शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
17
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
18
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
19
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने ६८२ कोटींचा हप्ता भरल्याने विमा कंपन्यांचे चांगभले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 02:43 IST

२०१८ मध्ये राज्य सरकारने १७०५ कोटी ७३ लाख ९१ हजार ७३५ रुपयांचा विमा हप्ता भरला होता.

- नारायण जाधवठाणे : जूनमध्ये पीक विमा योजनेबद्दल शिवसेनेने मोर्चा काढून १५ दिवसांची मुदत महाराष्ट्र सरकारला दिली होती. ही मुदत दिल्यानंतर ५३ लाख शेतकऱ्यांना पात्र ठरवून ९६० कोटींची भरपाई मिळाल्याचा दावा करून उर्वरित अपात्र ठरलेल्या ९० लाख शेतकऱ्यांनाही सरसकट पात्र ठरवून उरलेल्या २ हजार कोटींतून विम्याची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषदेत केली.मात्र, असे असले ठाकरे यांच्या मागणीच्या आठ दिवसांपूर्वीच अर्थात १६ आॅगस्ट रोजी राज्याच्या कृषी विभागाने (शेतकºयांना २०१८ ची विमा नुकसानभरपाई मिळण्यापूर्वीच) संबंधित विमा कंपन्यांना २०१९ च्या पंतप्रधान पीकविम्याच्या हप्त्यापोटी ६८२ कोटी २९ लाख ५६ हजार ६९४ रुपयांची रक्कम वितरित केल्याने या कंपन्यांची चांगलीच चांदी झाली आहे. मात्र, ही रक्कम वितरित करून आठ दिवस उलटले तरी विरोधकांसह शिवसेनेच्या एकाही मंत्र्याने अथवा आमदाराने त्यास आक्षेप न घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.२०१८ मध्ये राज्य सरकारने १७०५ कोटी ७३ लाख ९१ हजार ७३५ रुपयांचा विमा हप्ता भरला होता. यात भारतीय कृषी विमा कंपनीस १५५९ कोटी ४० लाख ७८ हजार २५० तर बजाज अलियान्स इन्शुरंन्स कंपनीच्या हप्त्याचे १४६ कोटी ३३ लाख १३ हजार ४८५ रुपयांचा समावेश होता. या नुकसानभरपाईपासून जुलैअखेरपर्यंत ठाणे व पालघर जिल्ह्यातील ९० हजार १३४ शेतकरीही अद्याप वंचित आहेत.यानुसार २०१९ मध्ये या कंपन्यांनी गेल्या वर्षाच्या अनुदानाच्या ८० टक्के रकमेच्या ५० टक्के अर्थात ७०७ कोटी दोन लाख ७५ हजार ६५८ रुपये मागितले होते. मात्र, केंद्र शासनाच्या सुधारित नियमानुसार चालू हंगामातील नोंदणी सुरू असतानाच विमा संरक्षित क्षेत्राची उपलब्ध नसली तरीदेखील केंद्र व राज्याच्या पहिला हप्ता अग्रीम स्वरूपात संबंधित कंपनीस आवश्यक असल्याने राज्याच्या कृषी विभागाने ६८२ कोटी २९ लाख ५६ हजार ६९४ इतकी रक्कम या विमा कंपन्यांना १६ आॅगस्ट रोजी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. यात भारतीय कृषी विमा कंपनीच्या हिश्शाचे ६२३ कोटी ७६ लाख ३१ हजार ३०० तर बजाज अलियान्स इन्शुरंन्स कंपनीच्या ५८ कोटी ५३ लाख २५ हजार ३९४ रुपयांचा समावेश आहे.शेतकºयांपर्यंत भरपाई पोहोचवण्याची मागणीप्रधानमंत्री विमा योजनेसाठी २ टक्के रक्कम शेतकरी भारतात. तर, सरकार ९८ टक्के रक्कम भरीत असते. तरीही शेतकºयांना नुकसानभरपाई मिळत नसल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. एवढेच नव्हेतर, ज्या ९० लाख शेतकºयांना अपात्र ठरविले त्यासाठी काय निकष लावले हे तपासण्याची गरज असल्याचे सांगून सरकारने विमा कंपन्यांना त्यांचा नफा ठरवून द्यावा, तसेच शेतकºयांना त्यांनी भरपाई दिली नाही, तर सरकारने तो पैसा परत घेऊन आपल्या यंत्रणेतून शेतकºयांपर्यंत पोहोचवावा, अशी मागणी केली.जर भरपाई मिळाली नाही, तर आंदोलनाचा इशाराही ठाकरे यांनी दिला. परंतु, विमा कंपन्यांना २०१९ चा हप्ता वितरित करून आठ दिवस उलटूनही विरोधकांसह शिवसेनेचे लोकप्रतिनिधी साखरझोपेत असल्याने ते या आंदोलनात उतरतील काय, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी