शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आघाडीत आठ जागांचा तिढा कायम

By admin | Updated: January 24, 2017 05:44 IST

काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी ठाण्यात दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली असल्याची घोषणा केली असली, तरी आघाडीचे जागावाटप

ठाणे : काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी ठाण्यात दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली असल्याची घोषणा केली असली, तरी आघाडीचे जागावाटप ८ जागांवर अडले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी बैठक होऊनही काँग्रेसने त्या आठ जागांवरील आपला दावा सोडलेला नाही. जागावाटपाचा तिढा कायम असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने २०१२ च्या वाटाघाटीच्या वेळी वेगवेगळ्या पदांबाबत व समित्यांवरील नियुक्त्यांबाबत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नसल्याचा मुद्दा काँग्रेसने उपस्थित केल्याने वाटाघाटींना वेगळेच फाटे फुटण्याची व पर्यायाने आघाडीत विघ्न येण्याची भीती निर्माण झाली आहे.आठ जागांचा तिढा सोडवण्यासाठी सोमवारी ठाण्यात पुन्हा चर्चा झाली. काँग्रेसने मुंब्रा, गोकूळनगर, घोडबंदर, बाळकुम, वागळे आदी जागांवर आपला दावा ठाम असल्याचे पुन्हा स्पष्ट केले. राष्ट्रवादीही या जागा सोडण्यास तयार नाही. राष्ट्रवादी आपल्याला वापरून घेत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. २०१२ च्या पालिका निवडणुकीत झालेल्या करारनाम्याचीही राष्ट्रवादीला आठवण करून दिली आहे. त्या वेळेस विरोधी पक्षनेतेपद, स्थायी समिती, प्रभाग समिती आदींसह इतर महत्त्वाच्या पदांसाठी करारनामा झाला होता. परंतु, यातील एकही शब्द राष्ट्रवादीने पाळला नाही. तसेच मागील निवडणुकीत राष्ट्रवादीमुळे काँग्रेसच्या आठ जागांवर बंडखोरी झाली, याचीही आठवण काँग्रेसने करून दिली आहे. आमचा त्यांच्यावर विश्वास नसून आताही ते दगाफटका करू शकतात, असा दावाही काँग्रेसने केला आहे. (प्रतिनिधी)