शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

नवघर येथे साकारणार स्वातंत्र्य सैनिक स्मारक, पाकिकेच्या सभेत ठराव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 18:44 IST

पुर्वेकडील नवघर नाका येथे स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक बांधण्याचा ठराव गेल्या अनेक वर्षानंर पहिल्यांदाच २६ फेब्रुवारीच्या महासभेत सर्वानुमते मंजुर करण्यात आला. त्यात शहरातील ३८ स्वातंत्र्य सैनिकांची नावे कोरण्यात येणार असल्याने त्यांची ओळख आहे.

- राजू काळे 

भार्इंदर - पुर्वेकडील नवघर नाका येथे स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक बांधण्याचा ठराव गेल्या अनेक वर्षानंर पहिल्यांदाच २६ फेब्रुवारीच्या महासभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्यात शहरातील ३८ स्वातंत्र्य सैनिकांची नावे कोरण्यात येणार असल्याने त्यांची ओळख स्थानिकांना होणार आहे.

भार्इंदर पुर्वेकडील नवघर व गोडदेव गावात मोठ्याप्रमाणात लोकवस्तींची घनता आहे. पुर्वी या ठिकाणी मोठ्याप्रमाणात  भात शेती होत होती. नवघर गावालाच लागून भार्इंदर खाडी असल्याने त्यातील पाणी शेतात येऊन शेताचे नुकसान होऊ नये, यासाठी इग्रजांनी दि इस्टेट इन्वेस्टमेंट कंपनीच्या माध्यमातुन स्थानिक रहिवाशी लक्ष्मणजी यांना बांध बंदिस्ताकरीता नियुक्त केले होते. त्यापोटी इंग्रजांना शेतसारा वसुल करुन देण्याची जबाबदारी देखील त्यांनाच देण्यात आली होती. पुढे याच दि इस्टेट इन्वेस्टमेंट कंपनीने शहरातील सुमारे ३ हजार ६०० एकर जमीनीवर मालकी हक्काचा दावा कायम ठेवल्याने तो निकाली काढण्यासाठी स्थानिकांसह राजकीय मंडळी तसेच राज्य सरकार प्रयत्नशील आहेत. सध्या हा खटला सर्वाेच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मराठा राजवटीपासुन पोर्तुगीज ते इंग्रज राजवटीचा इतिहास लाभलेल्या मीरा-भार्इंदरमधील या शहरात अनेक स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले. त्यात ग्रामस्थ दामोदर सखाराम पाटील,  जगन्नाथ पांडुरंग पाटील, जयराम शिवराम पाटील, पांडुरंग कालिदास पाटील, रामचंद्र बाळकृष्ण पाटील, दादू शिनवार पाटील (सर्व राहणार नवघर), नारायण केशव म्हात्रे, गोविंद उदय््राा पाटील, बाळू पाटील (सर्व राहणार गोडदेव) यांनी जंगल सत्याग्रहात सहभाग घेतला होता. आनंदराव दामाजी पाटील, भास्कर दामाजी पाटील, पांडूरंग नानाजी गावंड (सर्व राहणार नवघर) यांनी वैयक्तिक सत्याग्रहात सहभाग घेतला होता. तर मोरेश्वर नारायण पाटील, नारायण आनंदराव पाटील, भास्कर कमलाकर पाटील, चिंतामण पांडुरंग पाटील, रामचंद्र पांडुरंग पाटील, हरिश्चंद्र गणपत पाटील, अनंत कालिदास पाटील, देवराव बाबूल पाटील, गंगाबाई आत्माराम पाटील, शंकर विठ्ठल पाटील, श्यामराव गोविंद पाटील, गोपिनाथ रामचंद्र पाटील, कमलाकर बाबाजी पाटील, जनार्दन वामन पाटील, गोपाळ दामोदर पाटील, महादेव नाना भोईर, आत्माराम राजाराम भोईर, नारायण लक्ष्मण पाटील (सर्व राहणार नवघर), यशवंत शंकर म्हात्रे (रा. घोडबंदर), भालचंद्र आनंदराव रकवी, नानु आनंदराव रकवी, हरेश्वर दिनानाथ पाटील, दुर्गा देसाई, बाळकृष्ण नारायण पाटील, कान्हा वालजी पाटील (सर्व राहणार भार्इंदर) व उत्तन येथील कोळी यांनी १९४२ मधील चलेजाव चळवळीत सहभाग घेतला होता. यातील बहुतांशी स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या नातेवाईकांनी आपल्या जागा पालिकेला लोकहितासाठी दान दिल्या असुन यातील बहुतांशी स्वातंत्र्य सैनिक सध्या ह्यात नाहीत. मात्र त्यांची ओळख सुमारे ९० टक्यांहुन अधिक मीरा-भार्इंदरकरांना नसल्याने त्यांचे हौतात्म्य  व योगदान वाया जाऊ नये, ते नेहमी स्मरणात रहावे, यासाठी त्यांचे स्मारक साकारण्याकरीता भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका प्रभात पाटील यांनी २६ फेब्रुवारीच्या महासभेत मांडला होता.  तसेच यातील सुमारे २७ स्वातंत्र्य सैनिक एकट्या नवघर व लगतच्या गोडदेव गावातील असल्याने त्यांचे नवघर येथे स्मारक साकारण्याची मागणी करण्यात आली होती, ती सर्वानुमते मंजूर करण्यात आली. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर