शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

चांगली कामेही होत आहेत; पण  कान-डोळे उघडे ठेवण्याची गरज - मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 13:18 IST

शतकपूर्ती होईल, त्यावेळी देश स्वयंपूर्ण असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ठाणे : वाईटाच्या तुलनेत देशात ४० टक्के अधिक  चांगली कामेही होत आहेत; पण  कान-डोळे उघडे ठेवून पाहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी येथे केले. तसेच अन्न, वस्त्र, निवाऱ्यापेक्षाही आरोग्य  आणि शिक्षण महत्त्वाचे झाले असून, या दोन्ही गोष्टी आपल्या देशात अपूर्ण असल्याची खंत व्यक्त करतानाच देशाचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहोत. शतकपूर्ती होईल, त्यावेळी देश स्वयंपूर्ण असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ठाणे महापालिका, जितो एज्युकेशनल ॲण्ड मेडिकल ट्रस्ट आणि टाटा मेमोरिअल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील बाळकूम परिसरात उभारण्यात येत असलेल्या धर्मवीर आनंद दिघे कर्करोग रुग्णालय आणि त्रिमंदिर संकुलाचे भूमिपूजन डॉ. भागवत यांच्या हस्ते झाले. ते म्हणाले, आज समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तीही आहेत. त्यातीलच एक चांगले काम म्हणजे ठाण्यात उभे  राहत असलेले हे  कॅन्सर रुग्णालय आहे. 

रुग्णालयीन उपचाराचा खर्च सामान्य व्यक्तीच्या आवाक्याबाहेरचा आहे. अल्पदरात उपचार मिळावेत, ही जनतेची गरज आहे. जीव सेवा हीच शिव सेवा आहे. देशात सर्व बाबी आध्यात्मिक दुर्बिणीतून बघितल्या जातात. कॅन्सर रुग्णालय उभे राहणे म्हणजे शिव कार्य होत आहे, असेही डॉ. भागवत म्हणाले. शासन आणि समाज दोघेही संवेदनशील आहे. त्यामुळे चांगले कार्य होईल, असा आशावादही त्यांनी  व्यक्त केला. यावेळी गुजरातच्या अडलजच्या दादा भगवान फाउंडेशनचे दीपक देसाई यांनीही मार्गदर्शन केले.

संपूर्ण राज्यासाठी उपयोगी ठरणार : शिंदेठाणे जिल्हाच नव्हे तर राज्याच्या दृष्टीने हे कॅन्सर रुग्णालय उपयोगाचे ठरणार आहे. दवाबरोबर दुव्याचीही गरज असल्यामुळेच याठिकाणी रुग्णालयाबरोबर त्रिमंदिर संकुलही उभारण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. या रुग्णालयाच्या नावातच आनंद आहे. लोकांना आनंद कसा मिळेल, यासाठीच आयुष्यभर प्रयत्न केला, अशा आनंद दिघे यांच्या नावाने रुग्णालय उभे राहत असल्याचा आनंद आहे. कॅन्सर रुग्णालय हे आनंद दिघे यांचे जिवंत स्मारक ठरेल. माझी आई कॅन्सरनेच गेली. देवेंद्र फडणवीस यांचे वडीलही याच आजाराने ग्रस्त होते. कॅन्सर कोणालाच होऊ नये, अशी भावना असते, असे ते म्हणाले.

जीडीपीत जैन समाजाचा वाटा : फडणवीसउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आनंद दिघे यांचे कार्य खूप मोठे आहे. ते ठाणे जिल्ह्याच्या अत्यंत दुर्गम भागात काम करायचे. तेव्हा त्यांच्या रुग्णवाहिकामुळे अनेकांचे प्राण वाचले. त्यांची परंपरा एकनाथ शिंदे चालवत आहेत. तसेच ज्यांच्या पाठी जैन समाज आणि जितो असतात, त्यांना संसाधनाची कोणतीही कमी नसते. आज देशाचा जीडीपी वाढवण्यात जैन समाजाचा मोठा वाटा आहे. या समाजातील व्यक्ती नुसते पैसे कमवत नाही, तर लोकांची सेवा पण करतात.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघhospitalहॉस्पिटल