शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

ठाणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रामध्ये उत्तम पाऊस; पाणी साठ्यात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 19:06 IST

गेल्या काही दिवसांपासून धरणांमध्ये मात्र पावसाचा जोर वाढल्यामुळे पाणी साठ्यात वाढ होत आहे. यामुळे पाणी कपातीची चिंता आता काही अंशी कमी झाल्याचे  समोर आले आहे.

ठाणे - चार दिवसांपासून संतत धार पडणाऱ्या पावसाची आजही जिल्ह्यातील सातही तालुक्यात रिपरिप सुरुच आहे.पण यंदा गेल्या काही दिवसांपासून धरणांमध्ये मात्र पावसाचा जोर वाढल्यामुळे पाणी साठ्यात वाढ होत आहे. यामुळे पाणी कपातीची चिंता आता काही अंशी कमी झाल्याचे  समोर आले आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी ठाणे, मुंबईला पाणी पुरवठा करणारे बारवी धरण, आंध्रा, मोडक सागर १०० टक्के भरले होते, तर भातसा, तानसा आणि मध्यवैतरणा भरण्याच्या उंबरठ्यावर होते.गेल्या वर्षी धरणातील पाणी साठा झपाट्याने वाढल्यामुळे सर्व धरणे आँगस्ट संपण्या आधी भरले होते. मात्र यंदा पाऊस लांबणीवर पडल्यामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणी साठ्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी चिंता व्यक्त केली होती. मात्र त्या दिवसापासून पाऊस लागून असल्यामुळे धरणांच्या पाणी साठ्यातही वाढ झाली आहे. यामुळे पाणी समस्येची चिंता आता काही अंशी कमी झाली आहे. निवासी भागात पडणार्‍या पावसाच्या तुलनेत आज धरणांच्या पाणलोटात पावसाचा जोर दिसून येत आहे.बारवी धरणासह भातसा, आंध्रा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा धरणांच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील एमआयडीसीच्या बारवी धरणात २४ तासात आज सरासरी ७१.५० मिमी पाऊस पडला आहे. यापैकी बारवी धरणात ३२ मिमी., खानिवरे ११६, कान्होळ ३७, पाटगांव ८३ आणि ठाकूरवाडी ५० मिमी. सर्व साधारण पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. आता या धरणाची पाणी पातळी ६८.९६ मीटर झाली आहे. या धरणात अजून ३.६४ मीटर पाणी साठा होणे अपेक्षित आहे. तत्पूर्वी या धरणात आज ७१.२२ टक्के पाणी साठा तयार झाला आहे. गेल्या वर्षी तो १००.११ टक्के होताबारवी धरणात ७२.६० मीटर म्हणजे ३४०.४८ दशलक्ष घनमीटर पाणी धरणात साठा यंदा करण्यात येणार आहे. त्यासाठी धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजून साडे तीन मीटर पाणी पाणी होणे आवश्यक आहे. त्यानंतर या पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. बारवी प्रमाणेच भातसा धरणात ८०.८९ टक्के पाणी साठा झाला आहे. आज धरणात ३८ मिमी पाऊस पडला आहे. तर आंध्र धरणात यंदा प्रथमच आज ८१ मिमी पाऊस पडला. आता या धरणात ५२.५७ टक्के पाणी साठा झाला आहे. मोडक सागरमध्ये ५१ मिमी पाऊस पडला आता या धरणात ९०.६३ टक्के साठा आहे. तानसात 21 मिमी पाऊस पडला असून आता धरणात ७९ टक्के पाणी साठा तयार झाला. तर मध्ये वैतरण आज ५० मिमी पाऊस पडला असता धरणात आता ८२ टक्के पाणी साठा संकलीत झाला आहे.जिल्ह्यात या पावसाच्या रिपरिप मुळे आज सरासरी २३ मिमी पाऊस पडल्याची नोंद घेतली आहे. यापैकी १७ मिमी., कल्याणला ३१, मुरबाडला २०, भिवंडीला १३, शहापूरला ४६, उल्हासनगरला २९ आणि अंबरनाथला १२मिमी पाऊस आज पडला आहे .

टॅग्स :Rainपाऊसthaneठाणे