शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

करोडोंची फसवणूक : मैत्रेयच्या संचालकांना पकडण्यासाठी पोलिसांची दोन पथके

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 22:25 IST

ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि भिवंडी परिसरांतील शेकडो गुंतवणूकदारांना करोडो रुपयांना गंडा घालून पसार झालेल्या मैत्रेयच्या संचालकांना पकडण्यासाठी ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने दोन पथकांची निर्मिती केली आहे.

ठाणे : ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि भिवंडी परिसरांतील शेकडो गुंतवणूकदारांना करोडो रुपयांना गंडा घालून पसार झालेल्या मैत्रेयच्या संचालकांना पकडण्यासाठी ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने दोन पथकांची निर्मिती केली आहे. या पथकांकडून गुंतवणूकदारांचे जबाब घेण्याबरोबरच आरोपींचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मैत्रेय प्लॉटर्स अ‍ॅण्ड स्ट्रक्चरर्स प्रा.लि. आणि मैत्री रियलटर्स अ‍ॅण्ड कन्स्ट्रक्शन प्रा.लि. या कंपनीच्या संचालकांनी ठिकठिकाणी एजंट नेमून त्यांच्यामार्फत कंपनीत आकर्षक योजना असल्याची बतावणी केली. त्याद्वारे काही ठिकाणी सहा वर्षांत पैसे दुप्पट देण्याच्या तर काही ठिकाणी जमिनीमध्ये पैसे गुंतवूणक करणाºयांना चांगला मोबदला देण्याचे प्रलोभन दाखवले. याच एजंटांच्या मदतीने वर्षा सत्पाळकर (रा. विरार, पालघर), जनार्दन परुळेकर (रा. विरार, पालघर), अजित पठारे (रा. नालासोपारा, ठाणे), ज्ञानेश्वर वैद्य, लक्ष्मीकांत नार्वेकर आणि विजय तावरे तसेच इतरांनी सुमारे ५५० ते ६०० जणांची फसवणूक करून त्यांच्याकडून १० ते १५ कोटी रुपये उकळले आहेत. विशेष म्हणजे मैत्री सुवर्णसिद्धी कंपनीला अशा प्रकारच्या ठेवी स्वीकारण्याला ‘सेबी’ (सिक्युरिटी अ‍ॅण्ड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडिया) यांच्याकडून निर्बंध घालण्यात आले होते. तरीही, मैत्रेय उद्योगसमूहाने गुंतवणूकदारांना अशक्यप्राय अशा तसेच आकर्षित योजनांचे आमिष दाखवून कळवा, भिवंडी, कल्याण, घोडबंदर रोड, मुंबई, नवी मुंबईतील अनेक गुंतवणूकदारांकडून करोडो रुपयांच्या रकमा स्वीकारल्या. हे पैसे परत न करताच त्यांचा अपहार केला. आता याप्रकरणी आमदार संजय केळकर यांच्या मागणीनंतर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास सुरू करण्यात आला असून दोन अधिकाºयांची पथके तयार केल्याची माहिती उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी दिली.१९ वर्षात १५०० कोटींची फसवणूकमैत्रेय ग्रुप कंपनी निरनिराळया नावाने १९९८ पासून सात ते आठ राज्यात कार्यरत होती. संचालक व मालक मधुसूदन सत्पाळकर याच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी वर्षा सत्पाळकर ही हा ‘उद्योग’ सांभाळत होती. नाशिक येथे संबंधितांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याचे बोलले जाते. गेल्या १९ वर्षाच्या कार्यकाळात हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा अंदाज व्यक्त होत असून ती रक्कम १५०० कोटीपर्यंत जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. कळवा येथील २९ वर्ष बंद असलेल्या मफतलाल कंपनीच्या कामगारांच्या महिलांनी या कंपनीमध्ये पैसे गुंतविले असून फसवणूक झाल्यामुळे त्यांना आणखीनच आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.