शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

जनतेच्या पैशातून शासन आपल्या दारी कार्यक्रम राबविण्या पेक्षा जनतेला सुविधा द्या: बाळासाहेब थोरात

By नितीन पंडित | Updated: October 2, 2023 20:04 IST

ठाणे जिल्हा ग्रामीणचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शना करता आले असता पत्रकारांशी बोलत होते.

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी : शहापूर तालुक्यात रस्ते सुविधा नसल्याने पटकीचा पाडा येथील गरोदर आदिवासी महिलेला कापडाच्या झोळी मधून घेऊन जात असताना तिची रस्त्यातच प्रस्तुती झाली,शहापुर येथील हे दुर्दैव चित्र देशाने बघितले आहे,देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षां नंतर ही घटना घडते आहे.मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याचे असताना त्यांच्या जिल्ह्यात आरोग्य व रस्ते सुविधांची असलेली  दुरावस्था ही चिंताजनक आहे.एकीकडे जनतेचे हाल सुरू आहेत तर दुसरीकडे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोट्यावधी रुपये खर्च करण्यापेक्षा जनतेला घरबसल्या दाखले वितरित केले असते आणि तोच वाचलेला पैसा नागरिकांना सुविधा देण्याकरता खर्च केला असता तर ही वेळ आली नसती अशी टिका माजी महसूलमंत्री तथा विधिमंडळातील काँग्रेस गटनेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.सोमवारी थोरात हे ठाणे जिल्हा ग्रामीणचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शना करता आले असता पत्रकारांशी बोलत होते.

नाना पाटोलेंच्या मताला सहमती-

काँग्रेसच्या राजवटीमध्ये मनमोहन सिंग यांनी बनवलेले कायदे राहुल गांधी सभागृहात फाडतात ही काँग्रेसची संस्कृती आहे अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केली असून या टीकेला उत्तर देताना बाळासाहेब थोरात यांनी राज्यमंत्रीच नव्हे तर केंद्रातील मंत्री यांच्या सुध्दा हातामध्ये काहीच नाही हे वास्तव आहे.मंत्र्यांच्या हातात काही नाही तर राज्यमंत्र्यांच्या हातात काय असणार, जे काही काम चालत ते प्रधानमंत्री कार्यालयातूनच चालते. या केंद्रीय मंत्रिमंडळाला शून्य किंमत आहे ही वस्तुस्थिती आहे असे स्पष्टीकरण देत थोरात यांनी नाना पटोले यांच्या प्रतिक्रेयेला दुजोरा दिला.

नथुरामांचे उदात्तीकरण करणे दुर्दैवी -

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या काँग्रेस मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यासह इंडिया कार्यकर्त्यांना पोलिसांनी मुंबईत अडविणे हे दुर्दैवी आहे.ज्या महात्मा गांधींनी जगाला अहिंसेची शिकवण दिली,सत्याग्रह असहकाराचा मार्ग दाखवला त्यांना अभिवादन करायला जायचं नाही,जी वृत्ती इंग्रजांची होती तीच वृत्ती भाजपा सरकारची आहे.भाजप कडून नथुरामाचे उद्दातीकरण करण्याचे काम सुरू आहे ही दुर्दैवी गोष्ट आहे.या गोष्टीचे देशासह संपूर्ण जग निषेध करील अशी प्रतिक्रिया देखील यावेळी बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे .

टॅग्स :BhiwandiभिवंडीBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात