शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
2
२० दिवसापूर्वीच थार घेतलेली, कोकणात फिरण्यासाठी निघाले होते, चौघांचा मृतदेह सापडला, दोनजण बेपत्ता; ओळख पटली, नाव आली समोर
3
इंग्रज ढासळले...! ब्रिटिश इंडियन्स, उद्योजक ब्रिटन सोडू लागले! अब्जाधीश हरमन नरुला दुबईला स्थायिक होणार
4
“मनसेचा आघाडीचा प्रस्ताव नाही, आम्हाला महाराष्ट्र धर्म शिकवू नये”; काँग्रेस नेत्यांचे उत्तर
5
निवडणूक न लढताच 'जीन्स-शर्ट'मधील तरुणाने घेतली मंत्रिपदाची शपथ! कोण आहेत दीपक प्रकाश?
6
IND vs SA: रोहित-विराट पुन्हा संघात दिसणार, बुमराह बाहेर जाणार; 'या' खेळाडूचाही पत्ता कट?
7
IIT दिल्लीमध्ये देशातील पहिल्या ‘Gen-Z पोस्ट ऑफिस’ची सुरुवात; Wifi, QR द्वारे पार्सल बुकिंग
8
"आता मैदान मोकळं, बघू कोण येतंय!"; संरक्षणातील पोलिसांना परत पाठवत जरांगेंचे आव्हान
9
Tesla Model Y सेफ्टी टेस्टमध्ये 'Pass' की 'Fail'? 5-स्टार रेटिंगमध्ये किती पॉइंट्स मिळाले? जाणून घ्या
10
“बिहारने जंगलराज नाकारून विकासाला मत दिले”; शिंदेंनी केले PM मोदी-नितीश कुमारांचे अभिनंदन
11
Metaचे मोठे पाऊल! WhatsApp मध्ये लवकरच येणार 'हे' जबरदस्त फीचर; वारंवार लॉग-इन करण्याची कटकट संपणार
12
मुलांच्या भविष्यासाठी सोने की SIP? 'या' दोन्ही पर्यायांचे फायदे-तोटे समजून घ्या आणि योग्य गुंतवणूक निवडा!
13
...त्यामुळे सर्व छोट्या मोठ्या कुरुबरी अमित शाह यांना जाऊन सांगितल्या जातात; काँग्रेसचा टोला
14
जम्मूमध्ये 'काश्मीर टाईम्स'च्या कार्यालयावर SIA चा मोठा छापा; AK-47 च्या गोळ्या आणि ग्रेनेडचा लिव्हर जप्त!
15
बाजारात तेजीचा डबल धमका! निफ्टी वर्षभरानंतर २६,२०० पार, गुंतवणूकदारांची ६८,००० कोटींची कमाई
16
Red Fort Blast: दिल्लीतील स्फोट प्रकरणात आणखी चार प्रमुख आरोपींना अटक, एनआयएची मोठी कारवाई
17
सप्तपदी झाले, डीजेवर नाचली, पाठवणीच्या वेळी पसार, नवरदेव म्हणतो, "जमीन गहाण ठेवून लग्न..."
18
दिल्ली दंगल सूनियोजित कट होता; उमर खालिद-शरजील इमामच्या जामिनास पोलिसांचा विरोध
19
अ‍ॅसिड हल्ल्यातील 'ममता'चा अखेर मृत्यू; फेसबुकवर वेदना मांडणाऱ्या आईची दोन मुले झाली पोरकी
20
नेपाळमध्ये पुन्हा एकदा Gen-Z रस्त्यावर उतरले, मोठा गोंधळ सुरू; कर्फ्यू लागू
Daily Top 2Weekly Top 5

अनाथ मुलांना सरकारी ओळखपत्र द्या; केशवसृष्टी पुरस्कार प्राप्त सागर रेड्डींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 17:26 IST

देशात ४ हजारांहुन अधिक सामाजिक संस्था लाखो अनाथ मुलांचे संगोपन करीत आहेत.

