शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

उल्हासनगरात रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या हत्या प्रकरणी चौघांना अटक

By सदानंद नाईक | Updated: November 6, 2023 14:13 IST

 उल्हासनगर : पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार स्वप्नील कानडे याच्या हत्या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी काही तासात चौघांना ताब्यात घेतले. पूर्ववैमनस्यातून चौघांनी ...

 उल्हासनगर : पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार स्वप्नील कानडे याच्या हत्या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी काही तासात चौघांना ताब्यात घेतले. पूर्ववैमनस्यातून चौघांनी हत्या केल्याचे उघड होऊन खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

उल्हासनगरात कॅम्प नं-४, एसएसटी कॉलेज समोरील भोईर गाडी सर्व्हिसिंग सेंटर मागील झाडाझुडपाच्या जागेत एकाचा मृतदेह याल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना रविवारी सकाळी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची पाहणी केली असता, माणेरेगावात राहणारा व पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार स्वप्नील कानडे याचा मृतदेह असल्याचे उघड झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तर तपासणीसाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठविला. अंगावरील मारण्याचा जखमावरून त्याला जबर मारहाण करून मृतदेह झाडाझुडपात फुलून दिल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. त्यादृष्टीने पुढील तपास करून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या पथकाने काही तासात राम यादव, रोशन वाघ, अमोल कुबड्या व अक्षय गायकवाड या संशयीत चौघांना ताब्यात घेतले. तपासाअंती त्यांनी खुनाची कबुली पोलिसांना दिली असून पूर्ववैमनस्यातून हत्या केल्याचे उघड झाले. 

पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार स्वप्नील कानडे याचा खून झाल्याने, परिसरात भीतीचे वातावरण आहे. कानडे याच्या खुनाने, पोलीस अधिक सतर्क झाले आहेत. हत्या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या चौघांकडून अधिक माहिती मिळते का? या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत. शहरात हाणामारी, खून, फसवणूक, चोरी, खंडणी आदी गुन्ह्यात वाढ झाल्याने, पोलिसही हैराण आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी