शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

‘त्या’ गर्डरला लोखंडी फ्रेमचा आधार

By admin | Updated: January 14, 2017 06:27 IST

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरसावे पुलाच्या दुरुस्तीसाठी ब्रिटिश कंपनी रॅमबोलने सुचवल्यानुसार तडा गेलेल्या गर्डरला

धीरज परब / मीरा रोडमुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरसावे पुलाच्या दुरुस्तीसाठी ब्रिटिश कंपनी रॅमबोलने सुचवल्यानुसार तडा गेलेल्या गर्डरला उच्चप्रतीच्या लोखंडी फ्रेमचा (ट्रस आधार दिला जाणार आहे. त्यासाठी मेरीटाइम बोर्डाला कळवण्यात आले आहे. त्यांची परवानगी मिळताच आयआरबी काम सुरू करणार आहे. या कामासाठी सुमारे दीड महिना लागण्याची शक्यता असली तरी कामादरम्यान सध्या सुरू असलेली हलक्या वाहनांची वाहतूक बंद करावी लागणार नाही. परंतु, दुरुस्तीनंतर १५ टनांपेक्षा जास्त अवजड वाहनांची वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने बंदच ठेवावी लागणार असल्याने वाहतूककोंडीचा प्रश्न कायम राहणार आहे. जुन्या पुलाच्या गर्डरला मोठा तडा गेल्याचे निदर्शनास आल्याने गेल्यावर्षी सप्टेंबरपासून जुन्या पुलावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली. गर्डरला गेलेला तडा कशा पद्धतीने दुरुस्त करावा, यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व आयआरबीच्या तज्ज्ञांनी वेळोवेळी पाहणी केली. २०१३ मध्ये गर्डरला तडा गेला असता तो भाग पूर्णपणे बदलण्यात आला होता. पण, आता गेलेला तडा ज्या भागात आहे, तेथेगर्डर बदलणे अशक्य होते. प्राधिकरणाने या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. व्ही.के. रैना यांना पाचारण केले. मूळ बांधकामाच्या सुमारे ९८ नकाशांपैकी केवळ १० ते १२ नकाशेच सापडल्याने दुरुस्तीचा मार्ग खुंटला. अखेर, प्राधिकरणाने ब्रिटिश कंपनी रॅमबोलचे पॉल जॅक्सन यांना बोलावले. ३ आॅक्टोबरला जॅक्सन यांनी पुलाची पाहणी केल्यानंतर आपला अहवाल दिला. रॅमबोल कंपनीने सुचवल्यानुसार अतिउच्च दर्जाच्या लोखंडी फ्रेमचा (ट्रस) आधार तडा गेलेल्या गर्डरला देण्यात येणार आहे. त्यासाठी खाडीत उतरून काम करावे लागणार आहे. दोन्ही बाजंूच्या पिलरच्या आधारे ही फ्रेम उभारली जाणार आहे. आयआरबीच हे काम करणार आहे. या कामामुळे एका गाळ्याची उंची कमी होणार असल्याने मेरीटाइम बोर्डाची परवानगी लागणार आहे. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी बोर्डाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली तसेच पत्र दिले आहे. बोर्डाची मंजुरी मिळाल्यावर काम सुरू केले जाणार आहे. सध्या किरकोळ दुरुस्तीची कामे सुरू आहेत, असे प्राधिकरणाचे व्यवस्थापक दिनेश अग्रवाल यांनी सांगितले. दुरुस्तीचे काम झाल्यानंतरही अवजड वाहनांची वाहतूक बंदच ठेवावी लागणार आहे. वेगमर्यादेचे काटेकोर पालन करत २० किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने वाहने चालवता येणार नाही.