शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

चार हजार कोटींच्या मालमत्तांवर अखेर टाच; कर्जवसुलीसाठी लिलाव होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 23:53 IST

- सुरेश लोखंडे ठाणे : जिल्ह्यातील बँका , पतसंस्था आणि फायनान्स कंपन्यांसह सुमारे ७० बँकांना एक हजार ८०४ कर्जदारांनी चुना ...

- सुरेश लोखंडे

ठाणे : जिल्ह्यातील बँका, पतसंस्था आणि फायनान्स कंपन्यांसह सुमारे ७० बँकांना एक हजार ८०४ कर्जदारांनी चुना लावला. सुमारे पाच हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचे कर्ज बुडवणाºया या कर्जबुडव्यांच्या मालमत्तांचा शोध घेऊन त्या जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी देताच बँकांनी सुमारे चार हजार कोटींच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. या मालमत्तांचा लिलाव करून बँका कर्जाची वसुली करणार आहेत.

ठाणे, भिवंडी, वसई, विरार, पालघर येथील विकासकांसह उद्योगपती, कारखानदार, लघू उद्योजक, ट्रॅव्हल्स कंपन्या, तसेच रिक्षा, टेम्पो चालक असे तीन हजार ११८ कर्जबुडवे तीन वर्षात आढळून आले. त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश निघताच एक हजार १४६ कर्जदारांनी भरपाई केली. उर्वरित एक हजार ८०४ कर्जबुडव्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले. आतापर्यंत सुमारे चार हजार कोटींच्या मालमत्ता संबंधित बँकांनी जप्त केल्या. बँकांनी जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये व्यापारी गाळे, राहती घरे, गोडाऊन, गाड्या, रिक्षा, बस आदींचा समावेश आहे. कर्जबुडव्यांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई करणारा ठाणे जिल्हा हा राज्यात आघाडीवर असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला.

या मालमत्तांचा लिलाव करून बँका कर्जांची वसुली करीत आहेत. परंतु, ही आपत्ती ओढवण्यापूर्वी बँकांनीदेखील खबरदारीने कर्ज देण्याची गरज होती. योग्य कागदपत्रांसह कर्जदारांच्या निवासस्थानांची खात्री करूनच कर्ज देणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात बँक मॅनेजर्सनी दलालांच्या भरवशावर कर्जपुरवठा केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे बँकांच्या मॅनेजर्सवरदेखील भविष्यात कारवाई होण्याची शक्यता आहे.बँक मॅनेजरवरही कारवाईचे संकेतकर्ज बुडवणाºयांमध्ये अनधिकृत इमारतींच्या विकासकांचा सर्वाधिक समावेश असल्याचे आढळून आले आहे. जादा व्याज मिळवण्याच्या हव्यासापोटी बँकांनी मनमानी पद्धतीने कर्जपुरवठा केला. आता कारवाईची वेळ आली तेव्हा बहुतांश कर्जदार पळून गेले आहेत. खासगी, सहकार क्षेत्रातील बँका, फायनान्स कंपन्या, पतपेढ्यांना या कर्जबुडव्यांनी चुना लावला.केंद्राने इकॉनॉमिक आॅफेन्डर्स बिल लागू केल्यामुळे जिल्हाधिकाºयांनी त्यांच्या अधिकारात कर्जबुडव्यांच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले. आतापर्यंत चार हजार कोटींच्या मालमत्ता जप्त करून कर्जाची वसुली सुरू असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.

टॅग्स :bankबँकfraudधोकेबाजी