शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भिवंडीत अवैधरित्या कत्तलखाने सुरू, शाळकरी विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 18:49 IST

भिवंडी : महापालिकेच्या मार्केट विभागाअंतर्गत शहरातील जनावरांचे कत्तलखाने बंद केल्याने काही लोकांनी कसाई वाड्याजवळ उघड्यावर जनावरे कापणे सुरू केल्याने परिसरातील नागरिक व शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.केंद्र शासनांतर्गत न्यायीक अधिकार असलेली नॅशनल ग्रिन स्ट्रिब्युनल ही संस्था पर्यावरण विषयक काम करते. कत्तलखान्यातून निघणारे रक्त, टाकावू अवशेष व निकामी चीजवस्तुची योग्यप्रकारे विल्हेवाट ...

भिवंडी : महापालिकेच्या मार्केट विभागाअंतर्गत शहरातील जनावरांचे कत्तलखाने बंद केल्याने काही लोकांनी कसाई वाड्याजवळ उघड्यावर जनावरे कापणे सुरू केल्याने परिसरातील नागरिक व शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.केंद्र शासनांतर्गत न्यायीक अधिकार असलेली नॅशनल ग्रिन स्ट्रिब्युनल ही संस्था पर्यावरण विषयक काम करते. कत्तलखान्यातून निघणारे रक्त, टाकावू अवशेष व निकामी चीजवस्तुची योग्यप्रकारे विल्हेवाट लावली जात नसल्याने त्याचा परिणाम पर्यावरणावर होत आहे.त्यामुळे नॅशनल ग्रिन स्ट्रिब्युनल या संस्थेतील धर्मपाल या व्यक्तीने राज्यातील कत्तलखान्या विरोधात पुणे खंडपीठाकडे तक्रार दाखल केली होती. तेव्हा खंडपीठाने केलेल्या सुनावणीत महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने केलेल्या पहाणीत जनावरांचे रक्तांवर प्रक्रीया न करता ते सांडपाण्याबरोबर वाहून दिले जाते.तसेच टाकावू अवशेषांची विल्हेवाट लावण्यासाठी ज्या मार्गदर्शक अटी दिलेल्या होत्या त्याची महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने अंमलबजावणी न केल्याने शहरातील सर्व कत्तलखाने मनपाच्या मार्केट विभागाने बंद केले आहेत.असे असताना शहरातील काही ठिकाणी दररोज मोठ्या जनावरांच्या उघड्यावर कत्तली केल्या जात आहेत.तर जनावरांची कत्तल झाल्यानंतर निघालेले रक्त गटारातून वाहून जात आहे. त्यापैकी कसाईवाड्यात ज्या ठिकाणी कत्तली केल्या जात आहेत त्या परिसरांत उर्दु माध्यमांच्या दोन शाळा आहेत. तेव्हा या रस्त्यावरून जाणा-या - येणा-या विद्यार्थ्यांना तेथे बांधलेल्या जनावरांपासून धोका निर्माण झाला आहे. तर या परिसरांत पसरलेल्या दुर्गंधीने विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे बेकायदेशाीरपणे होणारी कत्तल थांबवून पालिकेचे कत्तलखाने सुरू करावेत, अशी मागणी करीत मानवाधिकार फाऊंडेशन व इंडियन युवा मोर्चा यांच्या मार्फत आयुक्त योगेश म्हसे यांना निवेदन दिले.

टॅग्स :thaneठाणे