शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

मीरा रोडमध्ये कोट्यवधीचा सरकारी भूखंड हरवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 02:34 IST

मीरा रोडच्या कनकिया नाकाजवळील मोक्याचा आणि कोट्यवधी रुपये किंमतीचा दोन हजार ८३० चौरसमीटरचा सरकारी भूखंड हरवला आहे.

मीरा रोड - मीरा रोडच्या कनकिया नाकाजवळील मोक्याचा आणि कोट्यवधी रुपये किंमतीचा दोन हजार ८३० चौरसमीटरचा सरकारी भूखंड हरवला आहे. महसूल विभागाकडून जो भूखंड सरकारी असल्याचे सांगितले जात आहे त्याच भूखंडावर ताबा असणाऱ्यांकडून मात्र हा भूखंड सरकारी नाहीच असा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे अतिक्रमण हटवण्यास पोलिसांनीही असहकार्य पुकारल्याने कारवाईच गुंडाळण्याची नामुष्की आली.शामराव विठ्ठल बँकेजवळ मुख्य रस्ता आणि मोक्याच्या नाक्यावर असलेला भूखंड हा सरकारी असून त्याचा सर्वे क्र. मौजे भार्इंदर १११ असा असल्याचे महसूल विभागाचे म्हणणे आहे. या भूखंडाचे एकूण क्षेत्र २ हजार ८३० चौरसमीटर असून त्यातील २ हजार ३२८ चौरसमीटर इतका भूखंड कर विभागाच्या कार्यालयासाठी हस्तांतरीत केला गेला आहे. परंतु या जागेवर आईस कंपनी, नर्सरी आदी अतिक्रमण असल्याने ते काढण्यासाठी सरकारने नोटीस जारी केली असता सरकार दावा करत असलेला भूखंड हा सर्वे क्र. १११ नसून तो आमचा खाजगी सर्वे क्र. ११२ व ११३ चा भाग असल्याचा दावा या जागेत कब्जा असणाऱ्यांकडून केला जात आहे.या जागेवरून सुमारे ५ ते ६ महिन्याआधी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सर्व संबंधितांची बैठक घेतली होती. आमदार नरेंद्र मेहताही जागेच्या मालकीचा दावा करणाºयांसोबत उपस्थित होते. त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी ज्यांचे खाजगी सर्वे क्र. आहेत त्यांनी देखील भूमिअभिलेख विभागाकडे पैसे भरुन रितसर सरकारी मोजणी करून घ्यावी आणि मग त्या नंतर जमिनीची हद्द ठरेल त्या प्रमाणे कार्यवाही करू असे निर्देश दिले होते. मात्र त्या नंतरही जमीन सरकारी नसल्याचा दावा करणाºयांनी भूमि अभिलेखकडून पैसे भरून सर्वेक्षण करून घेतले नाही. त्यामुळे ५ आॅगस्ट रोजी महसूल विभागाने सर्वेक्षण करून घेत सरकारी जागेची हद्द निश्चित केली. त्यावेळीही खाजगी जमीन असल्याचा दावा करणारे राधेशाम त्रिवेदी, ठाकूर आदींनी विरोध दर्शवला होता. विशेष म्हणजे पालिकेच्या विकास आराखड्यातही रस्ता दाखवलेला आहे.तहसीलदारांनी सरकारी जागेतील अतिक्रमण हटवण्यासाठी जाहीर सूचना काढत मंगळवारी अतिक्रमण हटवण्याची कारवाई होती. परंतु या वेळी त्रिवेदी आदींनी कारवाईस विरोध करत ही जागा खाजगी असून सरकारी नसल्याचे सांगितले.अतिक्रमणावरील कारवाईत अडथळा आणणाºयांना पोलिसांनी हटवले नाही. नायब तहसीलदार यांनी पोलिसांना जमावास हटवण्याचे सांगूनही डोळेझाक केली. नंतर पोलिसांनी काढता पाय घेतला.सरकारी आदेशानुसार सरकारी जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई होती. सर्वेक्षण करूनच सरकारी जागा असल्याची खात्री केली होती. पोलीस बंदोबस्त मोठा होता. पण कारवाईत अडथळा आणला गेला. नंतर पोलीस नसल्याने कारवाई थांबवण्यात आली.- वासुदेव पवार, नायब तहसीलदार

टॅग्स :mira roadमीरा रोड