शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

मीरा भाईंदरमध्ये बंदी असलेल्या प्लास्टिक  पिशव्यांची मुक्तपणे विक्री; शासन बंदीला पालिकेचा हरताळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 15:16 IST

इतक्या मोठ्या संख्येने प्लास्टिक चा साठा व त्याची घाऊक विक्री तसेच दैनंदिन वापर बिनबोभाट सुरु असताना महापालिका प्रशासन सर्रास डोळेझाक करत आहे

मीरारोड - कायद्याने बंदी असूनही पर्यावरण व आरोग्याला घातक असलेल्या  प्लास्टिक पिशव्यांचा कोरोनाच्या काळात मात्र  सर्रास वापर व विक्री सुरु असताना मीरा भाईंदर महापालिकेने या गंभीर बाबी कडे काणाडोळा चालवला आहे .  त्यामुळे शहरात  प्लास्टिक बंदीला हरताळ फसला जाऊन बंदी असलेल्या  प्लास्टिक पिशव्यांचा बिनबोभाट सुळसुळाट झाला आहे . 

प्लास्टिक पिशव्या , प्लास्टिक कंटेनर, चमचे , प्लेट , ग्लास , थर्माकॉल आदी वस्तूंवर राज्य शासनाने बंदी घातलेली आहे . इतकेच नव्हे तर पंतप्रधान , राज्यपाल आदींनी देखील एकदा वापरात येणाऱ्या प्लास्टिक पिशव्या आदी वस्तूंचा वापर बंद करण्याचे आवाहन केले होते . . 

प्लास्टिक  पिशव्या खाडी , नदी , समुद्र, तलाव , नाल्यात  मोठ्या संख्येने जमा होत असल्याने जलप्रदूषण होत आहे. प्लास्टिक  मुळे पाणी निचरा होण्याचे मार्ग बंद होऊन पावसात पूरस्थिती निर्माण होण्यामागे देखील एक कारण ठरत आहे .  मच्छीमारांना सुद्धा जाळ्यात प्लास्टिक , कचरा अडकून त्यांच्या उपजिविकेवर संक्रांत आली आहे . 

भटके कुत्रे, गाई - गुरं यांच्या पोटात प्लास्टिक गेल्याने त्यांच्या प्रकृतीला बाधा होऊन मृत्यू होतात.  प्लास्टिक पिशव्या - कंटेनर मधून अन्न पदार्थ घेणे मानवी आरोग्याला घातक ठरत आहे .  पर्यावरणाला सुद्धा मोठे नुकसान होत असताना कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्या पासून तर महापालिकेने प्लास्टिक पिशव्या आदींना मोकळीकच दिली आहे . 

शहरात सर्रास बंदी असलेल्या प्लास्टिक  पिशव्यांचा वापर अन्न पदार्थ , भाजी , फळ , किराणा , बेकरी, अंडी , मासे - मटण आदी देण्या करिता केला जात आहे . महत्वाचे घरपोच वस्तूचा व्यवसाय करणाऱ्यांकडूनमदतकार्य करणाऱ्यांकडून तर उघडपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरु आहे . इतकंच नव्हे तर काही प्रकरणात प्रशासन व लोकप्रतिनिधी कडून देखील बंदी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर केला गेलाय . 

इतक्या मोठ्या संख्येने प्लास्टिक चा साठा व त्याची घाऊक विक्री तसेच दैनंदिन वापर बिनबोभाट सुरु असताना महापालिका प्रशासन सर्रास डोळेझाक करत आहे . तर नगरसेवक , राजकारणी तर नेहमीच या प्लास्टिक वापरावर मूग गिळून बसले आहेत . त्यामुळे यात मोठे अर्थकारण व अनेकांना आर्थिक फायदा पोहचवण्यासाठी प्लास्टिक बंदीला हरताळ फासला जात असल्याचा आरोप जागरूक नागरिकां मधून होत आहे .  या बाबत ठोस कारवाईची मागणी त्यांनी केली आहे . 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदरPlastic banप्लॅस्टिक बंदी