शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

भांडणाच्या रागातूनच मुलीचे केले अपहरण; घातापाताचा हाेता उद्देश

By जितेंद्र कालेकर | Updated: June 26, 2025 21:05 IST

आरोपी रंजीत याची कबुली.

जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : बदलापूरमधील साडेचार वर्षाच्या मुलीचे अपहरण तिच्या कुटुंबाशी झालेल्या वादातूनच केल्याची कबुली आरोपी रंजीत धुर्वे (२६) याने दिली. पोलिसांनी २४ तासांत त्याच्या मुसक्या मध्य प्रदेशात आवळल्या, अशी माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पाेलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी गुरुवारी दिली. तिचा घातपात करण्याचाही इरादा हाेता, असेही त्याने पोलिसांना सांगितले.

साडेचार वर्षांच्या मुलीचे वाईट हेतूने रंजीतने अपहरण केल्याची तक्रार बदलापूर पश्चिम पाेलिस ठाण्यात २४ जून राेजी दाखल झाली हाेती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पाेलिस आयुक्त आशुताेष डुंबरे यांनी गुन्हे अन्वेषण विभागाकडे समांतर तपासासाठी हे प्रकरण साेपविले हाेते. उल्हासनगरचे पाेलिस उपायुक्त सचिन गाेरे आणि जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या तपासात रिक्षातून या मुलीला रेल्वे स्टेशनच्या दिशेने नेल्याचे सीसीटीव्हीद्वारे गेल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. त्याच आधारे पथकाने मध्य प्रदेशातून २५ जून राेजी सायंकाळी रंजीतला ताब्यात घेतले. आदल्या दिवशी या मुलीच्या कुटुंबीयांशी त्याचा वाद झाला हाेता. याच रागातून त्याने मुलीला चाॅकलेटचे अमिष दाखवून तिचे अपहरण केल्याची कबुली दिली. रंजीत हा बांधकाम साईटवर मजूर म्हणून काम करतो. त्याच भागात हे कुटुंबीय राहते.वर्षभरापूर्वी बदलापुरात झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर मुलीला सुखरुपपणे अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटका करणे आणि आराेपीला अटक करणे हे पाेलिसांसमाेर माेठे आव्हान हाेते. यातील आराेपीला अटक केली असून यात त्याचा आणखी काय उद्देश हाेता का? याचाही तपास करण्यात येत आहे.अमरसिंह जधव, पाेलिस उपायुक्त, गुन्हे अन्वेषण विभाग, ठाणे शहर

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी