शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार कटीबद्ध : रवींद्र चव्हाण, कोकणातील 150 शिक्षकांना वसंत स्मृती पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 16:33 IST

कोकणातील 150 शिक्षकांना वसंत स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

ठळक मुद्देशिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार कटीबद्ध : रवींद्र चव्हाण कोकणातील 150 शिक्षकांना वसंत स्मृती पुरस्कार प्रदानशिक्षकांच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मक : डावखरे

ठाणे : राज्यातील शिक्षक-शिक्षकेतरांचे प्रश्न सोडविण्यास सरकारकडून प्राधान्य दिले जात आहे. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे, अशी ग्वाही राज्यमंत्री व भाजपचे संपर्क नेते रवींद्र चव्हाण यांनी आज दिली. 

भारतीय जनता पार्टीच्या शिक्षक आघाडीच्या वतीने विधान परिषदेचे दिवंगत उपसभापती वसंत डावखरे यांच्या स्मरणार्थ वसंतस्मृती आदर्श पुरस्कार आज प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात कोकणातील 150 शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आमदार अॅड. निरंजन डावखरे होते. या वेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, माजी आमदार प्रभाकर संत, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण, भाजपाचे ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले, नगरसेवक भरत चव्हाण, प्राचार्य नरेंद्र पाठक, राजेंद्र रजपूत, शिक्षक आघाडीचे उपाध्यक्ष शब्बीर शेख, विकास पाटील, जिल्हाध्यक्ष एन. एम. भामरे आदी उपस्थित होते. या वेळी नरेंद्र पाटील यांचा सत्कार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देश घडविण्याचे कार्य सुरु आहे. तर शिक्षकांकडून उज्जवल समाजाची निर्मिती सुरू आहे. अशा शिक्षकांचा सन्मान होत असल्याबद्दल राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आनंद व्यक्त केला. विधान परिषदेचे दिवंगत उपसभापती वसंतराव डावखरे यांच्या नावाने सुरु केलेल्या वसंतस्मृती पुरस्कारामुळे शिक्षकांवरील जबाबदारी वाढली आहे. दिवंगत डावखरे यांनी शिक्षकांबरोबरच सर्वच स्तरांतील नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता, असे गौरवोद्गार राज्यमंत्री चव्हाण यांनी काढले. शिक्षकांनी आदर्श कार्य केल्यामुळेच पुरस्कारासाठी शिक्षकांची निवड झाली. यापुढील काळातही आपल्या शाळेबरोबरच गुणवंत समाज शिक्षकांनी घडवावा. शिक्षकांच्या कार्याची सरकारकडून नेहमीच दखल घेतली जात असून, शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे, अशी ग्वाही राज्यमंत्र्यांनी दिली. बदलत्या काळात गुरु-शिष्याचे नाते आणखी दृढ करण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी माझ्याकडून नेहमी सहकार्य राहील, असे आश्वासन नरेंद्र पाटील यांनी दिले. प्रत्येक मुलातील गुण हेरण्याचे कार्य शिक्षकांकडून केले जाते. तर मुलांमधील उत्सूकतेला केवळ शिक्षकांकडूनच न्याय दिला जातो,  बदलत्या काळातील आव्हाने स्वीकारत शिक्षकांकडून समर्थपणे जबाबदारी पेलली जात आहे, याबद्दल खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी समाधान व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या `सब का साथ सबका विकास'नुसार शिक्षकांकडूनही समाजाच्या उन्नतीचे कार्य केले जात आहे. कोकणातील पाच जिल्ह्यात समाज घडविण्याच्या शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन पुरस्कार सुरु केला. या पुरस्काराच्या माध्यमातून शिक्षकांबरोबरच मुले व संस्थेचाही सत्कार होत आहे. या माध्यमातून शिक्षकांच्या गौरवाची संधी आम्हाला मिळाली, असे स्वागताध्यक्ष आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी नमूद केले. या वेळी राष्ट्रपती शौर्य पुरस्कार मिळाल्याबद्दल पोलिस उपनिरीक्षक हर्षद काळे यांचा सत्कार करण्यात आला. तर ठाणे व पालघर जिल्ह्यातील 26 अर्धवेळ प्रयोगशाळा सहायकांच्या वतीने आमदार अॅड. निरंजन डावखरे यांचा सत्कार करण्यात आला. आमदार डावखरे यांच्या पाठपुराव्याने 26 अर्धवेळ प्रयोगशाळा सहायकांना पूर्णवेळ नोकरी मिळाली आहे.

----------------------------------------------------------

शिक्षकांच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मक : डावखरे

राज्यातील शिक्षकांच्या प्रश्नावर सरकार सकारात्मक आहे. अर्धवेळ ग्रंथपाल, अर्धवेळ प्रयोगशाळा सहायकांना पूर्ण वेळ सेवेत घेण्यात आले. तर शाळांना 20 टक्के अनुदानासह शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची सकारात्मक भूमिका आहे, असे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी नमूद केले.

टॅग्स :BJPभाजपा