शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

घोडबंदर ते गेट वे आॅफ इंडिया एक तासात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 02:46 IST

जलवाहतूक दुसरा टप्पा : रस्ते वाहतुकीवरील भार २० टक्क्यांनी होणार कमी

ठाणे : जलवाहतुकीचे दोन्ही टप्पे पूर्ण केल्यावर घोडबंदर येथून मुंबईतील गेट वे आॅफ इंडिया येथे केवळ एक तासात पोहचणे शक्य होणार आहे.जलवाहतुकीच्या ठाणे-कल्याण-वसई या फेज-१ ला केंद्राची तसेच राज्याची तत्त्वत: मान्यता मिळाल्यानंतर आता फेज-२ चा डीपीआर तयार करण्याचे काम ठाणे महापालिकेने सुरू केले आहे. ठाणे ते गेट वे आॅफ इंडिया आणि ठाणे ते पनवेल तसेच जेएनपीटीला जोडणारा हा फेज-२ चा जलमार्ग आहे. याचा शक्याशक्यता अहवाल तयार केला असून तो २४ एप्रिल रोजी सादर केल्यानंतर डीपीआर तयार करण्याची अनुमती राज्य शासनाकडून ठाणे महापालिकेला मिळाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील जलवाहतुकीमुळे रस्त्यांवरील वाहतुकीचा भार २० टक्क्यांनी हलका होणार असून, घोडबंदरहून मुंबईला जाण्यासाठी सध्या दोन तास लागतात, तोच प्रवास एक तासात पूर्ण होणार असल्याचा दावा ठामपाने केला.ठाणे महापालिकेच्या अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार दुसºया टप्प्यातील वाहतुकीमध्ये साकेत खाडीकडून ही जलवाहतूक सुरू होणार असून त्यानंतर गेट वे आॅफ इंडिया व्हाया ट्रॉम्बे, एलिफंटा, फेरी वार्फत्याचप्रमाणे ठाणे ते नवी मुंबई (पनवेल, जेएनपीटी) असा जलमार्ग असणार आहे. या प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल तयार केल्यानंतर तो केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला जाईल. त्यानंतर केंद्र तसेच राज्य शासन डीपीआर तयार करण्याची परवानगी ठाणे महापालिकेला देईल. डीपीआर तयार करण्यासाठी एजन्सीची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती अधिकाºयांनी दिली. येत्या तीन महिन्यांत डीपीआर तयार करण्यात येईल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्यासाठी गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये निविदा काढण्यात आली होती. त्यानंतर, जानेवारी २०१८ रोजी या प्रकल्पासाठी तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती केली. आता २४ एप्रिल रोजी हा अहवाल सादर केल्यानंतर अखेर फेज-२ चा डीपीआर तयार करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाची मान्यता मिळाली असून लवकरच या कामालादेखील सुरु वात होण्याची चिन्हे आहेत.जलवाहतूक हा रस्ते वाहतुकीला सक्षम पर्याय ठरल्यास सध्या ठाणे व मुंबईत होणारी वाहतूककोंडी बºयाच अंशी कमी होईल.असा आहे फेज-२ चा मार्गठाणे ते मुंबईचा जलमार्ग ठाणे (साकेत) पासून जलवाहतुकीला सुरु वात होणार असून त्यानंतर कळवा-विटावा-मीठबंदर-ऐरोली-वाशी-ट्रॉम्बे-एलिफंटा-फेरी वार्फ-गेट वे आॅफ इंडिया.ठाणे-नवी मुंबईचा मार्गदेखील साकेतपासून सुरू होणार आहे. त्यानंतर वाशी-नेरूळ-बेलापूर-तळोजा-तर एक मार्ग बेलापूर हा पनवेलला जोडण्यात येणार असून व्हाया जुईनगरला जाणार आहे. तर, अजून एक मार्ग जेएनपीटी आणि उरणमार्गे नेरूळला जाणार आहे.

टॅग्स :Travelप्रवास