शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बजावला मतदानाचा हक्क
2
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
5
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
6
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
7
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
8
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
9
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
10
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
11
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
12
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
13
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
14
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
15
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
16
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
17
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
18
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
19
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
20
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन

ठाणे तहसीलवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 3:22 AM

सतत वाढणाऱ्या महागाईमुळे मजुरी आणि इतर खर्चाने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे.

ठाणे : सतत वाढणाऱ्या महागाईमुळे मजुरी आणि इतर खर्चाने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. खर्चाच्या तुलनेत शेतीचे उत्पन्न होत नसल्यामुळे ते हवालदिल झाले आहे. या समस्येतून शेतकºयांना बाहेर काढून आर्थिक पाठबळ देण्यासाठी शेतीच्या मशागतीला लागणारा खर्च व मजुरी रोजगार हमीतून द्यावी, आदी मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकरी व शेतमजुरांनी येथील तहसील कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढून सरकारचा निषेध केला.जांभळीनाक्यावरील शिवाजी मैदानावर एकत्र आलेल्या या मोर्चेकºयांनी मुख्य बाजारपेठेतून हा मोर्चा तहसील कार्यालयावर नेला. यावेळी महिला कार्यकर्त्यांचा समावेश मोठ्या प्रमाणात आढळून आला. प्रवेशद्वारावर अडवण्यात आलेल्या या मोर्चेकºयांमुळे या मार्गावरील वाहतूक अन्यत्र वळवण्यात आली. शेतीतून येणारे उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ बसत नाही. या आर्थिक ताळेबंदातून मुक्त होण्यासाठी शेतकरी पारंपरिक शेतीपासून परावृत्त होत आहे. यास वेळीच पायबंद घालण्यासाठी श्रमजीवी कार्यकर्त्यांनी हा मोर्चा काढून शासनास धारेवर धरले.शेतकºयांच्या खर्चाचे आर्थिक चित्र बदलवण्यासाठी ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक या जिल्ह्यांमधील सर्व तहसील कार्यालयांवर श्रमजीवींनी एकाच दिवशी मोर्चे काढून शासनाचे लक्ष वेधले. याप्रमाणे येथील तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन दिले. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी सरकारकडे मागणी करून रोजगार हमी योजनेत बदल करण्याच्या सूचना केल्या होत्या. याबाबत, संबंधित खात्याचे मंत्री आणि अधिकाºयांसोबत नागपूर येथे अधिवेशनकाळात बैठकही पार पडली. तरीदेखील विलंब होत असल्यामुळे श्रमजीवींनी मोर्चे काढून सरकारने तातडीने शेतीची कामे रोजगार हमीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी लावून धरली. यामुळे शेतकरी सक्षम होऊ शकेल, आदिवासी-दुर्गम भागात शेती करणे परवडेल आणि भुकेचा प्रश्न सुटण्यास हातभार लागेल, असे मोर्चेकºयांच्या मार्गदर्शन प्रसंगी पंडित यांनी स्पष्ट केले.