शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

‘त्या’ गर्डरला लोखंडी फ्रेमचा आधार

By admin | Updated: January 14, 2017 06:27 IST

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरसावे पुलाच्या दुरुस्तीसाठी ब्रिटिश कंपनी रॅमबोलने सुचवल्यानुसार तडा गेलेल्या गर्डरला

धीरज परब / मीरा रोडमुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरसावे पुलाच्या दुरुस्तीसाठी ब्रिटिश कंपनी रॅमबोलने सुचवल्यानुसार तडा गेलेल्या गर्डरला उच्चप्रतीच्या लोखंडी फ्रेमचा (ट्रस आधार दिला जाणार आहे. त्यासाठी मेरीटाइम बोर्डाला कळवण्यात आले आहे. त्यांची परवानगी मिळताच आयआरबी काम सुरू करणार आहे. या कामासाठी सुमारे दीड महिना लागण्याची शक्यता असली तरी कामादरम्यान सध्या सुरू असलेली हलक्या वाहनांची वाहतूक बंद करावी लागणार नाही. परंतु, दुरुस्तीनंतर १५ टनांपेक्षा जास्त अवजड वाहनांची वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने बंदच ठेवावी लागणार असल्याने वाहतूककोंडीचा प्रश्न कायम राहणार आहे. जुन्या पुलाच्या गर्डरला मोठा तडा गेल्याचे निदर्शनास आल्याने गेल्यावर्षी सप्टेंबरपासून जुन्या पुलावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली. गर्डरला गेलेला तडा कशा पद्धतीने दुरुस्त करावा, यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व आयआरबीच्या तज्ज्ञांनी वेळोवेळी पाहणी केली. २०१३ मध्ये गर्डरला तडा गेला असता तो भाग पूर्णपणे बदलण्यात आला होता. पण, आता गेलेला तडा ज्या भागात आहे, तेथेगर्डर बदलणे अशक्य होते. प्राधिकरणाने या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. व्ही.के. रैना यांना पाचारण केले. मूळ बांधकामाच्या सुमारे ९८ नकाशांपैकी केवळ १० ते १२ नकाशेच सापडल्याने दुरुस्तीचा मार्ग खुंटला. अखेर, प्राधिकरणाने ब्रिटिश कंपनी रॅमबोलचे पॉल जॅक्सन यांना बोलावले. ३ आॅक्टोबरला जॅक्सन यांनी पुलाची पाहणी केल्यानंतर आपला अहवाल दिला. रॅमबोल कंपनीने सुचवल्यानुसार अतिउच्च दर्जाच्या लोखंडी फ्रेमचा (ट्रस) आधार तडा गेलेल्या गर्डरला देण्यात येणार आहे. त्यासाठी खाडीत उतरून काम करावे लागणार आहे. दोन्ही बाजंूच्या पिलरच्या आधारे ही फ्रेम उभारली जाणार आहे. आयआरबीच हे काम करणार आहे. या कामामुळे एका गाळ्याची उंची कमी होणार असल्याने मेरीटाइम बोर्डाची परवानगी लागणार आहे. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी बोर्डाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली तसेच पत्र दिले आहे. बोर्डाची मंजुरी मिळाल्यावर काम सुरू केले जाणार आहे. सध्या किरकोळ दुरुस्तीची कामे सुरू आहेत, असे प्राधिकरणाचे व्यवस्थापक दिनेश अग्रवाल यांनी सांगितले. दुरुस्तीचे काम झाल्यानंतरही अवजड वाहनांची वाहतूक बंदच ठेवावी लागणार आहे. वेगमर्यादेचे काटेकोर पालन करत २० किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने वाहने चालवता येणार नाही.