शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

जनतेच्या पैशातून शासन आपल्या दारी कार्यक्रम राबविण्या पेक्षा जनतेला सुविधा द्या: बाळासाहेब थोरात

By नितीन पंडित | Updated: October 2, 2023 20:04 IST

ठाणे जिल्हा ग्रामीणचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शना करता आले असता पत्रकारांशी बोलत होते.

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी : शहापूर तालुक्यात रस्ते सुविधा नसल्याने पटकीचा पाडा येथील गरोदर आदिवासी महिलेला कापडाच्या झोळी मधून घेऊन जात असताना तिची रस्त्यातच प्रस्तुती झाली,शहापुर येथील हे दुर्दैव चित्र देशाने बघितले आहे,देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षां नंतर ही घटना घडते आहे.मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याचे असताना त्यांच्या जिल्ह्यात आरोग्य व रस्ते सुविधांची असलेली  दुरावस्था ही चिंताजनक आहे.एकीकडे जनतेचे हाल सुरू आहेत तर दुसरीकडे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोट्यावधी रुपये खर्च करण्यापेक्षा जनतेला घरबसल्या दाखले वितरित केले असते आणि तोच वाचलेला पैसा नागरिकांना सुविधा देण्याकरता खर्च केला असता तर ही वेळ आली नसती अशी टिका माजी महसूलमंत्री तथा विधिमंडळातील काँग्रेस गटनेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.सोमवारी थोरात हे ठाणे जिल्हा ग्रामीणचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शना करता आले असता पत्रकारांशी बोलत होते.

नाना पाटोलेंच्या मताला सहमती-

काँग्रेसच्या राजवटीमध्ये मनमोहन सिंग यांनी बनवलेले कायदे राहुल गांधी सभागृहात फाडतात ही काँग्रेसची संस्कृती आहे अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केली असून या टीकेला उत्तर देताना बाळासाहेब थोरात यांनी राज्यमंत्रीच नव्हे तर केंद्रातील मंत्री यांच्या सुध्दा हातामध्ये काहीच नाही हे वास्तव आहे.मंत्र्यांच्या हातात काही नाही तर राज्यमंत्र्यांच्या हातात काय असणार, जे काही काम चालत ते प्रधानमंत्री कार्यालयातूनच चालते. या केंद्रीय मंत्रिमंडळाला शून्य किंमत आहे ही वस्तुस्थिती आहे असे स्पष्टीकरण देत थोरात यांनी नाना पटोले यांच्या प्रतिक्रेयेला दुजोरा दिला.

नथुरामांचे उदात्तीकरण करणे दुर्दैवी -

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या काँग्रेस मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यासह इंडिया कार्यकर्त्यांना पोलिसांनी मुंबईत अडविणे हे दुर्दैवी आहे.ज्या महात्मा गांधींनी जगाला अहिंसेची शिकवण दिली,सत्याग्रह असहकाराचा मार्ग दाखवला त्यांना अभिवादन करायला जायचं नाही,जी वृत्ती इंग्रजांची होती तीच वृत्ती भाजपा सरकारची आहे.भाजप कडून नथुरामाचे उद्दातीकरण करण्याचे काम सुरू आहे ही दुर्दैवी गोष्ट आहे.या गोष्टीचे देशासह संपूर्ण जग निषेध करील अशी प्रतिक्रिया देखील यावेळी बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे .

टॅग्स :BhiwandiभिवंडीBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात