शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ भाजपला द्या; कोअर कमिटीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 23:33 IST

गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढल्यावरही भाजपचा अवघ्या दोन हजार मतांनी पराभव झाला होता.

अंबरनाथ : अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ हा पूर्वी भाजपकडे होता. या मतदारसंघातून भाजपचे आमदार विधानसभेवर गेले होते. मात्र, नंतर युतीधर्मात हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे यावा, अशी आग्रही मागणी अंबरनाथमधील कार्यकर्ते करत आहेत. यासंदर्भात भाजप कोअर कमिटीच्या सदस्यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत हा मतदारसंघ भाजपकडे देण्याची मागणी केली आहे. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांकडे मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढल्यावरही भाजपचा अवघ्या दोन हजार मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे या मतदारसंघामध्ये भाजपचे मतदार वाढले असून चार वर्षांत भाजपची ताकदही वाढली आहे. या वाढलेल्या ताकदीचा विचार करून वरिष्ठांकडे हा मतदारसंघ मागण्यात येत असल्याचे कमिटी सदस्या पूर्णिमा कबरे यांनी स्पष्ट केले आहे.

अंबरनाथ मतदारसंघ १९७८ पासून भाजपचा (जनसंघ) बालेकिल्ला होता. त्याकाळी प्रा. राम कापसे, जगन्नाथ पाटील आदींनी अंबरनाथ मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. यानंतर, शिवसेना-भाजपतील अंतर्गत तडजोडीमुळे अंबरनाथ मतदारसंघ शिवसेनेला देण्यात आला. तेव्हापासून अंबरनाथ मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आणि खासदार प्रतिनिधित्व करत आहेत. मागील निवडणुकीत शिवसेना व भाजप यांच्यात युती न झाल्याने भाजपचे उमेदवार राजेश वानखेडे यांचा निसटता पराभव झाला. आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याविषयी कोणत्याही प्रकारची नाराजी नसल्याचे तारमळे यांनी सांगितले.

टॅग्स :BJPभाजपा