शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

विवेकानंदांप्रमाणे भारत भ्रमंती, गंधार कुलकर्णी यांचे डोंबिवलीत भव्य स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 02:04 IST

देशातील २३ राज्यांमधून सायकलने हजारो किलोमीटरचा प्रवास करून कुलकर्णी बुधवारी सायंकाळी डोंबिवलीत परतले.

डोंबिवली - स्वामी विवेकानंद यांनी जसे भारत भ्रमण केले होते तसेच गंधार कुलकर्णी यांनीही सायकलने भारत भ्रमण करून युवकांमध्ये मातृभाषेची आवड निर्माण व्हावी, यासाठी जागृती केली, हे खूप प्रशंसनीय आहे, असे मत निसर्गमित्र धनंजय मदान यांनी व्यक्त केले.देशातील २३ राज्यांमधून सायकलने हजारो किलोमीटरचा प्रवास करून कुलकर्णी बुधवारी सायंकाळी डोंबिवलीत परतले. यावेळी डोंबिवली सायकल क्लब, पै फ्रेण्ड्स लायब्ररी व अन्य संस्थांतर्फे क्रीडासंकुल येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी मदान बोलत होते. या सोहळ््याप्रसंगी डोंबिवली सायकल क्लबचे संस्थापक डॉ. सुनील पुणतांबेकर, पुंडलिक पै तसेच क्लबचे सदस्य व गंधार यांचे कुटुंबीय आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.गंधार हे सायंकाळी ६ नंतर डोंबिवली शहरात आले. ठाकुर्लीतील ९० फूट रस्त्यावर आल्यानंतर अनेकांनी सायकल यात्रा काढत त्यांना क्रीडासंकुलाच्या आवारात आणले. तेथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. तेथील कार्यक्रम झाल्यानंतर कुलकर्णी हे कुटुंबीयांसह श्री गणेश मंदिरात आले. तेथे सर्वांनी आरती केली.गंधार यांनी मातृभाषेच्या प्रसारासाठी सायकलवरून केलेला हजारो किलोमीटरचा प्रवास वाखाणण्याजोगा आहे. युवी पिढीने त्यांच्याकडून आदर्श घ्यावा, असे आवाहन डोंबिवली सायकल क्लबतर्फे करण्यात आले.दरम्यान, डोंबिवली सायकल क्लबचे काही सदस्य मंगळवारी घोटी येथे त्यांच्या स्वागतासाठी गेले होते. 

टॅग्स :dombivaliडोंबिवली