शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचा फक्त हिंदूधर्माला राजाश्रय

By admin | Updated: October 30, 2016 20:58 IST

या देशात बौद्ध धम्माला सरकारकडून राजाश्रय मिळत नाही. त्यामुळे स्वतंत्र भारतात बौद्ध धम्माची पिछेहाट झाली आहे. या देशातील सरकार हिंदू धर्माच्या महाकुंभ मेळाव्यावर कोटय़ावधी रुपये खर्च करते.

ऑनलाइन लोकमत

कल्याण, दि. 30-  :  बुद्धांची जन्मभूमी भारत आहे. या देशात बौद्ध धम्माला सरकारकडून राजाश्रय मिळत नाही. त्यामुळे स्वतंत्र भारतात बौद्ध धम्माची पिछेहाट झाली आहे. या देशातील सरकार हिंदू धर्माच्या महाकुंभ मेळाव्यावर कोटय़ावधी रुपये खर्च करते. या देशात फक्त हिंदू धर्माला राजाश्रय मिळतो. हा देश जर धर्म निरपेक्ष आहे असे राजकर्ते आणि सरकार सांगते तर त्यांनी त्यांची धर्म निरपेक्षता सिद्ध करावी. अन्य धर्माच्या परिषदांसह मेळाव्यांना कुंभ मेळाव्याप्रमाणो निधी द्यावा अशी मागणी ऑल इंडिया भिक्कू महासंघाच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष भदंत बोधीपालो महाथेरो यांनी केली आहे. दोन दिवसी आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन कल्याणच्या वालधूनी अशोकनगरातील बुद्धभूमी फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. आज यापरिषदेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी भदंत बोधीपालो महाथेरो यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी उपरोक्त मुद्दा उपस्थित केला.त्यांनी सांगितले की, भारतात स्वातंत्र्यानंतर बौद्ध धर्माला राजाश्रय मिळालेला नाही. बुद्धाचा विचार हा समतावादी आहे. इतर धर्माचा विचार हा दैववाद, विषमतावाद आणि आत्मवादाला प्रोत्साहन देणारा आहे. त्यामुळे देशाची एकात्मकता दुभंगली आहे. बुद्धाचा विचार उदारमताने स्विकारला पाहिजे. तर देश विषमतावादातून बाहेर येऊ शकतो. बुद्धाची जन्मभूमी भारतआहे. त्याच देशाचे सरकार बौद्ध धर्माच्या पाठीशी नाही. इतर देशात बौद्ध धर्मिय बहुल आहेत. ते देश जपान, चीन, थायलंड या देशाचे सरकार बौद्धांच्या धम्म मेळाव्यास व त्यादेशातील इतर धर्मियांच्या धार्मिक कामास समान निधीचे वाटप करतात. त्यांच्याकडून कोणताही दुजाभाव केला जात नाही. दुदैवाने आपल्या देशात केवळ हिंदूच्या कुंभमेळाव्यास सरकारकडून निधी दिला जातो. सगळ्य़ा धर्माचा विचार होणो आवश्यक आहे. बुद्ध काळात बहुजनांची बोलीभाषा ही पालीभाषा होती. पाली भाषेत बौद्ध साहित्य होते. त्यानंतर जी काही सांस्कृतिक अतिक्रमणो झाले. त्या आक्रमणात बौद्ध धर्माची पिढेहाट झाली. त्यामुळे बहुजनांची पालीभाषा ही मागे पडली. तिची ज्या त्या काळच्या राज्यकत्र्यानी संस्कृत भाषेला दिली. त्यामुळे संस्कृत भाषा ही देवभाषा गणली गेली. बुद्धांची जन्मभूमी असलेल्या भारतात नालंदा व तक्षशीला ही दोन जागतिक दर्जाची विद्यापीठेहोती. पुन्हा पालीभाषेला महत्व प्राप्त करुन देण्यासाठी केंद्र सरकारने देशात पालीभाषा विद्यापीठ सुरु करावे अशी मागणी भिक्कू महासंघाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे भदंत बोधीपालो महाथेरो यांनी केली आहे. धम्म प्रचार व प्रसारासाठी आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय धम्म परिषदेस जमान, कोरिया, चीन, थायलंड, मलेशिया, भूतान, नेपाळ, श्रीलंका, आदी देशातून भिक्क उपस्थित झाले आहेत. बुद्धभूमी फाऊंडेशन व राष्ट्रनिर्माते बाबासाहेब आंबडेकर विचार महोत्सव समिती मुंबईच्या वतीने ही परिषद आयोजित केली गेली आहे. या परिषदेत 100 पेक्षा जास्त देश विदेशातील भिक्कू सहभागी झाले आहेत. परिषदेच्या आयोजनासाठी भदंत गौतमरत्न थेरो व हर्षदीप कांबळे यांनी पुढाकार घेतला आहे. 50 हजार पेक्षा जास्तबौद्ध समाजबांधव या परिषदेला हजेरी लावणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. डॉ. आंबेडकरांनी लिहिलेल्या ग्रंथांचे प्रदर्शन या ठिकाणी भरविण्यात आले आहे. धम्म विषयक पुस्तके, मासिके, सिडी, ङोंडे, ध्वज आदीचे स्टॉल्स उभारण्यात आले आहे. भव्य एलएडी स्क्रीन लावण्यात आली आहे. स्टेजवर पॅगोडा टाईप निळ्य़ा छत्र्यांनी सजावट करण्यात आली आहे.