शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

चांगली कामेही होत आहेत; पण  कान-डोळे उघडे ठेवण्याची गरज - मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 13:18 IST

शतकपूर्ती होईल, त्यावेळी देश स्वयंपूर्ण असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ठाणे : वाईटाच्या तुलनेत देशात ४० टक्के अधिक  चांगली कामेही होत आहेत; पण  कान-डोळे उघडे ठेवून पाहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी येथे केले. तसेच अन्न, वस्त्र, निवाऱ्यापेक्षाही आरोग्य  आणि शिक्षण महत्त्वाचे झाले असून, या दोन्ही गोष्टी आपल्या देशात अपूर्ण असल्याची खंत व्यक्त करतानाच देशाचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहोत. शतकपूर्ती होईल, त्यावेळी देश स्वयंपूर्ण असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ठाणे महापालिका, जितो एज्युकेशनल ॲण्ड मेडिकल ट्रस्ट आणि टाटा मेमोरिअल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील बाळकूम परिसरात उभारण्यात येत असलेल्या धर्मवीर आनंद दिघे कर्करोग रुग्णालय आणि त्रिमंदिर संकुलाचे भूमिपूजन डॉ. भागवत यांच्या हस्ते झाले. ते म्हणाले, आज समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तीही आहेत. त्यातीलच एक चांगले काम म्हणजे ठाण्यात उभे  राहत असलेले हे  कॅन्सर रुग्णालय आहे. 

रुग्णालयीन उपचाराचा खर्च सामान्य व्यक्तीच्या आवाक्याबाहेरचा आहे. अल्पदरात उपचार मिळावेत, ही जनतेची गरज आहे. जीव सेवा हीच शिव सेवा आहे. देशात सर्व बाबी आध्यात्मिक दुर्बिणीतून बघितल्या जातात. कॅन्सर रुग्णालय उभे राहणे म्हणजे शिव कार्य होत आहे, असेही डॉ. भागवत म्हणाले. शासन आणि समाज दोघेही संवेदनशील आहे. त्यामुळे चांगले कार्य होईल, असा आशावादही त्यांनी  व्यक्त केला. यावेळी गुजरातच्या अडलजच्या दादा भगवान फाउंडेशनचे दीपक देसाई यांनीही मार्गदर्शन केले.

संपूर्ण राज्यासाठी उपयोगी ठरणार : शिंदेठाणे जिल्हाच नव्हे तर राज्याच्या दृष्टीने हे कॅन्सर रुग्णालय उपयोगाचे ठरणार आहे. दवाबरोबर दुव्याचीही गरज असल्यामुळेच याठिकाणी रुग्णालयाबरोबर त्रिमंदिर संकुलही उभारण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. या रुग्णालयाच्या नावातच आनंद आहे. लोकांना आनंद कसा मिळेल, यासाठीच आयुष्यभर प्रयत्न केला, अशा आनंद दिघे यांच्या नावाने रुग्णालय उभे राहत असल्याचा आनंद आहे. कॅन्सर रुग्णालय हे आनंद दिघे यांचे जिवंत स्मारक ठरेल. माझी आई कॅन्सरनेच गेली. देवेंद्र फडणवीस यांचे वडीलही याच आजाराने ग्रस्त होते. कॅन्सर कोणालाच होऊ नये, अशी भावना असते, असे ते म्हणाले.

जीडीपीत जैन समाजाचा वाटा : फडणवीसउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आनंद दिघे यांचे कार्य खूप मोठे आहे. ते ठाणे जिल्ह्याच्या अत्यंत दुर्गम भागात काम करायचे. तेव्हा त्यांच्या रुग्णवाहिकामुळे अनेकांचे प्राण वाचले. त्यांची परंपरा एकनाथ शिंदे चालवत आहेत. तसेच ज्यांच्या पाठी जैन समाज आणि जितो असतात, त्यांना संसाधनाची कोणतीही कमी नसते. आज देशाचा जीडीपी वाढवण्यात जैन समाजाचा मोठा वाटा आहे. या समाजातील व्यक्ती नुसते पैसे कमवत नाही, तर लोकांची सेवा पण करतात.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघhospitalहॉस्पिटल