शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
2
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
3
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
4
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
5
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
6
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
7
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
8
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
9
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
10
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
11
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
12
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
13
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
14
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
15
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
16
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
17
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
18
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
19
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
20
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

करोडोंची फसवणूक : मैत्रेयच्या संचालकांना पकडण्यासाठी पोलिसांची दोन पथके

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 22:25 IST

ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि भिवंडी परिसरांतील शेकडो गुंतवणूकदारांना करोडो रुपयांना गंडा घालून पसार झालेल्या मैत्रेयच्या संचालकांना पकडण्यासाठी ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने दोन पथकांची निर्मिती केली आहे.

ठाणे : ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि भिवंडी परिसरांतील शेकडो गुंतवणूकदारांना करोडो रुपयांना गंडा घालून पसार झालेल्या मैत्रेयच्या संचालकांना पकडण्यासाठी ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने दोन पथकांची निर्मिती केली आहे. या पथकांकडून गुंतवणूकदारांचे जबाब घेण्याबरोबरच आरोपींचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मैत्रेय प्लॉटर्स अ‍ॅण्ड स्ट्रक्चरर्स प्रा.लि. आणि मैत्री रियलटर्स अ‍ॅण्ड कन्स्ट्रक्शन प्रा.लि. या कंपनीच्या संचालकांनी ठिकठिकाणी एजंट नेमून त्यांच्यामार्फत कंपनीत आकर्षक योजना असल्याची बतावणी केली. त्याद्वारे काही ठिकाणी सहा वर्षांत पैसे दुप्पट देण्याच्या तर काही ठिकाणी जमिनीमध्ये पैसे गुंतवूणक करणाºयांना चांगला मोबदला देण्याचे प्रलोभन दाखवले. याच एजंटांच्या मदतीने वर्षा सत्पाळकर (रा. विरार, पालघर), जनार्दन परुळेकर (रा. विरार, पालघर), अजित पठारे (रा. नालासोपारा, ठाणे), ज्ञानेश्वर वैद्य, लक्ष्मीकांत नार्वेकर आणि विजय तावरे तसेच इतरांनी सुमारे ५५० ते ६०० जणांची फसवणूक करून त्यांच्याकडून १० ते १५ कोटी रुपये उकळले आहेत. विशेष म्हणजे मैत्री सुवर्णसिद्धी कंपनीला अशा प्रकारच्या ठेवी स्वीकारण्याला ‘सेबी’ (सिक्युरिटी अ‍ॅण्ड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडिया) यांच्याकडून निर्बंध घालण्यात आले होते. तरीही, मैत्रेय उद्योगसमूहाने गुंतवणूकदारांना अशक्यप्राय अशा तसेच आकर्षित योजनांचे आमिष दाखवून कळवा, भिवंडी, कल्याण, घोडबंदर रोड, मुंबई, नवी मुंबईतील अनेक गुंतवणूकदारांकडून करोडो रुपयांच्या रकमा स्वीकारल्या. हे पैसे परत न करताच त्यांचा अपहार केला. आता याप्रकरणी आमदार संजय केळकर यांच्या मागणीनंतर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास सुरू करण्यात आला असून दोन अधिकाºयांची पथके तयार केल्याची माहिती उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी दिली.१९ वर्षात १५०० कोटींची फसवणूकमैत्रेय ग्रुप कंपनी निरनिराळया नावाने १९९८ पासून सात ते आठ राज्यात कार्यरत होती. संचालक व मालक मधुसूदन सत्पाळकर याच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी वर्षा सत्पाळकर ही हा ‘उद्योग’ सांभाळत होती. नाशिक येथे संबंधितांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याचे बोलले जाते. गेल्या १९ वर्षाच्या कार्यकाळात हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा अंदाज व्यक्त होत असून ती रक्कम १५०० कोटीपर्यंत जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. कळवा येथील २९ वर्ष बंद असलेल्या मफतलाल कंपनीच्या कामगारांच्या महिलांनी या कंपनीमध्ये पैसे गुंतविले असून फसवणूक झाल्यामुळे त्यांना आणखीनच आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.