शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतील गणेशोत्सव मंडळांचे झाले हाल , विसर्जनावरही सावट, सोसायट्यांमध्ये शिरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 01:07 IST

डोंबिवली शहर आणि २७ गावांमध्ये सोमवार रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाची मंगळवारीही संततधार कायम होती. दुुपारी ४ नंतर सोसाट्याचा वारा आणि पाऊस, यामुळे जीवन विस्कळीत झाले.

डोंबिवली : डोंबिवली शहर आणि २७ गावांमध्ये सोमवार रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाची मंगळवारीही संततधार कायम होती. दुुपारी ४ नंतर सोसाट्याचा वारा आणि पाऊस, यामुळे जीवन विस्कळीत झाले. आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्यासाठी अग्निशमन दल सज्ज असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली. दुपारपर्यंत एका ठिकाणी झाड पडल्याची घटना घडली होती.पावसामुळे बहुतांश सार्वजनिक गणेश मंडळांची मात्र प्रचंड गैरसोय झाली. मंडपामधील पाणी गळती रोखताना गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची तारेवरची कसरत झाली. पाच दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन आणि सकाळी आसनगावनजीक दुरोंतो एक्स्प्रेसला झालेल्या अपघातामुळे मंगळवारी अनेकांनी घरीच राहणे पसंत केले होते. काहींनी दुपारच्या वेळात पावसाचा जोर कमी झाल्याचा पाहून विसर्जन केले. मात्र, विसर्जन करण्यासाठी खाडीकिनारी व कृत्रिम तलावांच्या ठिकाणी तुलनेने कमी गर्दी आढळून आली.बुधवारी असलेल्या गौरीपूजनामुळे मंगळवारी सकाळी बाजारात भाजी व मिठाई खरेदीसाठी भाविकांची गर्दी झाली होती. सणासुदीचे दिवस असतानाही प्रचंड पावसामुळे ठिकठिकाणच्या रिक्षा स्टॅण्डवर एरव्हीच्या तुलनेने कमी रिक्षा आढळून आल्या. गणेश विसर्जनासाठी काहींनी रिक्षा व अन्य वाहने आधीपासूनच बुक करून ठेवल्याने गणेशभक्तांची गैरसोय टळली. सायंकाळी पावसामुळे मात्र पूरसदृश स्थिती निर्माण झाली. बहुतांशी सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. अनेक ठिकाणी तुंबलेल्या गटारांमधील पाणी शिरल्याने रहिवाशांचे प्रचंड हाल झाले.डोंबिवली रेल्वेस्थानक परिसरात डॉ. राथ रोड, पाटकर रोड, एमआयडीसीत एमआयडीसी विभागीय कार्यालय, महावितरण कार्यालय परिसरात, कोपर रोड, कोपर गाव आदी भागातील रस्त्यांवर प्रचंड पाणी जमा झाले होते. त्यामुळे तेथून वाट काढताना वाहनचालकाना त्रास झाला. खड्डे पाण्यांनी भरल्याने वाहने आदळण्याच्या घटना घडल्या. पश्चिमेला कुंभारखण पाडा येथे पावसाचे पाणी जमा झाल्याने नागरिकांचे हाल झाले.भिवंडीत पाणी तुंबलेभिवंडी : भिवंडीत मंगळवारी दुपारपासून पावसाचा जोर वाढल्याने शहर आणि ग्रामीण भागात पावसाचे पाणी साचले. खड्यांमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. सकाळपासून सुरू असलेल्या पावसाने दुपारनंतर जोर पकडला. पाण्याच्या प्रवाहाचा निचरा न झाल्याने शहरातील ठाणे रोड मार्गावरील गौरीपाडा, वासंतीबाग ते पायल टॉकीज,कणेरी भागातील महेश डार्इंग, कल्याणरोड, नारपोली, तीनबत्ती,अजयनगर, शिवाजीनगर, वाजा मोहल्ला या भागात पाणी साचले होते. ग्रामीण भागातील रहानाळ, हॉलीमेरी शाळा, कल्याणरोडवरील रांजनोली नाका या ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे रिक्षाचालकांनी लूट केली.अंबरनाथ - बदलापूरच्या गणेशोत्सवात पावसाचे विघ्नअंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर शहरात गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत असल्याने गणेश दर्शनात मोठ्या प्रमाणात विघ्न येत आहेत. भर पावसात दर्शन घेण्याची वेळ भाविकांवर आली आहे. घरगुती गणेशाचे दर्शन घेण्यासाठीदेखील नातेवाईकांची ओढाताण होतांना दिसत आहे. अंबरनाथमध्ये सार्वजनिक गणेशोत्साचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची दरवर्षी गर्दी होत असते. मात्र, सलग ५व्या दिवशीदेखील पावसाने जोरदार हजेरी लावल्याने भाविकांनी पावसात बाहेर न पडण्याचा निर्णय घेतला. तर काहींनी भर पावसात गणेश दर्शन घेतले. मात्र, पावसामुळे सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देणाºया भाविकांचा ओघ हा दरवर्षीपेक्षा कमी झाला आहे. अनेक मंडळांच्या ठिकाणी भाविक दिसेनासे झाले आहेत. तर ज्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी भाविकांची दरवर्षी गर्दी होत होती त्या ठिकाणीदेखील यंदा गर्दींचा अभाव दिसत आहे. अंबरनाथ सोबत बदलापुरातदेखील सार्वजनिक गणेश मंडळांकडे भाविकांचा वेग मंदावला आहे. सर्वजनिक गणेशोत्सवासोबत घरगुती गणेश दर्शन घेण्यासाठी येणाºया नातेवार्इंकांनादेखील पावसाचा त्रास सहन करावा लागत आहे. पाऊस विश्रांती घेत नसल्याने घरगुती गणेशाच्या दर्शनासाठी जाणेदेखील अवघड जात आहे. पावसाने क्षणभर विश्रांती घेतल्यावर गणेश दर्शनासाठी भाविक बाहेर पडत आहेत.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव