शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

सर्वेक्षणात गौडबंगाल?

By admin | Updated: June 25, 2016 01:34 IST

बडोदा ते जेएनपीटीपर्यंत जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी शेतकऱ्यांच्या जागा ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे.

बदलापूर : बडोदा ते जेएनपीटीपर्यंत जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी शेतकऱ्यांच्या जागा ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी जागेचे सर्वेक्षणही केले जात आहे. मात्र अंबरनाथ तालुक्यातील ज्या भागातून हा रस्ता अधिक प्रमाणात जाणार आहे, त्या भागातील तीन गावांमधील कोणत्या शेतातून हा रस्ता जाणार आहे हे निश्चित केलेली नाही. नव्या सर्वेक्षणात या तीन गावातील सातबारा दाखविण्यात येत नसल्याने हा रस्ता बिल्डरांसाठी फिरविला जातोय की काय अशी शंका उपस्थित होत आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे तक्रारीही केल्या आहेत. बदलापूरमधून जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू झाले होते. मात्र शेतकऱ्यांनी विश्वासघात होत असल्याचा आरोप करत सर्वेक्षणाला विरोध केला. तसेच हा रस्ता जाहीर करताना बाजारभावाने मोबदला द्यावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. त्यातच आता बदलापूरमधील सापे, जुवेली आणि दहीवली या तीन गावातून जाणाऱ्या चार किलोमीटर रस्त्याच्या जमीन संपादनाच्या नोटीसा आलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रामाचे वातवरण असल्याचे बाळाराम जाधव यांनी सांगितले. नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटीने या रस्त्यात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या सातबारावर इतर अधिकारात नाव टाकून जमिनी संपादीत करण्याची प्रक्र ीया सुरू केली आहे. मात्र सापे, जुवेली आणि दहीवली या तीन गावाच्या २०११ मध्ये जाहीर केलेल्या यादीतील महसूली गावांना नोटीसा आलेल्या नाहीत. त्यातच ज्या भागातील शेतकऱ्यांना नोटीस आली नाही त्याच भागात एका बड्या बांधकाम व्यवसायिकाने निवासी संकुलाचे कामही सुरु केले आहे. याच जागेतून हा रस्ता जात असतानाही बिल्डर कोणतीही तमा न बाळगता हे काम करत असल्याने या भागातून जाणारा रस्ता वळविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. ज्या जागा संपादीत करायच्या आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना नोटीस आलेल्या आहेत. मात्र ज्या ठिकाणी बांधकाम सुरु आहे त्याच भागापासून पुढे शेतकऱ्यांना नोटीस न आल्याने रस्त्याच्या कामात फसवणूक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या तीन गावातील रस्त्याच्या भूसंपादनासाठी नेमकी कोणती जागा जाणार हे जाहीर न करण्यामागे कारण काय असा प्रश्न येथील शेतकरी विचारत आहेत. एवढ्या मोठ्या रस्त्याच्या कामासाठी सर्वेक्षण होत असताना सर्व शेतकऱ्यांना कोणती जागा जाणार आहे याची माहिती दिलेली आहे. मात्र अवघ्या चार किलोमीटरच्या या तीन गावातील शेतकऱ्यांना कोणती जागा जाणार हे अद्यापही माहित नाही. २०११ मध्ये जागा निश्चित झालेली आहे. मात्र आता नव्याने सर्वेक्षण करताना ही गावे का वगळली याचे उत्तर अधिकाऱ्यांकडे नाही. बड्या बिल्डरांनी जागा विकत घेतल्याने त्यांच्या जागेतून रस्ता जाऊ नये यासाठी ही सर्व सोय अधिकाऱ्यांकडून होत असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. जोपर्यंत रस्त्याचा मार्ग निश्चित होत नाही तोपर्यंत सर्वेक्षण करु नका असा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे. ज्या ठिकाणाहून रस्ता जात आहे तो वळविण्याचा प्रयत्न झाल्यास चामटोली ग्रामस्थांना उद्धस्त करणारा ठरणार आहे. (प्रतिनिधी) मुंबई-बडोदा महामार्गाचे सर्वेक्षण रोखलेबदलापूर : मुंबई - बडोदा महामार्गाला बदलापूरमधील शेतकऱ्यांनी आता तीव्र विरोध करण्यास सुरूवात केली आहे. मोजणीसाठी पोलीस बंदोबस्तात आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या तीव्र्र विरोधामुळे सर्वेक्षण न करता परतावे लागले. शेतकऱ्यांना योग्य मोबदला जाहीर होत नाही तोपर्यंत सर्वेक्षणही करू देणार नाही अशी भूमिका संघर्ष समितीने घेतल्याचे शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाळाराम कांबरी यांनी सांगितले. या महामार्गात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावली होती. मात्र ऐनवेळी बैठक रद्द झाल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत जिल्हाधिकारी गंभीर नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली. त्यामुळे शुक्रवारी अंबरनाथ तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सर्वेक्षणाचे काम थांबविले. जोपर्यंत शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाही तो पर्र्यंत कोणत्याही प्रकारे काम होऊ देणार नाही असा पवित्रा येथील शेतकऱ्यांनी घेतला आह.े या आंदोलनात बदलापूर आणि परिसरातील २०० शेतकरी सहभागी झाले होते. तसेच शिवसेनेचे नगरसेवक शैलेश वडनेरे, माजी नगरसेवक मंगेश धुळे, युवा सेनेचे उपशहर प्रमुख सुधीर भोसले यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थ व महिलाही सहभागी झाल्या होत्या. (प्रतिनिधी)