शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

दैव देते आणि कर्म नेते; सांगा ना आम्ही जगायचं कसं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 00:49 IST

Palghar : गेल्या तीन वर्षांपासून एक तर पाऊस लवकर जाण्याने बहरलेली पिके उन्हातान्हात जळून जातात, नाही तर कधी हातातोंडाशी आलेला घास पडणारा पाऊस हिरावून नेतो.

-  जनार्दन भेरे

भातसानगर : दैव देते आणि कर्म नेते, अशीच अवस्था शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. आठ महिने राबायचे आणि शेवटी वाट पाहायची दैवाची. कारण, केलेली मेहनत फळाला येईलच, असे नाही. गेल्या तीन वर्षांपासून एक तर पाऊस लवकर जाण्याने बहरलेली पिके उन्हातान्हात जळून जातात, नाही तर कधी हातातोंडाशी आलेला घास पडणारा पाऊस हिरावून नेतो. यावर्षीच्या पावसाने तर कहरच केला. तब्बल पाच महिने पाऊस पडला, तोही मुसळधार. शेतात पिकलेले सोनं पार गळून गेलं आणि त्याला मोडही आले. तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांनीची दयनीय अवस्था झाली आहे. काढलेले कर्ज माफ झाले नाही आणि आता भरायला लागणारे कर्ज आणि वर्षभराचा तांदूळ आणायचा कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील नडगाव येथील शेतकरी दाजी नामदेव मांजे ७८ व्या वर्षी अतिशय दुःखी झालेत. दोन हेक्टर ७० गुंठे जमीन घेतली. शेतीसाठी कर्ज घेतले तीन लाख ५० हजार रुपयांचे. यावर्षी लागवड, बेननी, खते, मजुरी यासाठी ७० हजारांचा खर्च आला. त्यांची दोन मुले विवाहित आहेत. आज या मुलांची मुले शिक्षण घेत आहेत. मोठ्या मुलाचा मुलगा पदवी घेऊन घरी आहे. एम.पी.एस.सी. परीक्षा द्यायची त्याची इच्छा आहे, मात्र त्यासाठी पैसे नाहीत.दुसऱ्या भावाची दोन्ही मुले शिक्षण घेत आहेत. पण, परिपूर्ण साहित्य ते घेऊ शकत नाही, अशी स्थिती या कुटुंबाची आहे. भातपीक चांगले आले असते, तर किमान दोन लाखांपर्यंत उत्पन्न सहज मिळाले असते. दिवाळीही काही दिवसांवर आली असून घरात वर्षभरासाठी लागणारा तांदूळ नाही. अशी परिस्थिती असेल तर सांगा आम्ही काय करायचे? घरात कुणीही नोकरीस नाही. केवळ शेतीवर सारे, मग माझ्या मुलांनी जगायचं कसं, अशी भावुक प्रतिक्रिया दाजी यांनी व्यक्त केली.

स्वत: पिकवूनही तांदुळाचा दाणादेखील नाहीभातसानगर : बिरवाडी येथील शेतकरी दिलीप भेरे यांनी गेल्या वर्षीपर्यंत शेती केली नव्हती. मात्र, यावर्षी घरात घरचा दाणा असावा म्हणून त्यांनी दोन एकर जागेत भातपीक लावले. पण परतीच्या पावसाने पीक भीजून त्याची गुणवत्ता घसरली. त्यामुळे तांदुळ कवडीमोल भावात विकावे लागणार आहेत. आता भेरे कुटुंबीयांना स्वत:साठी वर्षभर तांदुळ घेता येईल की नाही, याबाबत अनिश्चितता आहे. पावसाने असा फटका दिला की, पिकाची वाट लागली, ते कुजलेेे. धान्य निकृष्ट झाले आहे. मोठ्या मुलीचे शिक्षण सुरू आहे. दुसऱ्या मुलासाठी ऑनलाइन मोबाइल घेण्याचे ठरवले होते. मात्र, तोही आता घेऊ शकत नाही. कारण, हाच भात कवडीमोल किमतीला विकला जाईल. शिवाय, वर्षभरासाठी लागणारा तांदूळही मिळणार नाही, याची खंत या शेतकऱ्याला लागली आहे.

मुलांच्या शिक्षणाचा निर्माण झाला मोठा प्रश्नकांबारे येथील राजेंद्र विशे यांनी हे दुःख पेलण्याची क्षमता नसल्याचे सांगितले. आपली मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. सारे शिक्षण आज याच शेतीच्या उत्पन्नातून घेतले जाते. शाळेची फी, गणवेश वा इतर खर्च हा शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून केला जातो. पण यावर्षी सर्व स्वप्नांवर पाणी फिरले. बी.ए.पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरीची अपेक्षा त्यांनी ठेवली नाही. आपल्या काळ्या मातीत एकरूप झाले. अपार मेहनत घेत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह याच शेतीतून करू लागले. दरवर्षी अनेक अस्मानी संकटे येतात. पण त्यावरही मात करीत त्यांनी आपल्या कुटुंबाचा डोलारा याच शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून सांभाळला. यावर्षी तर भातपीक हातातच आले नाही. ना चांगला दाणा ना अधिकचे धान्य. 

टॅग्स :palgharपालघर