शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

अनाथ मुलांना सरकारी ओळखपत्र द्या; केशवसृष्टी पुरस्कार प्राप्त सागर रेड्डींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 17:26 IST

देशात ४ हजारांहुन अधिक सामाजिक संस्था लाखो अनाथ मुलांचे संगोपन करीत आहेत.

ऑनलाईन लोकमतभार्इंदर, दि. १८ - देशातील हजारो अनाथ मुलांना आधार कार्ड लिंक करण्यासाठी त्यांना सरकारी ओळखपत्र द्या, अशी मागणी यंदाचा सामाजिक केशवसृष्टी पुस्कार प्राप्त सागर रेड्डी यांनी सोमवारी पालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत केली.देशात ४ हजारांहुन अधिक सामाजिक संस्था लाखो अनाथ मुलांचे संगोपन करीत आहेत. त्यांना वयाची १८ वर्षे पुर्ण केल्यानंतर स्वावलंबनासाठी अनाथालयातुन बाहेर पडावे लागते. त्यावेळी त्यांच्या शैक्षणिक दाखल्यावर जातीची ओळख नसतेच. तसेच सामाजिक संस्थेच्या ओळखपत्राखेरीज सरकारी ओळखपत्र नसल्याने त्याची रोजगारासाठी धडपड सुरु होते. मनासारखा रोजगार न मिळाल्याने काही मुले गुंड प्रवृत्तीकडे वळतात तर काही बिगारी व मजुरीची कामे करतात. 

काहींचे मानसिक संतुलन बिघडते तर काही अनाथ मुलींना वाममार्गाला  लावले जाते. आई-वडीलांचे छत्र हरपल्याने मला सुद्धा केवळ तीन महिन्यांचा असताना आंध्रप्रदेशातील अनाथालयात सोडण्यात आले होते. तेथील माध्यमिक शिक्षण पुर्ण केल्यानंतर १८ वर्षांनी रोजगारासाठी थेट मुंबई गाठली. तेथे सलग तीन वर्षे निमुटपणे मिळेल ती कामे करीत राहिलो. त्यातुन मिळालेल्या रक्कमेतुन अभियंत्याचे शिक्षण पुर्ण केले. त्यामुळे लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो या कंपनीत नोकरी मिळु शकली. नोकरी मिळाल्यानंतर दरवर्षी दिवाळीला अनाथालयात जाऊ लागल्यानंतर तेथुन १८ वर्षानंतर बोहर पडलेल्या अनाथ मुलांचे वास्तव अस्वस्थ करु लागले. 

त्यामुळे अनाथ मुलांसाठी कार्य करण्याचा निर्धार करीत सुरुवातीला १४ अनाथ मुलांच्या राहण्यासह जेवणाची व शिक्षणाचा खर्च उचलला. काही अनाथ मुलींचे विवाह पार पडल्यानंतर पुढे जबाबदारी वाढली. त्यामुळे एकता निराधार संघ या सामाजिक संस्थेची स्थापना केली. त्याचा विस्तार महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगना व पड्डुचेरी (पाँडेचरी) मध्ये करण्यात आला. आर्थिक  देणग्यांसह स्वत:च्या पगारातुन सध्या १८०० अनाथ मुलांचे संगोपन केले जात आहे. परंतु, सध्या केंद्र सरकारने सर्व भारतीयांना महत्वांचे व्यवहार आधार कार्डशी लिंक करण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु, अनाथ मुलांकडे सामाजिक संस्थेखेरीज त्याच्या कुटुंबाची ओळख नसल्याने त्याला आधारकार्ड मिळणे अडचणीचे ठरु लागले आहे. हि अडचण दुर करण्यासाठी केंद्र सरकारकडे अनेकदा पाठपुरावा केला. त्यावर संस्थेत असलेल्या अनाथ मुलांनाच सरकारी प्रमाणपत्र दिले जाईल, अनाथालयाबाहेर पडलेल्या मुलांना ते दिले जाणार नसल्याचे सरकारकडुन सांगण्यात आले आहे. 

यामुळे त्या मुलांची पंचाईत होणार असल्याने सरसकट सर्वांनाच सरकारी ओळखपत्र मिळावे, यासाठी २०११ मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ती अद्याप निकाली काढण्यात आलेली नाही. यामुळे अनाथांचा आधार लटकत राहिल्याची खंत व्यक्त करीत सागर रेड्डी याने प्रसार माध्यमांद्वारे सरकारी ओळखपत्राची मागणी केली आहे. त्याच्या या कार्यामुळेच यंदाचा केशवसृष्टी पुरस्कार त्याला देण्यात आला आहे. हा पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक हणमंतराव गायकवाड यांच्या हस्ते २ ऑक्टोबरला वांद्रयाच्या रंगशारदामध्ये प्रदान केला जाणार असल्याचे पुरस्कार समितीच्या अध्यक्षा वैजयंती आपटे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत समितीच्या कार्याध्यक्षा रश्मी भातखळकर, केशवसृष्टीचे सतिश सिन्नरकर, विश्वस्त हेमंत म्हात्रे उपस्थित होते.