शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

ठाणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रामध्ये उत्तम पाऊस; पाणी साठ्यात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 19:06 IST

गेल्या काही दिवसांपासून धरणांमध्ये मात्र पावसाचा जोर वाढल्यामुळे पाणी साठ्यात वाढ होत आहे. यामुळे पाणी कपातीची चिंता आता काही अंशी कमी झाल्याचे  समोर आले आहे.

ठाणे - चार दिवसांपासून संतत धार पडणाऱ्या पावसाची आजही जिल्ह्यातील सातही तालुक्यात रिपरिप सुरुच आहे.पण यंदा गेल्या काही दिवसांपासून धरणांमध्ये मात्र पावसाचा जोर वाढल्यामुळे पाणी साठ्यात वाढ होत आहे. यामुळे पाणी कपातीची चिंता आता काही अंशी कमी झाल्याचे  समोर आले आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी ठाणे, मुंबईला पाणी पुरवठा करणारे बारवी धरण, आंध्रा, मोडक सागर १०० टक्के भरले होते, तर भातसा, तानसा आणि मध्यवैतरणा भरण्याच्या उंबरठ्यावर होते.गेल्या वर्षी धरणातील पाणी साठा झपाट्याने वाढल्यामुळे सर्व धरणे आँगस्ट संपण्या आधी भरले होते. मात्र यंदा पाऊस लांबणीवर पडल्यामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणी साठ्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी चिंता व्यक्त केली होती. मात्र त्या दिवसापासून पाऊस लागून असल्यामुळे धरणांच्या पाणी साठ्यातही वाढ झाली आहे. यामुळे पाणी समस्येची चिंता आता काही अंशी कमी झाली आहे. निवासी भागात पडणार्‍या पावसाच्या तुलनेत आज धरणांच्या पाणलोटात पावसाचा जोर दिसून येत आहे.बारवी धरणासह भातसा, आंध्रा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा धरणांच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील एमआयडीसीच्या बारवी धरणात २४ तासात आज सरासरी ७१.५० मिमी पाऊस पडला आहे. यापैकी बारवी धरणात ३२ मिमी., खानिवरे ११६, कान्होळ ३७, पाटगांव ८३ आणि ठाकूरवाडी ५० मिमी. सर्व साधारण पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. आता या धरणाची पाणी पातळी ६८.९६ मीटर झाली आहे. या धरणात अजून ३.६४ मीटर पाणी साठा होणे अपेक्षित आहे. तत्पूर्वी या धरणात आज ७१.२२ टक्के पाणी साठा तयार झाला आहे. गेल्या वर्षी तो १००.११ टक्के होताबारवी धरणात ७२.६० मीटर म्हणजे ३४०.४८ दशलक्ष घनमीटर पाणी धरणात साठा यंदा करण्यात येणार आहे. त्यासाठी धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजून साडे तीन मीटर पाणी पाणी होणे आवश्यक आहे. त्यानंतर या पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. बारवी प्रमाणेच भातसा धरणात ८०.८९ टक्के पाणी साठा झाला आहे. आज धरणात ३८ मिमी पाऊस पडला आहे. तर आंध्र धरणात यंदा प्रथमच आज ८१ मिमी पाऊस पडला. आता या धरणात ५२.५७ टक्के पाणी साठा झाला आहे. मोडक सागरमध्ये ५१ मिमी पाऊस पडला आता या धरणात ९०.६३ टक्के साठा आहे. तानसात 21 मिमी पाऊस पडला असून आता धरणात ७९ टक्के पाणी साठा तयार झाला. तर मध्ये वैतरण आज ५० मिमी पाऊस पडला असता धरणात आता ८२ टक्के पाणी साठा संकलीत झाला आहे.जिल्ह्यात या पावसाच्या रिपरिप मुळे आज सरासरी २३ मिमी पाऊस पडल्याची नोंद घेतली आहे. यापैकी १७ मिमी., कल्याणला ३१, मुरबाडला २०, भिवंडीला १३, शहापूरला ४६, उल्हासनगरला २९ आणि अंबरनाथला १२मिमी पाऊस आज पडला आहे .

टॅग्स :Rainपाऊसthaneठाणे