ऑनलाईन लोकमतभार्इंदर, दि. १८ - देशातील हजारो अनाथ मुलांना आधार कार्ड लिंक करण्यासाठी त्यांना सरकारी ओळखपत्र द्या, अशी मागणी यंदाचा सामाजिक केशवसृष्टी पुस्कार प्राप्त सागर रेड्डी यांनी सोमवारी पालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत केली.देशात ४ हजारांहुन अधिक सामाजिक संस्था लाखो अनाथ मुलांचे संगोपन करीत आहेत. त्यांना वयाची १८ वर्षे पुर्ण केल्यानंतर स्वावलंबनासाठी अनाथालयातुन बाहेर पडावे लागते. त्यावेळी त्यांच्या शैक्षणिक दाखल्यावर जातीची ओळख नसतेच. तसेच सामाजिक संस्थेच्या ओळखपत्राखेरीज सरकारी ओळखपत्र नसल्याने त्याची रोजगारासाठी धडपड सुरु होते. मनासारखा रोजगार न मिळाल्याने काही मुले गुंड प्रवृत्तीकडे वळतात तर काही बिगारी व मजुरीची कामे करतात. 

काहींचे मानसिक संतुलन बिघडते तर काही अनाथ मुलींना वाममार्गाला  लावले जाते. आई-वडीलांचे छत्र हरपल्याने मला सुद्धा केवळ तीन महिन्यांचा असताना आंध्रप्रदेशातील अनाथालयात सोडण्यात आले होते. तेथील माध्यमिक शिक्षण पुर्ण केल्यानंतर १८ वर्षांनी रोजगारासाठी थेट मुंबई गाठली. तेथे सलग तीन वर्षे निमुटपणे मिळेल ती कामे करीत राहिलो. त्यातुन मिळालेल्या रक्कमेतुन अभियंत्याचे शिक्षण पुर्ण केले. त्यामुळे लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो या कंपनीत नोकरी मिळु शकली. नोकरी मिळाल्यानंतर दरवर्षी दिवाळीला अनाथालयात जाऊ लागल्यानंतर तेथुन १८ वर्षानंतर बोहर पडलेल्या अनाथ मुलांचे वास्तव अस्वस्थ करु लागले. 

त्यामुळे अनाथ मुलांसाठी कार्य करण्याचा निर्धार करीत सुरुवातीला १४ अनाथ मुलांच्या राहण्यासह जेवणाची व शिक्षणाचा खर्च उचलला. काही अनाथ मुलींचे विवाह पार पडल्यानंतर पुढे जबाबदारी वाढली. त्यामुळे एकता निराधार संघ या सामाजिक संस्थेची स्थापना केली. त्याचा विस्तार महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगना व पड्डुचेरी (पाँडेचरी) मध्ये करण्यात आला. आर्थिक  देणग्यांसह स्वत:च्या पगारातुन सध्या १८०० अनाथ मुलांचे संगोपन केले जात आहे. परंतु, सध्या केंद्र सरकारने सर्व भारतीयांना महत्वांचे व्यवहार आधार कार्डशी लिंक करण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु, अनाथ मुलांकडे सामाजिक संस्थेखेरीज त्याच्या कुटुंबाची ओळख नसल्याने त्याला आधारकार्ड मिळणे अडचणीचे ठरु लागले आहे. हि अडचण दुर करण्यासाठी केंद्र सरकारकडे अनेकदा पाठपुरावा केला. त्यावर संस्थेत असलेल्या अनाथ मुलांनाच सरकारी प्रमाणपत्र दिले जाईल, अनाथालयाबाहेर पडलेल्या मुलांना ते दिले जाणार नसल्याचे सरकारकडुन सांगण्यात आले आहे. 

यामुळे त्या मुलांची पंचाईत होणार असल्याने सरसकट सर्वांनाच सरकारी ओळखपत्र मिळावे, यासाठी २०११ मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ती अद्याप निकाली काढण्यात आलेली नाही. यामुळे अनाथांचा आधार लटकत राहिल्याची खंत व्यक्त करीत सागर रेड्डी याने प्रसार माध्यमांद्वारे सरकारी ओळखपत्राची मागणी केली आहे. त्याच्या या कार्यामुळेच यंदाचा केशवसृष्टी पुरस्कार त्याला देण्यात आला आहे. हा पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक हणमंतराव गायकवाड यांच्या हस्ते २ ऑक्टोबरला वांद्रयाच्या रंगशारदामध्ये प्रदान केला जाणार असल्याचे पुरस्कार समितीच्या अध्यक्षा वैजयंती आपटे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत समितीच्या कार्याध्यक्षा रश्मी भातखळकर, केशवसृष्टीचे सतिश सिन्नरकर, विश्वस्त हेमंत म्हात्रे उपस्थित होते.