शहरं
Join us  
Trending Stories
1
२०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
2
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
3
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
4
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
5
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
6
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
7
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
8
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
9
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
10
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
11
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
12
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
13
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
14
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
15
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
16
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
17
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
18
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
19
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
20
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ गर्डरला लोखंडी फ्रेमचा आधार

By admin | Updated: January 14, 2017 06:27 IST

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरसावे पुलाच्या दुरुस्तीसाठी ब्रिटिश कंपनी रॅमबोलने सुचवल्यानुसार तडा गेलेल्या गर्डरला

धीरज परब / मीरा रोडमुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरसावे पुलाच्या दुरुस्तीसाठी ब्रिटिश कंपनी रॅमबोलने सुचवल्यानुसार तडा गेलेल्या गर्डरला उच्चप्रतीच्या लोखंडी फ्रेमचा (ट्रस आधार दिला जाणार आहे. त्यासाठी मेरीटाइम बोर्डाला कळवण्यात आले आहे. त्यांची परवानगी मिळताच आयआरबी काम सुरू करणार आहे. या कामासाठी सुमारे दीड महिना लागण्याची शक्यता असली तरी कामादरम्यान सध्या सुरू असलेली हलक्या वाहनांची वाहतूक बंद करावी लागणार नाही. परंतु, दुरुस्तीनंतर १५ टनांपेक्षा जास्त अवजड वाहनांची वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने बंदच ठेवावी लागणार असल्याने वाहतूककोंडीचा प्रश्न कायम राहणार आहे. जुन्या पुलाच्या गर्डरला मोठा तडा गेल्याचे निदर्शनास आल्याने गेल्यावर्षी सप्टेंबरपासून जुन्या पुलावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली. गर्डरला गेलेला तडा कशा पद्धतीने दुरुस्त करावा, यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व आयआरबीच्या तज्ज्ञांनी वेळोवेळी पाहणी केली. २०१३ मध्ये गर्डरला तडा गेला असता तो भाग पूर्णपणे बदलण्यात आला होता. पण, आता गेलेला तडा ज्या भागात आहे, तेथेगर्डर बदलणे अशक्य होते. प्राधिकरणाने या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. व्ही.के. रैना यांना पाचारण केले. मूळ बांधकामाच्या सुमारे ९८ नकाशांपैकी केवळ १० ते १२ नकाशेच सापडल्याने दुरुस्तीचा मार्ग खुंटला. अखेर, प्राधिकरणाने ब्रिटिश कंपनी रॅमबोलचे पॉल जॅक्सन यांना बोलावले. ३ आॅक्टोबरला जॅक्सन यांनी पुलाची पाहणी केल्यानंतर आपला अहवाल दिला. रॅमबोल कंपनीने सुचवल्यानुसार अतिउच्च दर्जाच्या लोखंडी फ्रेमचा (ट्रस) आधार तडा गेलेल्या गर्डरला देण्यात येणार आहे. त्यासाठी खाडीत उतरून काम करावे लागणार आहे. दोन्ही बाजंूच्या पिलरच्या आधारे ही फ्रेम उभारली जाणार आहे. आयआरबीच हे काम करणार आहे. या कामामुळे एका गाळ्याची उंची कमी होणार असल्याने मेरीटाइम बोर्डाची परवानगी लागणार आहे. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी बोर्डाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली तसेच पत्र दिले आहे. बोर्डाची मंजुरी मिळाल्यावर काम सुरू केले जाणार आहे. सध्या किरकोळ दुरुस्तीची कामे सुरू आहेत, असे प्राधिकरणाचे व्यवस्थापक दिनेश अग्रवाल यांनी सांगितले. दुरुस्तीचे काम झाल्यानंतरही अवजड वाहनांची वाहतूक बंदच ठेवावी लागणार आहे. वेगमर्यादेचे काटेकोर पालन करत २० किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने वाहने चालवता येणार नाही.