शहरं
Join us  
Trending Stories
1
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
2
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
3
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
4
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
5
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
6
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
7
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
8
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
9
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
10
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
11
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
12
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
13
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
14
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
15
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
16
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
17
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
18
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
19
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
20
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!

फ्रेट कॉरिडॉरमुळे ‘घरकोंडी’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 01:22 IST

टिशांच्या काळात देशभरात रेल्वेचे जाळे विणले गेले.

-मुरलीधर भवार

टिशांच्या काळात देशभरात रेल्वेचे जाळे विणले गेले. त्यावेळी मालवाहतूक हाच प्रमुख उद्देश ब्रिटिशांनी डोळ्यांसमोर ठेवला होता. कालांतराने लोकसंख्या वाढत गेली आणि प्रवासी वाहतुकीला जास्त महत्त्व प्राप्त झाले. स्वतंत्र भारतात मालवाहतुकीचे महत्त्व कमी होऊन, रेल्वेच्या प्रवासी वाहतुकीलाच जास्त महत्त्व मिळाले. त्यामुळे आजही प्रवासी वाहतूक करणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांसह उपनगरीय गाड्यांनाही प्राधान्याने मार्ग मोकळा करून दिला जातो.

मालवाहतूक करणाºया मालगाड्या या सायडिंगला कुठेतरी उभ्या असतात किंवा १२ ते २४ तास काही स्थानकांच्या यार्डात उभ्या असतात. यातूनच मालवाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वेमार्गिका असावी, असा विचार यूपीए सरकारच्या काळात पुढे आला. त्यासाठी यूपीए सरकारने डेडिकेटड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्प राबविण्याची घोषणा केली.

हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यासाठी स्वतंत्र कॉर्पोरेशन स्थापन केले. त्यावेळी रायगड, ठाणे जिल्ह्यांतील पनवेल, निळजे, कोपर, डोंबिवली, भिवंडी, पालघर, डहाणूच्या बाधितांना नोटिसा धाडण्यात आल्या. प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यासाठी रेल्वेने नोटिसा पाठविल्यावर त्याला सुरुवातीला जमीनमालकांनी विरोध केला. मात्र, हा प्रकल्प देशहितासाठी किती महत्त्वपूर्ण आहे, याची महती पटवून देण्यात रेल्वेचा बराच काळ खर्ची गेला.

प्रकल्पात आमच्या जमिनी घेतल्या तर जमीनमालक, शेतकरी यांना योग्य मोबदला मिळणार की नाही, याची शाश्वती जमीनमालक व शेतकरी यांना नव्हती. जमीनमालकाच्या सातबाºयावर त्यांच्या भावकीची नावे होती. त्यामुळे नोटीस एकाला आली. मोबदलाही त्यालाच मिळणार, असे गणित बाधितांच्या डोक्यात होते. निळजेतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंत पाटील यांनी रायगड ते ठाण्यापर्यंत बाधितांच्या न्यायहक्कासाठी बैठका घेतल्या. घर बाधित होत असेल तर, घराच्या मोबदल्यात घर द्या, बाधितांना प्रकल्पग्रस्तांचा दाखला द्या, बाधितांच्या जमिनीला योग्य मोबदला द्या, बाधितांच्या कुटुंबातील एकाला रेल्वेत अथवा नव्या प्रकल्पाच्या ठिकाणी नोकरीत सामावून घ्या, अशा प्रमुख मागण्या २०१० साली करण्यात आल्या. त्यावेळी कोपर, निळजे, डोंबिवलीतील प्रकल्पबाधितांना सुनावणीकरिता डहाणू येथे बोलावण्यात आले.

मात्र, प्रकल्पबाधितांची सुनावणी प्रकल्प कॉर्पोरेशनने डहाणूला का ठेवली, ती कल्याण तहसील कार्यालयात अथवा कल्याण उपविभागीय अधिकारी कार्यालयात ठेवण्याचा आग्रह प्रकल्पबाधितांनी केला होता. प्रकल्पबाधितांनी काही हरकतीही घेतल्या होत्या. प्रकल्पबाधितांसाठी तत्कालीन खासदार आनंद परांजपे यांनी आवाज उठविला होता. प्रकल्प देशहिताचा असला तरी, बाधितांना न्याय दिला पाहिजे, त्यांना भरपाई मिळाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनीघेतली होती.

डोंबिवलीच्या संघटनांचे प्रयत्न आले फळाला

यूपीए सरकारच्या काळात डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. दहा वर्षांपासून याचे काम सुरू आहे. या प्रकल्पाचे ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांच्या हद्दीत अद्याप प्रत्यक्ष काम सुरू नाही. मात्र प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे. काहींनी नुकसानभरपाई घेतली, तर काहींनी नाकारली आहे. भरपाई नाकारणाऱ्यांची संख्या कमी आहे. घराच्या मोबदल्यात घर देण्यास प्रकल्पाचे कॉर्पोरेशन तयार नव्हते. मात्र डोंबिवलीतील दोन संस्थांनी केलेल्या संघर्षानंतर ८४० बाधितांना घरे देण्याचा निर्णय झाला. पहिल्या टप्प्यात कल्याण-डोंबिवली महापालिकेने बीएसयूपी योजनेतून उभारलेल्या घरांपैकी ८४० घरे दिली आहेत. त्याची रक्कम पालिकेस सरकारकडून मिळणार आहे. मात्र आणखी २६७५ प्रकल्पग्रस्त अद्यापही घरांच्या प्रतीक्षेत आहेत.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेthaneठाणेlocalलोकल