शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचा फक्त हिंदूधर्माला राजाश्रय

By admin | Updated: October 30, 2016 20:58 IST

या देशात बौद्ध धम्माला सरकारकडून राजाश्रय मिळत नाही. त्यामुळे स्वतंत्र भारतात बौद्ध धम्माची पिछेहाट झाली आहे. या देशातील सरकार हिंदू धर्माच्या महाकुंभ मेळाव्यावर कोटय़ावधी रुपये खर्च करते.

ऑनलाइन लोकमत

कल्याण, दि. 30-  :  बुद्धांची जन्मभूमी भारत आहे. या देशात बौद्ध धम्माला सरकारकडून राजाश्रय मिळत नाही. त्यामुळे स्वतंत्र भारतात बौद्ध धम्माची पिछेहाट झाली आहे. या देशातील सरकार हिंदू धर्माच्या महाकुंभ मेळाव्यावर कोटय़ावधी रुपये खर्च करते. या देशात फक्त हिंदू धर्माला राजाश्रय मिळतो. हा देश जर धर्म निरपेक्ष आहे असे राजकर्ते आणि सरकार सांगते तर त्यांनी त्यांची धर्म निरपेक्षता सिद्ध करावी. अन्य धर्माच्या परिषदांसह मेळाव्यांना कुंभ मेळाव्याप्रमाणो निधी द्यावा अशी मागणी ऑल इंडिया भिक्कू महासंघाच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष भदंत बोधीपालो महाथेरो यांनी केली आहे. दोन दिवसी आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन कल्याणच्या वालधूनी अशोकनगरातील बुद्धभूमी फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. आज यापरिषदेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी भदंत बोधीपालो महाथेरो यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी उपरोक्त मुद्दा उपस्थित केला.त्यांनी सांगितले की, भारतात स्वातंत्र्यानंतर बौद्ध धर्माला राजाश्रय मिळालेला नाही. बुद्धाचा विचार हा समतावादी आहे. इतर धर्माचा विचार हा दैववाद, विषमतावाद आणि आत्मवादाला प्रोत्साहन देणारा आहे. त्यामुळे देशाची एकात्मकता दुभंगली आहे. बुद्धाचा विचार उदारमताने स्विकारला पाहिजे. तर देश विषमतावादातून बाहेर येऊ शकतो. बुद्धाची जन्मभूमी भारतआहे. त्याच देशाचे सरकार बौद्ध धर्माच्या पाठीशी नाही. इतर देशात बौद्ध धर्मिय बहुल आहेत. ते देश जपान, चीन, थायलंड या देशाचे सरकार बौद्धांच्या धम्म मेळाव्यास व त्यादेशातील इतर धर्मियांच्या धार्मिक कामास समान निधीचे वाटप करतात. त्यांच्याकडून कोणताही दुजाभाव केला जात नाही. दुदैवाने आपल्या देशात केवळ हिंदूच्या कुंभमेळाव्यास सरकारकडून निधी दिला जातो. सगळ्य़ा धर्माचा विचार होणो आवश्यक आहे. बुद्ध काळात बहुजनांची बोलीभाषा ही पालीभाषा होती. पाली भाषेत बौद्ध साहित्य होते. त्यानंतर जी काही सांस्कृतिक अतिक्रमणो झाले. त्या आक्रमणात बौद्ध धर्माची पिढेहाट झाली. त्यामुळे बहुजनांची पालीभाषा ही मागे पडली. तिची ज्या त्या काळच्या राज्यकत्र्यानी संस्कृत भाषेला दिली. त्यामुळे संस्कृत भाषा ही देवभाषा गणली गेली. बुद्धांची जन्मभूमी असलेल्या भारतात नालंदा व तक्षशीला ही दोन जागतिक दर्जाची विद्यापीठेहोती. पुन्हा पालीभाषेला महत्व प्राप्त करुन देण्यासाठी केंद्र सरकारने देशात पालीभाषा विद्यापीठ सुरु करावे अशी मागणी भिक्कू महासंघाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे भदंत बोधीपालो महाथेरो यांनी केली आहे. धम्म प्रचार व प्रसारासाठी आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय धम्म परिषदेस जमान, कोरिया, चीन, थायलंड, मलेशिया, भूतान, नेपाळ, श्रीलंका, आदी देशातून भिक्क उपस्थित झाले आहेत. बुद्धभूमी फाऊंडेशन व राष्ट्रनिर्माते बाबासाहेब आंबडेकर विचार महोत्सव समिती मुंबईच्या वतीने ही परिषद आयोजित केली गेली आहे. या परिषदेत 100 पेक्षा जास्त देश विदेशातील भिक्कू सहभागी झाले आहेत. परिषदेच्या आयोजनासाठी भदंत गौतमरत्न थेरो व हर्षदीप कांबळे यांनी पुढाकार घेतला आहे. 50 हजार पेक्षा जास्तबौद्ध समाजबांधव या परिषदेला हजेरी लावणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. डॉ. आंबेडकरांनी लिहिलेल्या ग्रंथांचे प्रदर्शन या ठिकाणी भरविण्यात आले आहे. धम्म विषयक पुस्तके, मासिके, सिडी, ङोंडे, ध्वज आदीचे स्टॉल्स उभारण्यात आले आहे. भव्य एलएडी स्क्रीन लावण्यात आली आहे. स्टेजवर पॅगोडा टाईप निळ्य़ा छत्र्यांनी सजावट करण्यात आली आहे.