शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

भिवंडीत अवैधरित्या कत्तलखाने सुरू, शाळकरी विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 18:49 IST

भिवंडी : महापालिकेच्या मार्केट विभागाअंतर्गत शहरातील जनावरांचे कत्तलखाने बंद केल्याने काही लोकांनी कसाई वाड्याजवळ उघड्यावर जनावरे कापणे सुरू केल्याने परिसरातील नागरिक व शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.केंद्र शासनांतर्गत न्यायीक अधिकार असलेली नॅशनल ग्रिन स्ट्रिब्युनल ही संस्था पर्यावरण विषयक काम करते. कत्तलखान्यातून निघणारे रक्त, टाकावू अवशेष व निकामी चीजवस्तुची योग्यप्रकारे विल्हेवाट ...

भिवंडी : महापालिकेच्या मार्केट विभागाअंतर्गत शहरातील जनावरांचे कत्तलखाने बंद केल्याने काही लोकांनी कसाई वाड्याजवळ उघड्यावर जनावरे कापणे सुरू केल्याने परिसरातील नागरिक व शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.केंद्र शासनांतर्गत न्यायीक अधिकार असलेली नॅशनल ग्रिन स्ट्रिब्युनल ही संस्था पर्यावरण विषयक काम करते. कत्तलखान्यातून निघणारे रक्त, टाकावू अवशेष व निकामी चीजवस्तुची योग्यप्रकारे विल्हेवाट लावली जात नसल्याने त्याचा परिणाम पर्यावरणावर होत आहे.त्यामुळे नॅशनल ग्रिन स्ट्रिब्युनल या संस्थेतील धर्मपाल या व्यक्तीने राज्यातील कत्तलखान्या विरोधात पुणे खंडपीठाकडे तक्रार दाखल केली होती. तेव्हा खंडपीठाने केलेल्या सुनावणीत महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने केलेल्या पहाणीत जनावरांचे रक्तांवर प्रक्रीया न करता ते सांडपाण्याबरोबर वाहून दिले जाते.तसेच टाकावू अवशेषांची विल्हेवाट लावण्यासाठी ज्या मार्गदर्शक अटी दिलेल्या होत्या त्याची महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने अंमलबजावणी न केल्याने शहरातील सर्व कत्तलखाने मनपाच्या मार्केट विभागाने बंद केले आहेत.असे असताना शहरातील काही ठिकाणी दररोज मोठ्या जनावरांच्या उघड्यावर कत्तली केल्या जात आहेत.तर जनावरांची कत्तल झाल्यानंतर निघालेले रक्त गटारातून वाहून जात आहे. त्यापैकी कसाईवाड्यात ज्या ठिकाणी कत्तली केल्या जात आहेत त्या परिसरांत उर्दु माध्यमांच्या दोन शाळा आहेत. तेव्हा या रस्त्यावरून जाणा-या - येणा-या विद्यार्थ्यांना तेथे बांधलेल्या जनावरांपासून धोका निर्माण झाला आहे. तर या परिसरांत पसरलेल्या दुर्गंधीने विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे बेकायदेशाीरपणे होणारी कत्तल थांबवून पालिकेचे कत्तलखाने सुरू करावेत, अशी मागणी करीत मानवाधिकार फाऊंडेशन व इंडियन युवा मोर्चा यांच्या मार्फत आयुक्त योगेश म्हसे यांना निवेदन दिले.

टॅग्स :thaneठाणे