शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचा दबाव झुगारल्याने स्वप्न पूर्ण- झरीन खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 02:14 IST

नोकरी करून शिकणार

- कुमार बडदेमुंब्रा : झरीन खान बारावीची परीक्षा उत्तीर्ण होताच तिच्या घरी तिच्या लग्नाचे पाहायला सुरुवात झाली होती. मात्र आपल्याला लागलीच लग्न करायचे नाही हे तिने आपल्या आई-वडिलांना बजावले. नोकरी करीत तिने सीए (आयपीसीसी) ही देशातील अत्यंत कठीण परीक्षा देशभरात अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण केली. आता तिच्यावर तिचे आई-वडील कौतुकाचा वर्षाव करीत आहेत. मुलीचे लग्न करुन मोकळे होण्याची चूक केली नाही हे उत्तम झाले हे त्यांना आता उमजले आहे.मुस्लिम समाजात मुलींचे लहान वयात लग्न केले जाते. झरीनच्या उच्च शिक्षणातही लग्नाचे विघ्न आले होते. बारावी उत्तीर्ण होताच झरीनचे लग्न करण्याकरिता नातलग, आजूबाजूचे यांचा कुटुंबावरील दबाव वाढू लागला. झरीनचे आई-वडील तिने लग्न करावे याकरिता तिच्या मागे लागले होते. मात्र आपल्याला इतक्यात लग्न करायचे नाही. सीए उत्तीर्ण व्हायचे आहे, असे झरीनने घरच्यांना सांगितले. तिचा हा निर्णय स्वीकारताना घरच्यांना थोडे जीवावर आले. वेळीच मुलीचे लग्न झाले नाही तर समाज काय म्हणेल, याची धास्ती होती. मात्र लहानपणापासून झरीन खूप हुशार आहे हे ठावूक असल्याने तिचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता तिला एक संधी देण्याचे घरच्यांनी ठरवले आणि त्या संधीचे तिने सोने केले.झरीनचे वडील नवी मुंबईत गरेजमध्ये मेकनिकचे काम करतात तर आई गृहीणी आहे. झरीन गणितात अत्यंत हुशार असल्याने तिने सीए व्हावे याकरिता तिच्या भांडुप येथील महाविद्यालयातील काही सिनीयर मित्रमैत्रिणींनी तिला प्रोत्साहन दिले. फरीदाबादच्या विराज अरोरा यांच्या सीए (आयपीसीसी) परीक्षार्थिंकरिता असलेल्या क्लासमध्ये तिने प्रवेश घेतला होता. लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन पद्धतीने तिने सीए परीक्षेचा अभ्यास केला. झरीन नोकरी करीत असल्याने तिने आपल्या पगारातून स्मार्ट फोन घेतल्यानेच तिला ऑनलाइन शिक्षण घेणे शक्य झाले. देशात अव्वल आल्याने आता अधिक चांगल्या पगाराची नोकरी मिळेल, अशी तिची अपेक्षा आहे. सीए अंतिम वर्ष परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरही नोकरी करणार असल्याचे तिने सांगितले.देशातील शिक्षणाची आवड असलेल्या प्रत्येक मुस्लीम मुलीने उच्च शिक्षण घेण्याकरिता आपल्या कुटुंबीयांना राजी केले पाहिजे. लग्न करुन संसारात बसल्यावर मुलींचे शिक्षण थांबते व अनेक हुशार मुलींची प्रगती खुंटते. मुस्लीम समाजातील मुलींच्या पालकांनीही लग्न ही मुलीच्या आयुष्यातील इतिश्री मानू नये.- झरीन खान, देशात सर्वप्रथम, सीए (आयपीसीसी)