शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

नाराजांना तहहयात पदे द्या; अंतर्गत कलह पोचला शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 02:53 IST

चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी स्थायी समितीचा राजीनामा दिला आणि पक्षातील अंतर्गत कलह पुन्हा समोर आला.

ठाणे  - चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी स्थायी समितीचा राजीनामा दिला आणि पक्षातील अंतर्गत कलह पुन्हा समोर आला. मुल्ला यांच्यासह नाराज १० ते १२ नगरसेवक पुढील आठवड्यात पक्षप्रमुख शरद पवार यांची पुन्हा भेट घेऊन, या मुद्यावर गुणात्मक चर्चा करण्याची मागणी करणार आहेत. परंतु, त्याआधीच विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी पवार यांना पत्र पाठवून षटकार मारला आहे. प्रदेशस्तरावरील पदे आम्हाला नकोत. शहराध्यक्षपद तसेच विरोधी पक्षनेतेपदही मुल्ला आणि जगदाळे यांना तहहयात देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे राष्टÑवादीतील अंतर्गत कलह आता टोकाला पोहोचला आहे.राष्टÑवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी काही दिवसांपूर्वी स्थायी समितीचा राजीनामा दिला. अद्याप त्यांचा राजीनामा मंजूर झाला नसला तरी, त्यांच्या समर्थनार्थ राष्टÑवादीतील काही नगरसेवक पुढे आले आहेत. यामध्ये लोकशाही आघाडीचे गटनेते हणमंत जगदाळे यांचाही समावेश आहे. तीन महिन्यांपूर्वी या नाराज मंडळींनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर गाºहाणे मांडले होते. परंतु, त्याचा उपयोग झाला नाही. आता नव्याने सुरू झालेले राजीनामानाट्य पालिका वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. या नाराजांनी ठाण्याची राष्टÑवादी ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली असल्याचा आरोप केला आहे. पुढील आठवड्यात शरद पवार यांची पुन्हा भेट घेण्याची तयारीही त्यांनी चालवली आहे. या भेटीतून त्यांच्या हाती काही लागण्याची शक्यता कमी असल्याने, पक्षातून आम्हाला काहीच मिळणार नसेल तर राहायचे कशाला, असा सूर या मंडळीने आळवला आहे. त्यामुळे येत्या काळात ठाणे शहर राष्टÑवादीमध्ये मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. पवार यांच्या बैठकीमध्ये गुणात्मक चर्चा व्हावी, अशी अपेक्षा नाराज गटाने व्यक्त केली आहे. तशी चर्चा झाली नाही, तर मात्र वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीतसुद्धा ही मंडळी असल्याची माहिती राष्टÑवादीच्या सूत्रांनी दिली.दरम्यान, पुढील आठवड्यात १० ते १२ नाराज नगरसेवक पवार यांची भेट घेणार असले, तरी त्याआधीच विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी पवार यांना पत्र पाठवून खळबळ उडवून दिली आहे.मला आणि परांजपे यांना प्रदेशच्या कमिटीवर जी पदे देण्यात आली आहेत, त्यातून मुक्त करावे. आम्ही पक्षाचा कार्यकर्ता म्हणून निष्ठेने काम करू, असे पाटील यांनी या पत्रात नमूद केले आहे. एकूणच राष्टÑवादीमधील हा वाद आता आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत असून येत्या काळात या पक्षात मोठी उलथापालथ होण्याचे संकेत यातून मिळत आहेत.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेस