शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

सरकारचा फक्त हिंदूधर्माला राजाश्रय

By admin | Updated: October 30, 2016 20:58 IST

या देशात बौद्ध धम्माला सरकारकडून राजाश्रय मिळत नाही. त्यामुळे स्वतंत्र भारतात बौद्ध धम्माची पिछेहाट झाली आहे. या देशातील सरकार हिंदू धर्माच्या महाकुंभ मेळाव्यावर कोटय़ावधी रुपये खर्च करते.

ऑनलाइन लोकमत

कल्याण, दि. 30-  :  बुद्धांची जन्मभूमी भारत आहे. या देशात बौद्ध धम्माला सरकारकडून राजाश्रय मिळत नाही. त्यामुळे स्वतंत्र भारतात बौद्ध धम्माची पिछेहाट झाली आहे. या देशातील सरकार हिंदू धर्माच्या महाकुंभ मेळाव्यावर कोटय़ावधी रुपये खर्च करते. या देशात फक्त हिंदू धर्माला राजाश्रय मिळतो. हा देश जर धर्म निरपेक्ष आहे असे राजकर्ते आणि सरकार सांगते तर त्यांनी त्यांची धर्म निरपेक्षता सिद्ध करावी. अन्य धर्माच्या परिषदांसह मेळाव्यांना कुंभ मेळाव्याप्रमाणो निधी द्यावा अशी मागणी ऑल इंडिया भिक्कू महासंघाच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष भदंत बोधीपालो महाथेरो यांनी केली आहे. दोन दिवसी आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन कल्याणच्या वालधूनी अशोकनगरातील बुद्धभूमी फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. आज यापरिषदेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी भदंत बोधीपालो महाथेरो यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी उपरोक्त मुद्दा उपस्थित केला.त्यांनी सांगितले की, भारतात स्वातंत्र्यानंतर बौद्ध धर्माला राजाश्रय मिळालेला नाही. बुद्धाचा विचार हा समतावादी आहे. इतर धर्माचा विचार हा दैववाद, विषमतावाद आणि आत्मवादाला प्रोत्साहन देणारा आहे. त्यामुळे देशाची एकात्मकता दुभंगली आहे. बुद्धाचा विचार उदारमताने स्विकारला पाहिजे. तर देश विषमतावादातून बाहेर येऊ शकतो. बुद्धाची जन्मभूमी भारतआहे. त्याच देशाचे सरकार बौद्ध धर्माच्या पाठीशी नाही. इतर देशात बौद्ध धर्मिय बहुल आहेत. ते देश जपान, चीन, थायलंड या देशाचे सरकार बौद्धांच्या धम्म मेळाव्यास व त्यादेशातील इतर धर्मियांच्या धार्मिक कामास समान निधीचे वाटप करतात. त्यांच्याकडून कोणताही दुजाभाव केला जात नाही. दुदैवाने आपल्या देशात केवळ हिंदूच्या कुंभमेळाव्यास सरकारकडून निधी दिला जातो. सगळ्य़ा धर्माचा विचार होणो आवश्यक आहे. बुद्ध काळात बहुजनांची बोलीभाषा ही पालीभाषा होती. पाली भाषेत बौद्ध साहित्य होते. त्यानंतर जी काही सांस्कृतिक अतिक्रमणो झाले. त्या आक्रमणात बौद्ध धर्माची पिढेहाट झाली. त्यामुळे बहुजनांची पालीभाषा ही मागे पडली. तिची ज्या त्या काळच्या राज्यकत्र्यानी संस्कृत भाषेला दिली. त्यामुळे संस्कृत भाषा ही देवभाषा गणली गेली. बुद्धांची जन्मभूमी असलेल्या भारतात नालंदा व तक्षशीला ही दोन जागतिक दर्जाची विद्यापीठेहोती. पुन्हा पालीभाषेला महत्व प्राप्त करुन देण्यासाठी केंद्र सरकारने देशात पालीभाषा विद्यापीठ सुरु करावे अशी मागणी भिक्कू महासंघाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे भदंत बोधीपालो महाथेरो यांनी केली आहे. धम्म प्रचार व प्रसारासाठी आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय धम्म परिषदेस जमान, कोरिया, चीन, थायलंड, मलेशिया, भूतान, नेपाळ, श्रीलंका, आदी देशातून भिक्क उपस्थित झाले आहेत. बुद्धभूमी फाऊंडेशन व राष्ट्रनिर्माते बाबासाहेब आंबडेकर विचार महोत्सव समिती मुंबईच्या वतीने ही परिषद आयोजित केली गेली आहे. या परिषदेत 100 पेक्षा जास्त देश विदेशातील भिक्कू सहभागी झाले आहेत. परिषदेच्या आयोजनासाठी भदंत गौतमरत्न थेरो व हर्षदीप कांबळे यांनी पुढाकार घेतला आहे. 50 हजार पेक्षा जास्तबौद्ध समाजबांधव या परिषदेला हजेरी लावणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. डॉ. आंबेडकरांनी लिहिलेल्या ग्रंथांचे प्रदर्शन या ठिकाणी भरविण्यात आले आहे. धम्म विषयक पुस्तके, मासिके, सिडी, ङोंडे, ध्वज आदीचे स्टॉल्स उभारण्यात आले आहे. भव्य एलएडी स्क्रीन लावण्यात आली आहे. स्टेजवर पॅगोडा टाईप निळ्य़ा छत्र्यांनी सजावट करण्यात आली आहे.