शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

मनसुख हिरेन यांची हत्या सरकारला वाचविता आली असती- किरीट सोमय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 21:30 IST

राज्य सरकारच्या उद्धट आणि उर्मटपणामुळे मनसुख हिरेन यांचा जीव गेला असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी केला. सोमय्या यांनी हिरेन कुटूंबियांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी हा आरोप केला.

ठळक मुद्देठाकरे सरकार हे माफियांचे सरकार असून शिवसेना हे पोलिसांचा उपयोग गुंड म्हणून करीत आहे. त्यामुळेच निर्दोष माणसांची हत्या होत आहे. मनसुख यांची हत्या ठाकरे सरकारला वाचविता आली असती, मात्र मृत्युपूर्वी त्यांनी दिलेल्या पत्राकडेही दुर्लक्ष झाल्याने त्यांचा गूढ म

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: राज्य सरकारच्या उद्धट आणि उर्मटपणामुळे मनसुख हिरेन यांचा जीव गेला असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी केला. सोमय्या यांनी हिरेन कुटूंबियांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी हा आरोप केला.मनसुख यांची पत्नी आणि तिन्ही मुले दु:खात आहेत. त्याचबरोबर त्यांच्यात संतापही खदखदत आहे. पोलीस,गृहमंत्री आणि ठाकरे सरकारने राजकारण करण्याचा घाणेरडापणा केला आहे, ही खेदाची बाब आहे. सरकारच्या उद्धट आणि उर्मटपणामुळे मनसुख यांचा बळी गेला. कोणतेही कारण नसतांना आपल्या पतीचा यात बळी गेल्याचे मनसुख यांच्या पत्नी विमला यांनी आपल्या भावना व्यक्त केल्याचे ते म्हणाले. ठाकरे सरकार हे माफियांचे सरकार असून शिवसेना हे पोलिसांचा उपयोग गुंड म्हणून करीत आहे. त्यामुळेच निर्दोष माणसांची हत्या होत आहे. मनसुख यांची हत्या ठाकरे सरकारला वाचविता आली असती, मात्र मृत्युपूर्वी त्यांनी दिलेल्या पत्राकडेही दुर्लक्ष झाल्याने त्यांचा गूढ मृत्यु झाल्याचे ते म्हणाले.* कोविड सेंटरबाबत अनेक तक्रारी-कोविड लसीकरणाबाबत महापालिका प्रशासन जेष्ठ नागरिकांना सेवा देत नाही. त्यामुळे जेष्ठ नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.महापालिका आणि ठाकरे सरकारने याबाबत जेष्ठ नागरिकांसाठी योग्य ती व्यवस्था केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. ठाणे आणि मुंबई परिसरातील २५ कोविड सेंटरला भेटी देणार असून मुंबईत २४ तास लसीकरणाची सुविधा सुरु करण्यात यावी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली केली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीKirit Somaiyaकिरीट सोमय्या