शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रामध्ये उत्तम पाऊस; पाणी साठ्यात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 19:06 IST

गेल्या काही दिवसांपासून धरणांमध्ये मात्र पावसाचा जोर वाढल्यामुळे पाणी साठ्यात वाढ होत आहे. यामुळे पाणी कपातीची चिंता आता काही अंशी कमी झाल्याचे  समोर आले आहे.

ठाणे - चार दिवसांपासून संतत धार पडणाऱ्या पावसाची आजही जिल्ह्यातील सातही तालुक्यात रिपरिप सुरुच आहे.पण यंदा गेल्या काही दिवसांपासून धरणांमध्ये मात्र पावसाचा जोर वाढल्यामुळे पाणी साठ्यात वाढ होत आहे. यामुळे पाणी कपातीची चिंता आता काही अंशी कमी झाल्याचे  समोर आले आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी ठाणे, मुंबईला पाणी पुरवठा करणारे बारवी धरण, आंध्रा, मोडक सागर १०० टक्के भरले होते, तर भातसा, तानसा आणि मध्यवैतरणा भरण्याच्या उंबरठ्यावर होते.गेल्या वर्षी धरणातील पाणी साठा झपाट्याने वाढल्यामुळे सर्व धरणे आँगस्ट संपण्या आधी भरले होते. मात्र यंदा पाऊस लांबणीवर पडल्यामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणी साठ्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी चिंता व्यक्त केली होती. मात्र त्या दिवसापासून पाऊस लागून असल्यामुळे धरणांच्या पाणी साठ्यातही वाढ झाली आहे. यामुळे पाणी समस्येची चिंता आता काही अंशी कमी झाली आहे. निवासी भागात पडणार्‍या पावसाच्या तुलनेत आज धरणांच्या पाणलोटात पावसाचा जोर दिसून येत आहे.बारवी धरणासह भातसा, आंध्रा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा धरणांच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील एमआयडीसीच्या बारवी धरणात २४ तासात आज सरासरी ७१.५० मिमी पाऊस पडला आहे. यापैकी बारवी धरणात ३२ मिमी., खानिवरे ११६, कान्होळ ३७, पाटगांव ८३ आणि ठाकूरवाडी ५० मिमी. सर्व साधारण पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. आता या धरणाची पाणी पातळी ६८.९६ मीटर झाली आहे. या धरणात अजून ३.६४ मीटर पाणी साठा होणे अपेक्षित आहे. तत्पूर्वी या धरणात आज ७१.२२ टक्के पाणी साठा तयार झाला आहे. गेल्या वर्षी तो १००.११ टक्के होताबारवी धरणात ७२.६० मीटर म्हणजे ३४०.४८ दशलक्ष घनमीटर पाणी धरणात साठा यंदा करण्यात येणार आहे. त्यासाठी धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजून साडे तीन मीटर पाणी पाणी होणे आवश्यक आहे. त्यानंतर या पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. बारवी प्रमाणेच भातसा धरणात ८०.८९ टक्के पाणी साठा झाला आहे. आज धरणात ३८ मिमी पाऊस पडला आहे. तर आंध्र धरणात यंदा प्रथमच आज ८१ मिमी पाऊस पडला. आता या धरणात ५२.५७ टक्के पाणी साठा झाला आहे. मोडक सागरमध्ये ५१ मिमी पाऊस पडला आता या धरणात ९०.६३ टक्के साठा आहे. तानसात 21 मिमी पाऊस पडला असून आता धरणात ७९ टक्के पाणी साठा तयार झाला. तर मध्ये वैतरण आज ५० मिमी पाऊस पडला असता धरणात आता ८२ टक्के पाणी साठा संकलीत झाला आहे.जिल्ह्यात या पावसाच्या रिपरिप मुळे आज सरासरी २३ मिमी पाऊस पडल्याची नोंद घेतली आहे. यापैकी १७ मिमी., कल्याणला ३१, मुरबाडला २०, भिवंडीला १३, शहापूरला ४६, उल्हासनगरला २९ आणि अंबरनाथला १२मिमी पाऊस आज पडला आहे .

टॅग्स :Rainपाऊसthaneठाणे