शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज्यातील 'बिनविरोध' निवडीला स्थगिती मिळणार?; उद्या हायकोर्टात तातडीची सुनावणी
2
अंबरनाथमध्ये महायुतीत तुफान राडा; नगरपालिकेबाहेर भाजप-शिंदेसेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडले!
3
“राज ठाकरे जे बोलले, त्यासाठी हिंमत लागते, गौतम अदानी...”; संजय राऊतांची भाजपावर टीका
4
ZP Election 2026: मोठी बातमी! १२ जिल्हा परिषद, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची आज घोषणा होणार? थोड्याच वेळात आयोगाची पत्रकार परिषद 
5
चिप्सच्या पाकिटाचा भीषण स्फोट; ८ वर्षांच्या मुलाने गमावला डोळा, घरात नेमकं काय घडलं?
6
Virat Kohli च्या RCB साठी आली महत्त्वाची बातमी ! IPL 2026 आधी मोठा बदल, चाहते होणार नाराज?
7
धक्कादायक! प्रेयसीने 'बाय-बाय डिकू' म्हटलं अन् तरुणाने आयुष्य संपवलं; कपाटात लपलेलं होतं मृत्यूचं रहस्य
8
फक्त 5.59 लाख रुपयांत TATA PUNCH Facelift २०२६ लॉन्च; आजपासून बुकिंग सुरू, जबरदस्त आहे लूक
9
Gold-Silver च्या दरानं तोडले सर्व विक्रम; १३ दिवसांत ₹३२,३२७ नं वाढली चांदी, सोन्याच्या दरात ₹७२८७ ची तेजी
10
'ओ रोमिओ'चा टीझर पाहून फरिदा जलाल यांच्याच डायलॉगची चर्चा; म्हणाल्या, "मी शिवी दिली कारण..."
11
“बाळासाहेबांचे स्वप्न साकार करूया”; मनसेच्या निष्ठावंताची पत्रातून मतदारांना भावनिक साद
12
भयंकर! खेळताना कपडे खराब झाले म्हणून ६ वर्षांच्या लेकीला सावत्र आईने बदडलं; चिमुरडीचा जागीच मृत्यू
13
Mumbai Local: लोकलच्या गर्दीने घेतला आणखी एक बळी; नाहूर स्थानकाजवळ धावत्या ट्रेनमधून पडून तरुणाचा मृत्यू
14
Nashik Municipal Election 2026 : अयोध्येच्या धर्तीवर तपोवनात भव्य श्रीराम मंदिर साकारणार; कुंभमेळामंत्री गिरीश महाजनांची घोषणा
15
Nashik Municipal Election 2026 : बिग फाइटने वेधलं मतदारांचं लक्ष; कोण ठरणार सरस? अंतिम टप्प्यात प्रचार शिगेला
16
‘बाथरूममध्ये मीच आधी जाणार!’, किरकोळ वादातून भावाने केली भावाची हत्या, मध्ये आलेल्या आईलाही संपवले 
17
३२ वर्षीय तरुण बनणार टाटा ग्रुपचे पॉवर सेंटर? विश्वस्तांच्या वादात नोएल टाटांची पकड मजबूत
18
तुमचा पोर्टफोलिओ बनवा 'पॉवरफुल'! सिमेंट, ऊर्जा आणि विमा क्षेत्रातील हे शेअर्स देणार बंपर परतावा
19
अमेरिकेची मोठी कारवाई! वर्षभरात एक लाखांहून अधिक व्हिसा रद्द; भारतीय विद्यार्थी, व्यावसायिकांच्या अडचणी वाढणार?
20
मुंबईत उद्धवसेना अन् मनसेला किती जागा मिळणार?; भाजपाच्या बड्या नेत्याने थेट आकडाच सांगितला
Daily Top 2Weekly Top 5

बँकांच्या उदासीन धोरणामुळे आत्मनिर्भर योजनेचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 00:20 IST

पथविक्रेत्यांचे आर्थिक गणित बिघडले; बँकांकडून सहकार्य नाही

- हितेन नाईकपालघर : पालघर नगरपरिषद हद्दीतील पथविक्रेत्यांना आत्मनिर्भर योजनेअंतर्गत लाभ देण्याची घोषणा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केली असली तरी बँकांकडून प्रत्यक्षात भांडवल उपलब्ध करून दिले जात नाही. मुद्रा लोनबाबतही अशीच परिस्थिती असून आम्हाला योग्य गॅरंटर (तारण) असल्याशिवाय बँका उभेच करीत नसल्याने या योजना फसव्या तर नाही ना, अशी शंका सर्वसामान्यांतून व्यक्त केली जात आहे.मार्च महिन्यापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शहरातील पदपथावर भाजीपाला, कपडे आदी विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री करून आपल्या कुटुंबाचा खर्च भागविणाऱ्या पथविक्रेत्यांचे आर्थिक गणित बिघडल्याने त्यांच्या उदरनिर्वाहावर विपरित परिणाम झालेला आहे. नव्याने व्यवसाय करण्यासाठी आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत खेळते भांडवल उपलब्ध करून त्यांच्या व्यवसायाला उभारी देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली असली, तरी प्रत्यक्षात मात्र अशा छोट्या व्यावसायिकांना बँका उभ्याच करीत नसल्याचे दिसून आले आहे.जिल्ह्यामधील महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात असलेल्या पथविक्रेत्यांना दहा हजाराची आर्थिक मदत विनातारण कर्ज स्वरूपात बँकांमार्फत उपलब्ध केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती, मात्र त्याचा लाभ सर्वसामान्यांना मिळतच नसल्याच्या तक्रारी येत आहेत.एका सर्वेक्षणानुसार पालघर नगरपरिषद क्षेत्रात सुमारे दोन हजाराच्या आसपास व्यवसाय करणारे विक्रेते आहेत. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठीचा अर्ज करणे ही बाब किचकट व वेळखाऊ असून महा ई-सेवा केंद्रात लाभार्थ्याचे आधारकार्ड, इलेक्शन कार्ड, बँकेचे पासबुक आदी कागदपत्रे जमा केल्यावर त्यांना एक फॉर्म दिला जातो, तो फॉर्म भरून झाल्यावर त्याची प्रिंट नगरपरिषदेत दिल्यानंतर त्यांनी दिलेले दुसरे पत्र पुन्हा महा ई-सेवा केंद्रात भरून पूर्ण प्रक्रिया झाल्यावर नगर परिषदेत जमा करावी लागते.सुमारे १०० एक विक्रेत्यांनी आॅफलाईन अर्जही केले आहेत. तर शेकडोंनी आॅफलाईन अर्जही केले आहेत. यातील पात्र लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर नगरपरिषदेमार्फत शिफारसपत्र दिले जाते. त्यानंतर संबंधित बँकांनी पुढील प्रक्रिया करून हे कर्ज संबंधित विक्रेत्याला उपलब्ध करून द्यायचे आहे. मात्र बँकांकडून भांडवल उपलब्ध होत नसल्याने ही योजना फसवी असल्याची ओरड लाभार्थ्यांमधून केली जात आहे.पदपथविके्रत्यांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी जनजागृती करण्यात येत असून अधिकाधिक लाभार्थ्यांना या योजनेत समाविष्ट करण्याचे काम सुरू आहे. बँकांकडून योग्य प्रतिसाद नसल्याने त्यांच्याकडून सहकार्य अपेक्षित आहे.- स्वाती देशपांडे-कुलकर्णी, मुख्याधिकारी, पालघर