शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ भाजपला द्या; कोअर कमिटीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 23:33 IST

गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढल्यावरही भाजपचा अवघ्या दोन हजार मतांनी पराभव झाला होता.

अंबरनाथ : अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ हा पूर्वी भाजपकडे होता. या मतदारसंघातून भाजपचे आमदार विधानसभेवर गेले होते. मात्र, नंतर युतीधर्मात हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे यावा, अशी आग्रही मागणी अंबरनाथमधील कार्यकर्ते करत आहेत. यासंदर्भात भाजप कोअर कमिटीच्या सदस्यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत हा मतदारसंघ भाजपकडे देण्याची मागणी केली आहे. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांकडे मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढल्यावरही भाजपचा अवघ्या दोन हजार मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे या मतदारसंघामध्ये भाजपचे मतदार वाढले असून चार वर्षांत भाजपची ताकदही वाढली आहे. या वाढलेल्या ताकदीचा विचार करून वरिष्ठांकडे हा मतदारसंघ मागण्यात येत असल्याचे कमिटी सदस्या पूर्णिमा कबरे यांनी स्पष्ट केले आहे.

अंबरनाथ मतदारसंघ १९७८ पासून भाजपचा (जनसंघ) बालेकिल्ला होता. त्याकाळी प्रा. राम कापसे, जगन्नाथ पाटील आदींनी अंबरनाथ मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. यानंतर, शिवसेना-भाजपतील अंतर्गत तडजोडीमुळे अंबरनाथ मतदारसंघ शिवसेनेला देण्यात आला. तेव्हापासून अंबरनाथ मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आणि खासदार प्रतिनिधित्व करत आहेत. मागील निवडणुकीत शिवसेना व भाजप यांच्यात युती न झाल्याने भाजपचे उमेदवार राजेश वानखेडे यांचा निसटता पराभव झाला. आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याविषयी कोणत्याही प्रकारची नाराजी नसल्याचे तारमळे यांनी सांगितले.

टॅग्स :BJPभाजपा