शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

वीस वर्षांत ६० हजार भटक्या, पाळीव कुत्र्यांचे मोफत केले लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 00:32 IST

जागतिक रेबीज दिन विशेष : प्लांट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर असोसिएशनचा उपक्रम

मुरलीधर भवार।

कल्याण : मुंबई व उपनगरांत भटक्या कुत्र्यांची समस्या जास्त आहे. त्यांच्याकडून अनेक नागरिकांना चावा घेतला जातो. त्यांना रेबीजचा आजार असल्यास त्याची लागण चावा घेतलेल्या माणसाला होते. त्यामुळे त्याचा मृत्यू होतो. भटक्या कुत्र्यांसह पाळीव कुत्र्यांचे लसीकरण करण्याचे काम डोंबिवलीतील प्लांट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर असोसिएशन या सामाजिक संस्थेच्या वतीने २० वर्षांपासून सुरू आहे. २० वर्षांत तब्बल ६० हजार भटक्या व पाळीव कुत्र्यांचे लसीकरण करण्याचे काम या संस्थेने केले आहे.

संस्थेचे प्रमुख निलेश भणगे यांनी हे काम २० वर्षांपासून अविरत सुरू ठेवले आहे. त्यांच्या जोडीला संस्थेचे काम पाहणारे २२ स्वयंसेवक आहेत. त्यांचे जोडीदार राज मारू यांचाही या कामात सिंहाचा वाटा आहे. दरवर्षी किमान तीन हजार भटक्या व पाळीव कुत्र्यांचे ते लसीकरण करतात. लसीकरण केलेल्या कुत्र्याला रेबीज होत नाही. तसेच एखाद्या व्यक्तीला लसीकरण केलेला कुत्रा चावला, तर त्यापासून रेबीज होण्याचा धोका टळतो. संस्थेला एका कुत्र्याच्या लसीकरणावर ३० रुपये खर्च येतो. त्यासाठी संस्था कोणतेही शुल्क आकारत नाही. भटक्या व पाळीव कुत्र्यांचे लसीकण करणे, ही प्रत्येक पालिका व महापालिकेची जबाबदारी आहे. कल्याण-डोंबिवली व नवी मुंबई महापालिकेकडून भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जाते.मात्र, लसीकरण केले जात नाही. अन्य उल्हासनगर, ठाणे, भिवंडी महापालिकांसह बदलापूर, अंबरनाथ पालिकांतही निर्बीजीकरणाचे प्रकल्प चालविले जात नाहीत. त्यामुळे त्याठिकाणी भटक्या कुत्र्यांचा त्रास नागरिकांना आहे. त्यापासून रेबीज होण्याची भीती जास्त आहे.भणगे यांची संस्था कल्याण, डोंबिवली, बदलापूर, उल्हासनगर, अंबरनाथ या परिसरांतील भटक्या व पाळीव कुत्र्यांचे लसीकरण करीत आहे.त्यासाठी त्यांना डोंबिवली व बदलापूर रोटरॅक्ट क्लबचे सहकार्य मिळते. त्यानुसार, ते लसीकरणाचा ड्राइव्ह घेतात. आज जागतिक रेबीज दिनानिमित्त बदलापूरमध्ये ड्राइव्ह घेण्यात आला आहे.लसीकरणाचे केवळ पाच टक्के प्रमाणच्आशिया खंडात रेबीजमुळे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. त्यातही भारतात हे प्रमाण सगळ्यात जास्त आहे. भारतात रेबीजमुळे वर्षाला ३५ हजार लोकांचा मृत्यू होतो. भारतात पाळीव कुत्र्यांच्या लसीकरणाचे प्रमाण केवळ पाच टक्के आहे.च्एका व्यक्तीला इंजेक्शनचा दोन हजार रुपये खर्च येतो. या खर्चाची सरासरी रक्कम विचारात घेता दरवर्षी ८५ कोटींचे नुकसान होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, रेबीजचे जगातून २०३० पर्यंत पूर्णपणे उच्चाटन करायचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्याdogकुत्रा