शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

'सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न द्या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2019 15:58 IST

आयएएस अधिकारी भाग्यश्री बानायत यांची मागणी

ठाणे : स्त्री शिक्षणाच्या कार्यासाठी सावित्रीमाई (बाई) फुलेंनी समाजाचे दगड- शेणगोटे झेलेले, समाजाने दिलेल्या अवहेलना, बहिष्कार स्वीकारून सावित्रीबाईंनी आणि ज्योतीराव फुलेंनी आपले कार्य अविरत सुरूच ठेवले. या दोघांच्या कार्यामुळेच मी आज या व्यासपीठावर उभी आहे. स्त्री शिक्षण आणि समाजाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतीराव फुलेंना भारतरत्न मिळावा यासाठी समाजाने एकत्र यावे आणि तशी मागणी करावी, असे प्रतिपादन आयएएस अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी शनिवारी ठाण्यात एका कार्यक्रमात केले.ठाण्यातील माळी समाज संस्थेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्त विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना दिल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुरस्कारांचे वितरण गडकरी रंगायतन येथे बानायत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. ठाणे महानगरपालिकेचे सभागृह नेते नरेश म्हस्के, माळी समाजाचे अध्यक्ष सचिन शिंदे, कार्याध्यक्ष सचिन केदारी, मुंबई विभाग कामगार उपायुक्त रविराज इवळे, माळी महासंघाचे डी. के. माळी, प्रकाश ढोकणे, काँग्रेस माजी अध्यक्ष अनिल साळवी, उद्योजिका जयश्री रामाणे, सैनी सेवा समाजच्या वनिता लोंढे हे मान्यवर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी उमा माळी, शैक्षणिक क्षेत्रातील कार्यासाठी निलम बनसोडे, सामाजिक क्षेत्रासाठी रूपाली चाकणकर, पत्रकार क्षेत्रातील कार्यासाठी अनुपमा गुंडे, व्यावसायिक क्षेत्रासाठी नीता कलोरे यांना ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले पुरस्कार देउन गौरवण्यात आले. सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी लेक वाचवा अभियान महाराष्ट्रात चालवणारे डॉ. गणेश राख यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. सावित्रीमाईंनी स्त्री शिक्षणाचे महान कार्य करूनही देशात त्यांच्या कार्याचा म्हणावा तसा प्रसार झाला नाही, अशी खंत बानायत यांनी व्यक्त केली. सावित्रीमाईंमुळेच आज आपण समाजाच्या विविध क्षेत्रात कार्यरत आहोत, याची जाणीव प्रत्येक महिलेने ठेवावी व सावित्रीमाईंचे कार्य पुढे न्यावे, असे आवाहन त्यांनी केले. माळी समाजाचे अध्यक्ष सचिन शिंदे यांनी ठाणे शहरात महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांचे स्मारक नाही. या दोघांच्या कार्याची आठवण समाजाला करून देण्यासाठी त्यांचे पुतळे उभारण्याची मागणी त्यांनी केली. ठाणे महापालिकेचे सभागृह नेते नरेश म्हस्के म्हणाले, महात्मा फुले यांच्या पुतळ्याबाबत महापालिकेच्या महासभेत चर्चा झाली असून, त्यासंबंधी पुढील कार्यवाही लवकरच होईल समाजाने यासाठी पाठपुरावा करावा असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सरचिटणीस नवनीत सिनलकर यांनी केले. 

टॅग्स :Savitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेthaneठाणे