शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

दैव देते आणि कर्म नेते; सांगा ना आम्ही जगायचं कसं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 00:49 IST

Palghar : गेल्या तीन वर्षांपासून एक तर पाऊस लवकर जाण्याने बहरलेली पिके उन्हातान्हात जळून जातात, नाही तर कधी हातातोंडाशी आलेला घास पडणारा पाऊस हिरावून नेतो.

-  जनार्दन भेरे

भातसानगर : दैव देते आणि कर्म नेते, अशीच अवस्था शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. आठ महिने राबायचे आणि शेवटी वाट पाहायची दैवाची. कारण, केलेली मेहनत फळाला येईलच, असे नाही. गेल्या तीन वर्षांपासून एक तर पाऊस लवकर जाण्याने बहरलेली पिके उन्हातान्हात जळून जातात, नाही तर कधी हातातोंडाशी आलेला घास पडणारा पाऊस हिरावून नेतो. यावर्षीच्या पावसाने तर कहरच केला. तब्बल पाच महिने पाऊस पडला, तोही मुसळधार. शेतात पिकलेले सोनं पार गळून गेलं आणि त्याला मोडही आले. तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांनीची दयनीय अवस्था झाली आहे. काढलेले कर्ज माफ झाले नाही आणि आता भरायला लागणारे कर्ज आणि वर्षभराचा तांदूळ आणायचा कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील नडगाव येथील शेतकरी दाजी नामदेव मांजे ७८ व्या वर्षी अतिशय दुःखी झालेत. दोन हेक्टर ७० गुंठे जमीन घेतली. शेतीसाठी कर्ज घेतले तीन लाख ५० हजार रुपयांचे. यावर्षी लागवड, बेननी, खते, मजुरी यासाठी ७० हजारांचा खर्च आला. त्यांची दोन मुले विवाहित आहेत. आज या मुलांची मुले शिक्षण घेत आहेत. मोठ्या मुलाचा मुलगा पदवी घेऊन घरी आहे. एम.पी.एस.सी. परीक्षा द्यायची त्याची इच्छा आहे, मात्र त्यासाठी पैसे नाहीत.दुसऱ्या भावाची दोन्ही मुले शिक्षण घेत आहेत. पण, परिपूर्ण साहित्य ते घेऊ शकत नाही, अशी स्थिती या कुटुंबाची आहे. भातपीक चांगले आले असते, तर किमान दोन लाखांपर्यंत उत्पन्न सहज मिळाले असते. दिवाळीही काही दिवसांवर आली असून घरात वर्षभरासाठी लागणारा तांदूळ नाही. अशी परिस्थिती असेल तर सांगा आम्ही काय करायचे? घरात कुणीही नोकरीस नाही. केवळ शेतीवर सारे, मग माझ्या मुलांनी जगायचं कसं, अशी भावुक प्रतिक्रिया दाजी यांनी व्यक्त केली.

स्वत: पिकवूनही तांदुळाचा दाणादेखील नाहीभातसानगर : बिरवाडी येथील शेतकरी दिलीप भेरे यांनी गेल्या वर्षीपर्यंत शेती केली नव्हती. मात्र, यावर्षी घरात घरचा दाणा असावा म्हणून त्यांनी दोन एकर जागेत भातपीक लावले. पण परतीच्या पावसाने पीक भीजून त्याची गुणवत्ता घसरली. त्यामुळे तांदुळ कवडीमोल भावात विकावे लागणार आहेत. आता भेरे कुटुंबीयांना स्वत:साठी वर्षभर तांदुळ घेता येईल की नाही, याबाबत अनिश्चितता आहे. पावसाने असा फटका दिला की, पिकाची वाट लागली, ते कुजलेेे. धान्य निकृष्ट झाले आहे. मोठ्या मुलीचे शिक्षण सुरू आहे. दुसऱ्या मुलासाठी ऑनलाइन मोबाइल घेण्याचे ठरवले होते. मात्र, तोही आता घेऊ शकत नाही. कारण, हाच भात कवडीमोल किमतीला विकला जाईल. शिवाय, वर्षभरासाठी लागणारा तांदूळही मिळणार नाही, याची खंत या शेतकऱ्याला लागली आहे.

मुलांच्या शिक्षणाचा निर्माण झाला मोठा प्रश्नकांबारे येथील राजेंद्र विशे यांनी हे दुःख पेलण्याची क्षमता नसल्याचे सांगितले. आपली मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. सारे शिक्षण आज याच शेतीच्या उत्पन्नातून घेतले जाते. शाळेची फी, गणवेश वा इतर खर्च हा शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून केला जातो. पण यावर्षी सर्व स्वप्नांवर पाणी फिरले. बी.ए.पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरीची अपेक्षा त्यांनी ठेवली नाही. आपल्या काळ्या मातीत एकरूप झाले. अपार मेहनत घेत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह याच शेतीतून करू लागले. दरवर्षी अनेक अस्मानी संकटे येतात. पण त्यावरही मात करीत त्यांनी आपल्या कुटुंबाचा डोलारा याच शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून सांभाळला. यावर्षी तर भातपीक हातातच आले नाही. ना चांगला दाणा ना अधिकचे धान्य. 

टॅग्स :palgharपालघर