शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

मीरा-भाईंदर महापालिकेचा कचऱ्याचा डोंगर पेटला

By धीरज परब | Updated: February 18, 2023 23:08 IST

मीरा भाईंदर महापालिकेच्या उत्तन येथील डम्पिंगमध्ये साठलेल्या कचऱ्याच्या डोंगरास शनिवारी रात्री भीषण आग लागली.

मीरा भाईंदर महापालिकेच्या उत्तन येथील डम्पिंगमध्ये साठलेल्या कचऱ्याच्या डोंगरास शनिवारी रात्री भीषण आग लागली. महापालिकेने उत्तनच्या धावगी येथे प्रक्रिया न करताच अनेक वर्ष टाकलेल्या कचऱ्याचे तेथे डोंगर निर्माण झाले आहेत. सदर डोंगरास सातत्याने आगी लागण्याच्या घटना घडत आहेत. शनिवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास कचऱ्याच्या डोंगरास भीषण आग लागली. 

रात्रीच्या वेळी लागलेल्या ह्या भीषण आगीमुळे डोंगर पेटल्याच्या ज्वाळा थरकाप उडवणाऱ्या होत्या. अगदी भाईंदरवरून देखील आगीच्या ज्वाळा दिसत होत्या. त्यातच वाऱ्याने आग आणखी भडकली. शिवाय कचऱ्याच्या डोंगरातील पेटते प्लास्टिक आजूबाजूला उडू लागल्याने काही झुडपात देखील आग लागली. 

आग इतकी भीषण आहे की आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट उसळले आहेत. मीरा भाईंदर महापालिकेच्या विविध अग्निशमन केंद्रातील जवान अग्निशामक यंत्र व टॅंकरच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते.  परंतु आग आटोक्यात येत नसल्याचे व इतकी भीषण आग पहिल्यांदाच लागलेली असून ती विझवण्यास दिवस जातील असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

कचऱ्याच्या घातक धुराचे साम्राज्य आजूबाजूच्या नागरी वस्तीमध्ये पसरल्याने अनेकांना श्वास घेण्यास देखील त्रास जाणवत होता. कचऱ्याच्या डोंगरावर शास्त्रोक्त प्रक्रिया वेळीच पालिकेने केली नसल्याने ह्याठिकाणी सातत्याने आगी लागत आहेत. तर कचरा नष्ट करण्यासाठी आगी लावल्या जात असल्याचा आरोप लोक करत आहेत.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरfireआग