शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

कल्याण-डोंबिवली स्मार्ट करण्याचे लक्ष्य

By admin | Updated: November 11, 2016 02:56 IST

कल्याण-डोंबिवलीच्या महापौरपदाचा पदभार वर्षभरापूर्वी हाती घेतला. तेव्हा राजकीय परिस्थिती प्रतिकूल होती. त्यावर मात

कल्याण : कल्याण-डोंबिवलीच्या महापौरपदाचा पदभार वर्षभरापूर्वी हाती घेतला. तेव्हा राजकीय परिस्थिती प्रतिकूल होती. त्यावर मात करत मागील वर्षभरात शहरातील नागरिकांच्या हिताची व शहर विकासाची अनेक कामे मार्गी लावली, असा दावा महापौर राजेंद्र देवळेकर यांनी गुरुवारी येथे केला.महापौरपदाच्या वर्षपूर्तीनिमित्त देवळेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सभागृह नेते राजेश मोरे, शिवसेना गटनेते रमेश जाधव, काँग्रेसचे गटनेते नंदू म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. देवळेकर यांनी सांगितले की, ‘महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती नव्हती. महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपा सत्तेसाठी युती झाली. त्यामुळे मला महापौरपदाचा मान मिळाला. महापौरपदाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा महापालिकेत २७ गावांचा समावेश झाला होता. महापालिकेतील एलबीटी कर रद्द झाला होता. महापालिकेस अस्वच्छ शहराचा दर्जा केंद्राच्या समितीने दिला होता. या प्रतिकूल परिस्थितीत महापौरपदाचा कारभार हाती घेतला. महापालिकेचास्मार्ट सिटीच्या यादीत नंबर आणण्यासाठी स्मार्ट सिटीची शिखर परिषद घेतली. महापालिकेचा समावेश स्मार्ट सिटीत झाला आहे. स्मार्ट सिटीच्या कामाला सुरुवात झाली आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत स्टेशन परिसर वाहतूकमुक्त केला जाणार आहे. कल्याण पूर्व-पश्चिमेला जोडणारा स्कायवॉक लवकर नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे. त्याचे काम युद्धपातळीवर सध्या सुरू आहे.’ ते पुढे म्हणाले की, ‘शहराचा खाडीकिनारा सुभोभित करण्यासाठी निविदा काढल्या आहेत. हे कामही स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत करण्यात येणार आहे. कल्याण पश्चिमेत सिटी पार्कचा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. त्याचा डीपीआर तयार करण्यात आला आहे. शहरातील कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी निविदा मागवली आहे. तिला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच बायोगॅस प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यापैकी दोन प्रकल्पांना मान्यता मिळाली आहे. शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी वाहतूक धोरण मंजूर करण्यात आले आहे. कल्याण दुर्गाडी सहापदरी पूल आणि मोठागाव ठाकुर्ली ते माणकोली हा खाडीपूल मंजूर झाला आहे. त्याचे विकासकाम ‘एमएमआरडीए’तर्फे सुरू केले आहे. ८०० कोटी खर्चाचा रिंगरूट तयार केला जाणार आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. शहरात मेट्रो रेल्वे व कल्याण-शीळ एलिव्हेटेड रस्ता आणि कल्याण ते मुंबई जलवाहतूक सुरू होणार आहे. कल्याण सर्व वाहतुकीच्या साधनांशी जोडले जाणार आहे. शहरातील फेरीवाल्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी फेरीवाला धोरण ठरवले जाणार आहे. रस्ते विकासाची कामे हाती घेतली आहेत. अर्धवट विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहे. २४ तास पाणीपुरवठा योजना महापालिकेच्या १० प्रभाग क्षेत्रांपैकी दोन प्रभाग क्षेत्रांत सुरू करण्यात येणार आहे. कल्याणमधील एक व डोंबिवलीतील एक प्रभाग क्षेत्राची २४ तास पाणीपुरवठा योजनेसाठी निवड केली जाणार आहे. २७ गावांत रस्ते विकास करण्यात येत आहे. नागरिकांना जास्तीतजास्त वेळ दिला आहे.