत समिती भिवंडीमंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीनंतर कारखाने, गोदामे येथे अग्निशमन यंत्रणा ठेवण्यात यावी, असे आदेश राज्य सरकारने काढले होते. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. ती होण्याकरिता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून माहिती घेण्यात येईल.’’- प्रकाश पाटील, गटनेते जि.प. ठाणे, शिवसेना जिल्हाप्रमुख ठाणे ग्रामीण