शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

वर्गीकरण केले नाही तर कचराकोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 01:18 IST

ठाणे महानगरपालिकेचा निर्णय; सोसायट्यांना दिली एक महिन्याची मुदत

ठाणे  : ओला आणि सुका कचरा वेगळा करून देण्यासाठी ठाणे  महापालिकेने शहरातील विविध सोसायट्यांना पुन्हा नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. यासाठी एक महिन्याची मुदतही दिली आहे. तर सोसायट्यांकडून कचरा वर्गीकृत करून दिला जात असला तरी महापालिकेकडून तो एकत्रित गोळा करून तसाच डम्पिंगवर टाकला जात आहे. त्यामुळे महापालिकेने आधी स्वत:ची यंत्रणा सुधारावी, मगच ठाणेकरांना शिस्त लावावी, असा सूर आता उमटू लागला आहे.महापालिका हद्दीत रोज ९६३ मेट्रिक टन कचरा निर्माण होत असून तो दिवा  डम्पिंगवर टाकला जात आहे. परंतु, स्वच्छ सर्वेक्षण मिशनअंतर्गत कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावावी, ओला आणि सुका कचरा वेगळा करावा, कचऱ्याची योग्य वाहतूक करणे, त्यावर प्रक्रिया करावी हे महत्त्वाचे मानले गेले आहे. त्यानुसार महापालिकेचा २०२० मध्ये स्वच्छ सर्वेक्षणात वरचा क्रमांक आला होता. परंतु, महापालिकेला अद्यापही वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे यासाठी पुन्हा पालिकेने शहरातील सोसायट्यांना आपले लक्ष्य केले आहे. सोसायट्यांनीच ओला आणि सुका कचरा वेगळा करून द्यावा असे फर्मान काढले आहे. विशेष म्हणजे यापूर्वीदेखील साेसायट्यांनी त्यांच्याच ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावावी यासाठी तीन वेळा नोटीस बजावल्या होत्या. परंतु, त्यानंतरही फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. पालिकेने सोसायट्यांना पुन्हा नोटीस बजावून एक महिन्याची मुदत दिली आहे. या मुदतीत त्यांनी ओला-सुका कचरा वेगळा करून दिला नाही, तर कचराकोंडी केली जाईल, असा इशाराही दिला आहे. सोसायटींवर एकीकडे दबाव टाकत असताना पालिका मात्र वर्गीकृत केलेला कचरा हा आजही एकत्रितपणे उचलत आहे. अनेक घंटागाड्यांना दोन कप्पे असले तरी आतील कप्पा हा एकच असल्याचे दिसत आहे. कचरा वेगळा उचलला जात असला तरी तो सीपी तलाव येथे एकत्रित डम्प केला जात असून तो तेथून डम्पिंगवर नेऊन टाकला जात आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न