शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

अर्थसंकल्पावरील महासभा एकाच दिवसात गुंडाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 01:20 IST

७० टक्के निधी खर्च : चर्चेस सदस्यांचा विरोध

ठाणे : आधीच आयुक्तांनी सादर केलेल्या मूळ अंदाजपत्रकानुसारच शहरात कामे सुरू असल्याने त्यानुसार तब्बल ७० टक्क्यांहून अधिकचे बजेट खर्च झाले आहे. त्यामुळे अर्थसंकल्पावरील महासभेत बोलायचे तरी काय, असा पेच नगरसेवकांना पडला होता. शिवाय, मोठमोठे प्रकल्प राबवण्याऐवजी मूलभूत सोयीसुविधांकडेही लक्ष द्यावे, अशा काही सूचना करून महापालिकेच्या इतिहासात एकाच दिवसात अर्थसंकल्पावरील महासभा गुंडाळण्यात आली.

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी २० फेब्रुवारी रोजी ३८६१.८८ कोटींचा मूळ अर्थसंकल्प सादर केला होता. परंतु, स्थायी समितीचे गणित विस्कटल्याने त्यावर चर्चाच अद्यापपर्यंत झालेली नाही. अर्थसंकल्प मंजूर होत नसल्याने नगरसेवक निधी, प्रभाग सुधारणा निधी तसेच इतर कामांवर गदा येत होती. अखेर, स्थायी समिती गठीत नसल्याने अर्थसंकल्पावरील चर्चा पुन्हा एकदा थेट महासभेत घेण्याचे निश्चित झाले. त्यानुसार, येत्या ३० आणि ३१ जुलै रोजी या अर्थसंकल्पावर चर्चा ठेवली होती. परंतु, प्रत्यक्षात फेब्रुवारीमध्ये मूळ अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आतापर्यंत आयुक्तांच्या बजेटनुसारच शहरात कामे सुरू होती. त्यानुसार, लोकशाही आघाडीचे गटनेते हणमंत जगदाळे यांनी आतापर्यंत किती बजेट खर्च झाले, याची विचारणा केल्यावर तब्बल ७० टक्के बजेट खर्च झाल्याची धक्कादायक माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे अर्थसंकल्पावर चर्चाच कशाला करायची, असा सवाल करून त्यांनी यावर चर्चा करणे टाळले. नगरसेवकांची कामे करण्यासाठी निधीच शिल्लक नसेल, तर चर्चा कशाला करायची, असा सवाल त्यांनी केला आहे. दुसरीकडे ३० जुलै रोजी महासभेत चर्चा सुरू झाली आणि हाच सूर बहुतेक नगरसेवकांनी लावला. त्यातही महापालिकेच्या माध्यमातून ज्या काही मोठ्या प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे, त्यालाही अनेक नगरसेवकांनी यावेळी अप्रत्यक्षरीत्या विरोध केला. मोठे प्रकल्प राबवण्यापेक्षा शाळांची अवस्था सुधारण्याच्या सूचना अनेकांनी केल्या. झोपडपट्टी भागातील गटारे, पायवाटा आदींसह मूलभूत सोयीसुविधांना महत्त्व देण्याची मागणी यावेळी सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी केली. याशिवाय, शहरात महात्मा फुले यांचे स्मारक व्हावे, अशी सूचनाही त्यांनी मांडली. तर, नगरसेवक निधी आणि प्रभाग सुधारणा निधी मिळावा, या उद्देशानेच काही नगरसेवक या महासभेत हजर असल्याचे दिसून आले. निधीच नसल्यानेच अनेक नगरसेवकांनी सूचना देणेही टाळले. तर, काहींनी सूचनांसह अर्थसंकल्प मंजूर केला. परंतु, या सूचना कोणत्या ते मात्र समजू शकलेले नाही.भुवया उंचावल्यायापूर्वी अर्थसंकल्पावरील महासभा या दोन ते चारचार दिवस चालायच्या. कधीकधी तर पहाटेपर्यंत महासभा सुरू राहत होत्या. यंदा मात्र अवघ्या एका दिवसात महासभा गुंडाळण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३१ जुलै रोजी गटारी असल्यानेच ही महासभा एका दिवसात गुंडाळल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली आहे. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका