शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : दिल्ली स्फोटात खळबळजनक खुलासा; घटनास्थळी सापडली 9mm ची ३ काडतुसं, पण...
2
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
3
कोचीन शिपयार्डपासून ते एचयूडीसीओपर्यंत; पुढच्या आठवड्यात कोणती कंपनी किती लाभांश देणार?
4
“काँग्रेस कधीच संपत नसते, जनतेचा विश्वास, पक्ष पुन्हा ताकदीने उभी राहतो”: रमेश चेन्नीथला
5
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
6
धक्कादायक! अमरावतीत धारणी उपजिल्हा रुग्णालयात मृत्यूचे तांडव; तीन बालकांसह मातेचा मृत्यू
7
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
8
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
9
Bombay HC: सेबीशी तडजोड हा कारवाई रद्द करण्याचा आधार नाही, आयपीओ फेरफारसंबंधी याचिका फेटाळली
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
11
'प्रेम? ही तर ओव्हररेटेड भावना', धनुषच्या उत्तराने सर्वच चकित; क्रिती म्हणाली, 'मला नाही वाटत...'
12
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
13
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
14
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
15
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
16
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
17
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
18
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
19
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
20
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत अवैधरित्या कत्तलखाने सुरू, शाळकरी विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 18:49 IST

भिवंडी : महापालिकेच्या मार्केट विभागाअंतर्गत शहरातील जनावरांचे कत्तलखाने बंद केल्याने काही लोकांनी कसाई वाड्याजवळ उघड्यावर जनावरे कापणे सुरू केल्याने परिसरातील नागरिक व शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.केंद्र शासनांतर्गत न्यायीक अधिकार असलेली नॅशनल ग्रिन स्ट्रिब्युनल ही संस्था पर्यावरण विषयक काम करते. कत्तलखान्यातून निघणारे रक्त, टाकावू अवशेष व निकामी चीजवस्तुची योग्यप्रकारे विल्हेवाट ...

भिवंडी : महापालिकेच्या मार्केट विभागाअंतर्गत शहरातील जनावरांचे कत्तलखाने बंद केल्याने काही लोकांनी कसाई वाड्याजवळ उघड्यावर जनावरे कापणे सुरू केल्याने परिसरातील नागरिक व शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.केंद्र शासनांतर्गत न्यायीक अधिकार असलेली नॅशनल ग्रिन स्ट्रिब्युनल ही संस्था पर्यावरण विषयक काम करते. कत्तलखान्यातून निघणारे रक्त, टाकावू अवशेष व निकामी चीजवस्तुची योग्यप्रकारे विल्हेवाट लावली जात नसल्याने त्याचा परिणाम पर्यावरणावर होत आहे.त्यामुळे नॅशनल ग्रिन स्ट्रिब्युनल या संस्थेतील धर्मपाल या व्यक्तीने राज्यातील कत्तलखान्या विरोधात पुणे खंडपीठाकडे तक्रार दाखल केली होती. तेव्हा खंडपीठाने केलेल्या सुनावणीत महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने केलेल्या पहाणीत जनावरांचे रक्तांवर प्रक्रीया न करता ते सांडपाण्याबरोबर वाहून दिले जाते.तसेच टाकावू अवशेषांची विल्हेवाट लावण्यासाठी ज्या मार्गदर्शक अटी दिलेल्या होत्या त्याची महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने अंमलबजावणी न केल्याने शहरातील सर्व कत्तलखाने मनपाच्या मार्केट विभागाने बंद केले आहेत.असे असताना शहरातील काही ठिकाणी दररोज मोठ्या जनावरांच्या उघड्यावर कत्तली केल्या जात आहेत.तर जनावरांची कत्तल झाल्यानंतर निघालेले रक्त गटारातून वाहून जात आहे. त्यापैकी कसाईवाड्यात ज्या ठिकाणी कत्तली केल्या जात आहेत त्या परिसरांत उर्दु माध्यमांच्या दोन शाळा आहेत. तेव्हा या रस्त्यावरून जाणा-या - येणा-या विद्यार्थ्यांना तेथे बांधलेल्या जनावरांपासून धोका निर्माण झाला आहे. तर या परिसरांत पसरलेल्या दुर्गंधीने विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे बेकायदेशाीरपणे होणारी कत्तल थांबवून पालिकेचे कत्तलखाने सुरू करावेत, अशी मागणी करीत मानवाधिकार फाऊंडेशन व इंडियन युवा मोर्चा यांच्या मार्फत आयुक्त योगेश म्हसे यांना निवेदन दिले.

टॅग्स :thaneठाणे